रंगपंचमी आणि गोंधळलेली मानसिकता: बौद्धांची सामाजिक आत्मघातकी भूमिका

बातमी शेअर करा.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी विनंती.

रंगपंचमी आणि गोंधळलेली मानसिकता: बौद्धांची सामाजिक आत्मघातकी भूमिका

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये मुंबई इलाख्यातील महार परिषदेमध्ये ठराव मांडला होता,ज्यामध्ये स्पष्ट शब्दांत हिंदू धर्मातील सण-उत्सव न साजरे करण्याचे आणि धर्मांतराच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही आज ८८ वर्षांनी जर काही तथाकथित बौद्ध रंगपंचमी होळीसारख्या हिंदू सणांमध्ये रंग खेळत असतील,तर ही बाब चिंताजनकच नव्हे तर धक्कादायक आहे.बुद्धाच्या विचारांचे मारेकरी कोण.? बुद्ध धम्माच्या अनुयायांनी समता,स्वतंत्रता आणि बंधुता या तत्वांवर आधारलेली जीवनशैली स्वीकारली पाहिजे,असेच बाबासाहेबांचे मत होते.मात्र,काही लोक आजही हिंदू धर्मातील सणांमध्ये सहभाग घेत आहेत.हे लोक बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे नाहीत का?

डॉ.आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते:

 “पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजाअर्चा करू नये.हिंदूंचे सण, व्रत,वैकल्ये,उपोषणे पाळू नयेत,हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये.” (खंड १८, भाग १,पृष्ठ क्र. ४९०) तरीसुद्धा आज काही लोक रंगपंचमी,दिवाळी,नागपंचमी, बैलपोळा सण साजरे करताना दिसतात.तेव्हा प्रश्न पडतो?.हे बौद्ध आहेत का ब्राह्मणी मानसिकतेचे गुलाम? भूतकाळ विसरून वर्तमानाचा चुकीचा वापर

डॉ.आंबेडकरांच्या काळात महार समाजाची परिस्थिती काय होती,हे लक्षात घेतले पाहिजे.बाबासाहेब म्हणाले होते, “तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्याच हाडामासाची मला पूर्ण जाणीव आहे.आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार.अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी. ती देखील लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाल स्थिती.” (खंड १८,भाग १,पृष्ठ क्र.४५३, पैरा १) अशी समाजाची अवस्था होती.त्यावेळी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजाने हिंदू सण साजरे करणे शक्यच नव्हते.पण आज आर्थिक सुबत्ता आल्यावर काही बौद्धांना हिंदू सणांचा मोह का पडतो? ही आर्थिक सुबत्ता कोणाच्या संघर्षातून मिळाली आहे, हे या लोकांनी विसरले आहे का?

बौद्ध धर्माचा अपमान करणारे तथाकथित बौद्ध.

बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे केवळ तोंडाने बुद्धं शरणं गच्छामि म्हणणे नव्हे,तर त्याच्या विचारांनुसार वागणे आवश्यक आहे. जे लोक हिंदू धर्मातील सण साजरे करतात,ते बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत का?.बाबासाहेबांनी हिंदू धर्माला विरोध का केला? कारण त्या धर्मात शोषण होते. जर तुम्ही आजही त्या सणांमध्ये सहभागी होत असाल, तर तुम्ही बाबासाहेबांच्या त्यागाची चेष्टा करत आहात.समाजाला गोंधळात टाकणारे लेख आणि भ्रामक प्रचाआज समाज माध्यमांवर काही तथाकथित विचारवंत लेख लिहून हिंदू सणांना बौद्ध परंपरेचा भाग म्हणून सादर करताना दिसतात. ही अफवा पसरवणारे लोक बौद्ध धर्माच्या विरोधकांचे हस्तक नाहीत का?.जर हिंदू सण बौद्ध परंपरेचा भाग असते, तर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून वेगळा धम्म का स्वीकारला? त्यांनीच सांगितले होते की,हिंदू धर्मातील कोणत्याही सणात सहभागी होऊ नका.मग या तथाकथित बौद्धांची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे का?.हे लोक आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत, पण बुद्ध विचारांचा विसर पडला आहे.आज बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या अधिकारांमुळे आर्थिक सुबत्ता आली आहे, पण मानसिकता मात्र गुलामगिरीचीच आहे.

बुद्ध धम्माची खरी वाटचाल कशी असावी?

१. बुद्ध धम्माच्या तत्वांवर अढळ श्रद्धा ठेवावी.

२. हिंदू धर्मातील कोणतेही सण साजरे करणे बंद करावे.

३. समाजमाध्यमांवरील चुकीच्या प्रचाराला प्रत्युत्तर द्यावे.

४. बुद्ध विचारांचा प्रसार करावा, केवळ हिंदू सणांमध्ये सहभाग घेण्याऐवजी धम्माची शिकवण समजून घ्यावी.आजही जर तथाकथित बौद्ध रंगपंचमी,दिवाळी,होळी साजरी करत असतील,तर त्यांनी आपल्या श्रद्धा आणि विचार सरणीबद्दल पुन्हा एकदा विचार करावा.बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीला जे हरताळ फासतात,ते खरे बौद्ध नाहीत, तर बौद्ध संस्कृतीच्या मारेकऱ्यांपेक्षा कमी नाहीत.रतनकुमार साळवे ९९२३५०२३२०

संपादक- दैनिक “निळे प्रतीक” 

छत्रपती संभाजीनगर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *