अलीकडेच मा.उच्च न्यायालयाने निर्णय दिला.नवी मुंबई विमानतळाचे भूसंपादन बेकायदेशीर झालेय.यावर मी एक आर्टिकल अगोदर लिहिले आहे.“साडे बावीस टक्के”संमतीपत्र सिडकोला देऊन,केलेले जमिनीचे व्यवहार हा आगरी कोळी कराडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मूर्ख बनविणारा निर्णय होता.तर २०१३च्या नव्या भूसंपादन कायद्याने भूसंपादन करणे. हाच न्याय होता.यासाठी मां उच्च न्यायालयात रायगडचे एक वकील सुपुत्र ॲड राहुल ठाकूर आणि त्यांचे सहकारी वकील लढले.हा तर्क बुद्धीचा विजय होता.परंतु आता उशीर झालाय.वेळ निघून गेलीय.जमीन अदाणीच्या विमानतळाखाली गेली.१० गावे आणि तेथले शेतकरी आज विमानतळ क्षेत्राच्या बाहेर काढले गेले. विमानतळ अदानीचा झाला.
एकेकाळी जमीन आमची होती.आता अदाणीच्या “नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्या” हे आंदोलन आम्ही करतोय.तर्क करून पहा.कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आज आहे.जमीन मात्र अदाणीकडे गेलीय.आता न्याय किंवा लोकनेते दि बा पाटील यांचे “नाव” सहजासहजी सरकार देईल का?
“तर्क करणे “हा विचार दिबानी आम्हाला दिला.अर्थात हा तर्क देव बसलेल्या आकाशाला भेदणारा “गगनभेदी तर्क” होता. तो बुद्ध महावीर चार्वाक यांनी भारताला दिलेली महान वैज्ञानिक देणगी होती.तो देशाने स्वीकारला असता तर युरोप प्रमाणे नव नवे शोध आमच्याकडेही लागले असते.लोकनेते दि बा पाटील यांनी देव नाकारला होता.त्याचे अस्तित्वच नाही. असे म्हटले होते.अर्थात सामाजिक न्यायाच्या धर्तीवर हा त्यांचा व्यक्तिगत अनुभव होता.देशाच्या स्वातंत्र्या नंतरही मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील जे स्वतः शेतकरी होते .ते रायगडच्या आगरी कोळी कराडी ओबीसी आंदोलक शेतकऱ्यावर गोळ्या का घालतात.?तर्क करा.मनुस्मृतीचा वास येतो का? हिंदू मुख्यमंत्री,हिंदू सिडको प्रकल्पग्रस्तांना गोळ्या घालून जमिनी लुबाडतात यात ईश्वर अथवा देव धर्माचा न्याय आहे कुठे? आमची पाच माणसे “हुतात्मा” झाली.हजारो जखमी झाली.आमच्या न्यायासाठी मग ३३ कोटी देव होते कुठे गेले होते ?
आज दि बा पाटील यांच्या घरात पाच हुतात्म्यांच्या हार घातलेल्या प्रतिमा दिसतात.“साडे बारा टक्के”सिडको पुनर्वसन योजनेतून सुखी झालेल्या किती आगरी कोळी लोकांनी पाच हुतात्मे आणि पाटील साहेबांची प्रतिमा आपल्या घरात लावली आहे.? आम्हाला ज्या महान माणसांनी न्याय दिलाय. हे माहित असूनही आम्ही पूजन देवांचेच करतो.? ही धर्मश्रद्धा आहे.यात तर्क कुठे आहे? न्याय लोकनेते दि बा पाटील यांनी दिलाय.त्यासाठी आपले जीवन समर्पित केले.मग आम्ही त्यांच्याप्रती कृतदन्य राहिले पाहिजे.ही तर्क बुद्धी आमच्या ओबीसी समाजात का नाही.?
देवांच्या प्रतिमा नाकारून,महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बांधणारे,लोकनेते दि बा पाटील हे आपली पुरोगामी,मानवतावादी विचारसरणी स्पष्ट मांडतात.२०१३ साली साहेब गेल्यानंतर आगरी कोळी ओबीसी समाजातील नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या बुद्धीतला तर्क संपला.र्थात व्यक्तिगत धंदा नोकरीत तो थोडा फार असेलही? परंतु सार्वजनिक,राजकीय जीवनात तो राहिला असता? तर आज आमची फसवणूक विमानतळ प्रकल्पात झाली नसती.यात आमचे राजकीय नेते जबाबदार आहेत,असे नाही.वकील,प्राध्यापक,शिक्षक,लेखक,साहित्यिक,कवी,गायक, डॉक्टर,शास्त्रद्न्य हे सारेच तर्क करणे विसरले आहेत का?
वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय? हा मोठा प्रश्न आहे.मोठ मोठे डॉक्टर जेव्हा बुवा बापूंच्या चरणावर नतमस्तक होतात.तेव्हा लोक भाराऊन जातात.प्रयाग राजच्या दूषित मानवी मूत्र, विष्ठा यांनी प्रदूषित पाण्याला “पवित्र” म्हणणे यात तर्क नाही.असे हिंदुत्ववादी राजसाहेब ठाकरे म्हणाले.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची तिसरी पिढी आपल्या आजोबा प्रमाणे तर्क करू लागली.तशी आम्हा आगरी कोळी करांड्यांची तिसरी ओबीसी पिढी आमचे आजोबा लोकनेते दि बा पाटील यांच्या प्रमाणे तर्क करील काय? साऱ्या जगात तर्क करा.असे भगवान बुद्धांनी सांगितले. कार्ले येथील बौद्ध लेण्यात बसलेली आई एकवीरा हीच बुद्ध माता महामाया आहे.तिच्या शेजारीच महा प्रजापती आहे.जग प्रेमाने जिंकता येते.हे हुकूम शहा हिटलर आणि मुसोलिनीलाही कळले नाही.भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारून मित्र करता येत नाही.तर प्रेमाने खाऊ घालून मित्र करता येते.हा निसर्ग न्याय आहे.आम्ही निर्जीव दगडाला नैवद्य आणि भुकेल्या प्राण्यांना अगदी आमच्या सोबतच्या माणसांनाही अन्न नाकारतो.यात तर्क कुठे आहे? माणुसकी कुठे आहे? हे आपण समजून घ्या.भगवान बुद्धांचे आणि आमचे नाते आगरी कोळी कराडी या मातृसत्ताक एकवीरा संस्कृतीमुळे आहे.कोलिय वंशाची माता एकवीरा महामाया मुळे आम्ही भगवान बुद्धांच्या जवळ विचारांनी जोडले आहोत. नवव्या अवतारासाठी नाही.
जगाच्या इतिहासात पेरिप्लस आणि टॉलेमी यात हे नोंदले गेलेले लिखित, पुरातत्वीय नाते आहे.रायगडचे गॅझेट वाचा.हे सत्य समजून घेऊन नवी मुंबई विमानतळातील केरुमाता बौद्ध लेणी वाचविण्यासाठी मी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन लढलो. कारण ठाणे रायगड मुंबई ही बुद्धभूमी आहे.अर्थात माझा विषय तर्क करण्याशी आहे.सरकारी भूसंपादनात उद्योग एमआयडीसीच्या नावाखाली मुंबई ठाणे रायगड येथील गावाबाहेरील “शेतजमीन” महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने हिसकावून घेतली.स्वतंत्र भारतातील उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जरी हिंदू असले तरी आगरी कोळी ओबीसी जातीसाठी शोषक लुटारूच आहेत.कुळ कायद्याच्या १९३२ च्या चरी अलिबाग येथील विश्वविक्रमी शेतकरी संपामुळे आगरी कोळी ओबीसींना आलेले ते शहाणपण आम्ही चटकन विसरलो.जागृत,तर्कनिष्ठ ॲड दि बा पाटील १९७० साली आलेल्या नव्या उच्चवर्णीय सिडको आक्रमणापासून १९८४ ला संघर्षाला तयार झाले.इतर श्रद्धा संपन्न नेते आणि लोकनेते दि बा पाटील यांच्यातला अत्यंत महत्वाचा असा हा फरक आहे.
सिडको विरुद्ध संघर्षातून केवळ आगरी कोळी प्रकल्पग्रस्तानाच नाही .तर साऱ्या देशाला साडे बारा टक्के पुनर्वसनाचे नवे तत्व मिळाले.यात सरकारी नोकऱ्या, जमीनीचा वाढीव भाव आणि उद्योजक रामशेठ ठाकूर श्री जे एम म्हात्रे साहेब असे बलाढ्य तर प्रत्येक गावात तीन लाख ते तीन कोटींची ताकद,क्षमता असलेलेले अनेक लघुउद्योजक मिळाले.संघर्षातून आम्ही आमचे अस्तित्व टिकविले.आता याच न्यायाचे रूपांतर २०१३ साली नव्या भूसंपादन कायद्यात झाले.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला यासाठी मी धन्यवाद देईन.या कायद्यात जमिनीला बाजारभावाच्या चार पट मोबदला.२० टक्के विकसित भूखंड,प्रकल्पग्रस्त दाखले.सरकारी नोकऱ्या.व्यावसायिक पुनर्वसन.म्हणजे मासेमारी शेती,रेती,या व्यवसायांचे पुनर्वसन,प्रकल्पात भागीदारी.विकास कामात ५० टक्के वाटा.ज्यातून आमचे प्रकल्पग्रस्त ओबीसी उद्योजक घडतील.
२०१३ चा नवा भूसंपादन कायदा असताना.माझ्यासह किरण केनी,चेतन डाऊर, रुपेश धुमाळ,प्रेम पाटील,यांनी मागणी करूनही सरकारने, सिडकोने तो नाकारला.अर्थात आमचे प्रमुख नेते साडे बावीस टक्के चे समर्थक होते.आमची ताकद कमी पडली.तरीही यात साऱ्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचा बुद्धीभ्रम करण्यात,संजय भाटीया व्हि.राधा.ही आययेएस मंडळी,सिडको,नगर विकास खाते. महाराष्ट्र सरकार यशस्वी झाले.यात सर्व सामान्य माणसाचा तर्क कमी पडला.आमच्या फायद्याचे काय आहे? यासाठी तर्क बुद्धीच हवी.२५०० वर्षापूर्वी स्वर्ग,नरक,चमत्कार,देव,धर्म यांना नाकारणाऱ्या बुद्धांनी तुमची विवेक बुद्धी वापरा.तुमचे भले तुमच्याच हाती आहे.हे सांगितले होते.
नवी मुंबई विमानतळ अदाणीच्या हाती गेला.आता एप्रिल मध्ये तो सुरू होईल.असे सिडको म्हणते.मां उच्च न्यायालय म्हणते. शेतकऱ्यांच्या जमिनी फसवून घेतल्या.मग विमानतळ अनधिकृत,अतिक्रमण नाही का? जशी आमची घरे गावठाणे सिडको अनधिकृत अतिक्रमित आहेत असे म्हणते.फक्त तर्क करा.हिंदू देव धर्म यावर प्रचंड मोठी श्रद्धा असलेले सरकार तुमच्या उच्च न्यायालयाचा तर्क,न्याय मानते का? तशा जमिनी हातातून गेल्याच आहेत.देशासाठी त्याग करा.हा हिंदू राष्ट्रवाद आहेच.थोड थांबा.विमानतळ प्रकल्पाला लागून आता पाच कोटी गुंठा भाव आमच्या जमिनीला येतोय.सिडकोचाच सानपाडा नवी मुंबईचा विक्री भाव आहे हा.तरीही एक रुपया न देता.२०१३ कायद्याने भू संपादन न करता? ६० टक्के जमीन सिडकोची. तर ४०टक्के शेतकऱ्यांची? अशी जगावेगळी वाटणी सिडको हा बोका करतोय.तुम्हाला माकड बनवून लोणी खातोय.अर्थात खरी माकडे तरी तर्क करत असतील?. माणसांनी सांगितलेल्या गोष्टीतली नाहीत.
काही दिवसापूर्वी लोकमत टीव्ही चॅनलवर सिडको एमडी काही बिल्डर यांची तिसऱ्या मुंबईवर चर्चा दाखवली गेली.यात बेकायदेशीर सिडको भूसंपादनाची माफी सिडको मागत नाही.बिल्डर ही प्रकल्पग्रस्त आगरी कोळ्यांच्या जमिनीवर नैना प्रकल्प होतोय. हे शब्दाने सांगत नाहीत.जसा काही “देवनगरी स्वर्गात” सिडको तिसरी मुंबई बनवते आहे.असे ते भासवत होते.तेथे आमचे काही आगरी उच्च शिक्षित लोक बसले होते.
त्यांनीही आपली “विवेक” बुद्धी गहाण ठेवली? ही चर्चा पाहणाऱ्या कोणत्याच संवेदनशील, न्याय बुद्धी जागी असणाऱ्या माणसाने अजूनही विरोध केला नाही.निषेध केला नाही.वाईट याचे वाटते.भगवान बुद्धाच्या या देशात तर्क राहिला नाही.आमच्या गरिबीचे,अन्याय अत्याचाराचे,अर्थात दुःखाच्या मूळ कारणांपैकी हे एक कारण आहे.
आज महाबोधी विहाराचे आंदोलन साऱ्या जगातले बौद्ध बांधव करताहेत.देव,स्वर्ग, आत्मा,पूजा,आरत्या,नवस,चमत्कार नाकारणाऱ्या बुद्धाच्या मंदिरात तर्कहीन अंधश्रद्धाळू ब्राह्मण पुजाऱ्यांचे काहीच काम नसताना.केवळ भगवान बुद्धांना विचारांसाठी मानणाऱ्या,जगभरातून येणाऱ्या धम्मदानावर,डोळा ठेवून बसलेले हिंदू पुजारी. हे बुद्ध विहार आंदोलन होत असताना सोडत नाहीत.?कितीहा निर्लज्जपणा?
हुंडा न घेणारी मातृसत्ताक आई एकवीरा येथे,९९टक्के दान आगरी कोळी कराडी टाकतात.परंतु आईच्या ताटातील दानावर टपलेले उच्च जातीचे पुजारी एकवीरा ट्रस्ट ताब्यात घेऊन बसले आहेत.एकवीरा ट्रस्ट चे माजी अध्यक्ष मा.अंनत तरे यांच्यासोबत मी असे डोळस,तर्काचे आंदोलन केले होते.आईच्या पैशावर आणि आमच्या जमिनी घरे गावठाणे यावर बसलेले हे स्वार्थी लोक समजून घ्यायचे असतील.? तर हिंदू धर्म श्रद्धा, अपुरी आहे.आई एकविरेचा पुत्र बुद्ध यांची तर्क आणि वैद्न्यानिक दृष्टी आगरी कोळी कराडी ओबीसींसह आमच्या भारत मातेला वाचविल.दानाचा पैसा मुलींचे शिक्षण,नवे संशोधन,प्रकल्पग्रस्त न्याय यासाठी आम्ही वापरू.असे मला वाटते.विचार करा.तर्क करा.
राजाराम पाटील.८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.
