
प्रिय जेष्ठ वयस्क मित्रांनो, चला आपण स्वतःचा आढावा घेऊया आणि 10/10 गुण मिळवूया…आनंदी जेष्ठांसाठी 10 टिप्स
1) जर तुम्हाला सकाळी गजराच्या घंटेने,मोबाईलच्या रिंगने,पक्ष्यांच्या किलबिलाटाने किंवा इतर कोणत्याही आवाजाने जाग आली,तर आनंदी व्हा आणि स्वतःला भाग्यवान समजा.याचा अर्थ तुम्ही अजूनही या सुंदर जगाचा भाग आहात.
2) झोपेतून उठल्यावर पाणी प्या,तुम्हाला प्रिय असलेल्या लोकांना शुभेच्छा पाठवा, “शुभ प्रभात” म्हणा. याचा अर्थ तुम्ही विचारशक्तीने सक्षम आहात आणि तुमचे आरोग्य उत्तम आहे. नवीन आणि सुंदर दिवसाची सुरुवात करा.
3) जर मित्रांचे फोन किंवा मेसेज येत असतील,जेवायला किंवा भेटायला बोलावत असतील,तर समजा की तुम्ही लोकांसोबत चांगले संबंध ठेवले आहेत. तुमचे मित्र अजूनही तुमची आठवण ठेवतात.
4) कधी कधी कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा निंदा करत असेल, तर समजा की तुम्ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहात. याचा अर्थ ते तुमच्यासारखे यशस्वी नाहीत. त्यामुळे त्याबद्दल नाराज न होता आनंदी राहा.
5) जर तुम्हाला जास्त वजनाची चिंता वाटत असेल,तर समजा की तुम्ही भरपूर पोषक आणि रुचकर अन्न खात आहात.योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवा आणि संतुलित जीवनशैली जगा.
6) जर तुम्ही मित्रांसोबत फिरायला, गप्पा मारायला, प्रवासाला जात असाल आणि नवीन ठिकाणी भेट देत असाल, तर याचा अर्थ तुमची जीवनशैली उत्तम आहे.
7) जर तुमच्यात विनोदबुद्धी असेल, तर समजा की तुमचे मन तरुण आहे आणि तुमचे आरोग्य चांगले आहे.
8) जर तुम्ही 65 वर्षे पूर्ण केली असतील, तर समाधानी आणि आनंदी राहा. जागतिक सर्वेक्षणानुसार फक्त 100 पैकी 8 लोकच 70 वर्षांपेक्षा जास्त जगतात.
9) जर तुम्ही बाजारहाट करू शकत असाल, स्वयंपाक करू शकत असाल,तुमची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता चांगली असेल,मोबाईलवर मेसेज पाठवू शकत असाल, आठवणी लिहू शकत असाल,तर समजा की तुम्ही खूप यशस्वी जीवन जगत आहात.
10) जर तुम्ही हा संदेश वाचत असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल,तर तुम्ही खूप आनंदी,समाधानी आणि परिपूर्ण व्यक्ती आहात.मी ही ग्रुप वर वाचले आणि तुम्हा वाचका समोर मांडले. तुम्ही वाचले तर तुम्ही हा संदेश मित्रांसोबत शेअर करू शकत असाल, तर याचा अर्थ तुम्ही परोपकारी, दयाळू आणि प्रेमळ व्यक्ती आहात.प्रथम 10 पैकी 10 मार्क मिळविणा-या जेष्ठ मित्रांना संदेश पाठविला आहे.आणि आपल्याला किती मार्क पडतात गुणदान पडते पहा.स्वताची समीक्षा स्वता करा.आणि आरोग्य उत्तम ठेवा त्यासाठी सकारात्मक विचार नेहमी करा.नकारात्मक विचारांना थारा देऊच नका. त्यामुळे नेहमी सुखी समाधानी राहाल आणि इतरांना ठेवाल.
संकलन:- सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
