
आपल्या देशात लोकशाही आहे.त्यामुळे मतदाराच्या मताला विशेष महत्व आहे हे मत देत असतांना जी,जी उमेदवार,उ भी असतील मग ती विधानसभा मध्ये असो,या लोकसभा असो या जिल्हा परिषद या पंचायत समिती सदस्य म्हणून उभे असतील त्या सर्वांच्या बाबतीत मत देणारा जो असेल त्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे,ती नसेल तर त्यानी ती मिळवून घेतली पाहिजे.आपले मत देत असतांना,जात,पात,धर्म,पंथ बाजूला ठेऊन खरं तर मतदाराने त्याचे शिक्षण, चारित्र्य,लोकांसोबत असणारी त्याची वागणूक,तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणारी क्षमता म्हणजे निर्भीड ता त्याच्यात असली पाहिजे.जर तो एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून जरी आला असेल तर ते त्या पक्षाचा असला तरी तो पहिल्यांदा जनतेचा होतो,असतो,राहतो नंतर पक्षाचा होतो असे त्याने समजले पाहिजे पण असे विशेषता होतांना फार कमी दिसत असेल, खरं तर त्या निवडून येणाऱ्या आमदार, खासदार च्या मागेपुढे पक्षाचेच कार्यकर्ते जास्त प्रमाणात दिसतात आणि त्यात तो प्रतिनिधी व्यस्त दिसतो.त्यामुळे लोकांचा सर्व समान्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या कडे पाहल्या जात नाही.बल्की त्या कार्यकर्त्याच्या साहाय्याने आपली कामे कशी करवून घेता येईल हा विचार इतर लोक करतात. म्हणजे तो पक्षाचा जास्त आणि जनतेचा कमी प्रतिनिधी दिसतो.हे काही प्रमाणात खरे ही आहे.
हुंडा प्रथेला रोखल्या शिवाय महिला वरील अन्याय,अत्याचार थांबणार नाही.हुंडा मागणे आणि देणे गुन्हा आहे.असे असतांना ही काही हुंडा मागतात,आणि देतात.याला काय म्हणावे? हुंडा मागणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा देखील स्वार्थ त्यामागे असतो. मागणाऱ्याला आपल्या संपत्ती मध्ये वाढ करायची असते, सोबतच आम्ही किती श्रीमंत आहोत,धनिक आहोत, त्यामुळे आम्ही मोठया थाटामाटात लग्न केले.येणारे जाणारे नातेवाईक,राजकीय नेते,गावातील,शहरातील लोक त्याच्या या थाटा माटात झालेल्या लग्नाची चर्चा करतात. इकडे मुलीच्या आई,वडिलांला मुलगी चांगल्या घरी दिल्याचा आनंद होतो. भास असतो. पहाता, पहाता मुलाच्या मनातील, लालच, त्याच्या आई, वडिलांची लालची प्रवृत्ती ने थोडा जोर पकडलेला असतो. त्याना वाटते मुलीला थोड टार्चर केले, की पुन्हा आपल्याला पैसा मिळेल ही मुलाची,त्याच्या घरच्यांची धारणा होते आणि तिला त्रास दयायला म्हणजे सुरवात होते. ती समजविण्याचा प्रयत्न करते पण कोणीही ऐकून घेण्याच्या मानसिकता मध्ये नसते. तिला मार,झोड सुरु होते,ती हतास होऊन आई,वडिलांना सांगते,ते समाजाकडे तक्रार करतात,सोबतच पोलीस कडेही तक्रार करतात.तक्रारी नंतर काही चुका झाल्या म्हणून पती व त्याकडील माफी मागतात पण ते वरवर असते.त्याच्या मनात राग असतोच,तो राग पुन्हा वाढू लागतो. पती आणि त्याच्या घरचे मिळून पुन्हा तिला हिनवतात, आणि तिला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित किंवा तिची हत्त्या करतात. असे करणारे विशेष म्हणजे स्वतःला खूप मोठे,श्रीमंत,इज्जत दार समजतात.जसे अलीकडील वैष्णवी हगवणे च्या बाबतीत आपल्याला जाणवते.वैष्णवी च्या आईने महिला आयोगा कडे तक्रार सात महिन्या पूर्वी करून देखील त्याच्या तक्रारीची फारशी दखल आयोगाने घेतली नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना घ्यावशी वाटली नाही. असा आरोप वैष्णवी च्या आईचा आहे.न्याय मागायचा कुणाला? त्यामुळे जसे हुंडा मागणारा हा गुन्हे गार आहे पण देणाराही तेवढाच गुन्हेगार आहे, कारण त्यानी केलेल्या बेकायदेशीर मागणीनीला समर्थन हुंडा देणाऱ्यांनी दिले. म्हणजे स्वतः होऊन गुन्हे गाराला बढावा दिला. अर्थात त्या आई वडिलांचा स्वार्थ होताच, की आपल्या मुलीला हुंडा दिल्या मुळे सुख मिळेल पण तसे झाले नाही. मुलीला सुख, मिळणे, न मिळणे हे सारे काल्पनिक होते, पण हुंडा मागितला हे वास्तव होते. म्हणजे गुन्हा होता. त्याला मदत करणे म्हणजे गुन्हा आहे. जर हुंडा मागितला त्यावेळी तक्रार केली असती तर वैष्णवी आज असती. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने प्रबोधन करणे,हे अगत्याचे झाले आहे. हुंडा मागणारा आणि हुंडा देणारा सुध्दा तेवढच जबाबदार आहे.
मग त्याचा जो जनकल्यानाचा संकल्प होता तो गेला कुठे? त्याची मोठी, मोठी आस्वासणे,ती भाषने नेमकी कुणासाठी होती ? केवळ पोकळ आभास निर्माण करण्याचा प्रयत्न नाही का? जनकल्याण म्हणजे,सरकारी जास्त प्रमाणात कारखाने निर्माण करणे,सरकारी शाळा,कॉलेज निर्माण करणे,दवाखाने निर्माण करणे, सरकारी सर्व कार्यालयात अनुशेष भरून काढणे, जातीभेद नष्ठ करणे,कोणीही भेदभाव, करणार नाही, मग तो जातीच्या नावावर असेल या धर्माच्या नावावर असेल, याची काळजी घेणे, दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांचे ऊ था न होईल यासाठी प्रयत्न करणे.म्हणजे देशात समता प्रस्थापित करणे,बंधूभाव निर्माण करणे, सर्वांना समान न्याय देणे, आणि आपल्या देशाला मोठया परिश्रमा ने मिळालेल स्वातंत्र्य कस चिरकाल कायम टिकून राहील याचा प्रयत्न करणे, हाच लोकशाहीत “लोकांच्या हित रक्षणाचा संकल्प” लोक प्रतिनिधीचा असला पाहिजे.त्या प्रतिनिधीला जात,पात,धर्म,पंथ पाळता येत नाही.

आपल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाची अगदी सुरवातच “आम्ही भारताचे लोक” या वाक्याने झाली आहे.आणि अगदी शेवटचे वाक्य म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असे लिहले आहे.सांगितले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की या देशातील लोकांचे हित रक्षण करणे,देशात समता प्रस्तापित करणे, बंधूभाव निर्माण करणे,आणि सर्वांना समान न्याय देणे हे होय.त्यासाठी भारतीय संविधान मध्ये मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य सांगितली गेली आहे,याची जाणीव या देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना आणि जनतेला देखील असली पाहिजे. या सर्व अर्थाने भारतीय संविधान विषयी,जण जागृती होणे महत्वाचे आहे. ती झाली की लोकांच्या मनात असलेली किंतु,परंतु,शंका, कुशंका संपूस्टात येईल, लोकांचे समाधान होईल हे मात्र निश्चित आहे. त्यासाठी संविधान मध्ये असणारी लोक कल्याना ची तरतूद जी डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी करून ठेवली याची जाणीव लोकांना व्हायला हवी,मग ती ओबीसी साठी म्हणजे इतर मागासवर्गीया साठी असलेले 340 कलम असेल,या एस सी साठी म्हणजे मागासवर्गीया साठी असलेले 341 कलम,या अनुसूचित जमाती साठी असलेली कलम 342 असेल या सर्व बाबी असणाऱ्या घटनेतील लोकांना कळल्या पाहिजे.त्याशिवाय लोकांना खरे कळणार नाही. जो जनकल्यानाचे काम करीत असेल आणि त्याची माहिती लोकांना नसेल तर लोक कसे म्हणतील की त्यानी आमचे वास्तव्यात कल्याण केले आहे.आणि त्यामुळे आपण ज्या दैनिक,साप्ताहिक मध्ये जाहिराती ज्या शासन,प्रशासन देतांना पहातो त्या त्यासाठीच असतात.लोकांना सुविधा मिळावी, लोकांना त्रास होऊ नये,या मागील जाहिरात देण्याचा प्रयत्न प्रशासन,शासनाचा असतो पण सर्व साधारण माणसे यांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार नसल्याने,शेतकरी,शेतमजूर, अंग मेहनतीची कामे करणारी माणसे असल्याने,सोबतच शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ती माणसे खऱ्या मिळणाऱ्या सुविधा दूर राहतात, त्यामुळे समस्या सुटण्यास विलंब होतो.
जो जो उमेदवार निवडणुकीत उभा असतो,तो,तो अनेक आस्वासणे लोकांना देतात आणि ती आस्वासणे ही जनकल्याणाचीच असतात पण त्यानी दिलेली आस्वासणे पूर्ण केली का? आणि केली नसेल तर का? नाही. हा प्रश्न कोणीही फारसा विचारतांना दिसत नाही.त्यामुळे त्यानी दिलेली आस्वासणे ही काल्पनिक असतात,जिथे माणसाला उदया जीवित राहील अथवा नाही याची शास्वती नसते तरीदेखील ती माणसे तुम्हाला काल्पनिक आस्वासणे देऊन तुमच्या डोळ्यात एक प्रकारे धूळ टाकतात.अलीकडे त्याच्या संपत्ती कडे नजर टाकली तर ती प्रचंड प्रमाणात त्याची वाढलेली आपल्याला दिसेल.
या सर्व बाबीचा खऱ्या अर्थाने विचार केला तर या लोकशाहीत शासन,आणि प्रशासन याची अगदी महत्व पूर्ण जबाबदारी आणि कर्तव्य देखील आहे. याचे कारण ते लोकांसाठी असते आणि त्याना लोकांनी दिलेल्या करामधून त्याना पगार, किंवा मानधन मिळते. सोबतच त्याचा जनकल्यानाचा संकल्प देखील असतो. निवडून जाणारा प्रत्येक जनप्रतिनिधी लोकांना आस्वासन सतत देत असतो. त्या आस्वासनाची पूर्तता तो किती करतो हे त्यानी केलेल्या, दिलेल्या आस्वासनाच्या पूर्तते वरून लक्षात येते.तसे ते आस्वासन काल्पनिक असते. त्याच कारण माणूस, महिला उदया जीवित असेल अथवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे त्याच्या आस्वासनाला किंमत नसते पण आपली भोळी, भाभळी जनता त्यावर विस्वास ठेऊन मतदान करतात हे मात्र निश्चित पणे सांगता येईल.आपण आस्वासनाची पूर्तता न करणाऱ्या प्रतिनिधि च्या संपत्ती कडे थोडी नजर टाका त्यात काही लोकांची संपत्ती भरमसाठ वाढलेली आपल्याला दिसेल. पण आजही 80 करोड जनता सरकारी स्वस्त धान्य दुकानातून आपल्या उदरनिर्वाह साठी लाईन मध्ये असते. त्यामुळे आपल्या देशाचा पाहिजे तसा विकास झाला नाही यावरून आपल्याला जाणवेल.वीज,पाणी,आरोग्याच्या सुविधा आजही अनेकांपर्यंत पोहचल्या नाही.पर्यावरनाची समस्या कंत्राटी पद्धती त होत असलेली वाढ, सरकारी आस्थापनेत अनेक ठिकाणी न भरल्या गेलेला अनुशेष, हे खूप सारे सांगून जाते. या सर्व अर्थाने “लोकशाहीत लोकांच्या हित रक्षणाचा संकल्प” करणाऱ्या प्रतिनिधि नी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे.आणि दिलेल्या आस्वासनाची,आणि संकल्पाची पूर्तता करण्याची अपेक्षा सर्व भारतीय,बांधव,आणि भगिनीची आहे. ती प्रतिनिधि करतील या अपेक्षेत जनता आहे.
अविनाश टिपले चंद्रपूर 9970917389,
