आजच्या रिटायर माणसाला डॉक्टरच्या औषध पेक्षा प्रेमाने बोलण्याच्या औषधची गरज आहे.

बातमी शेअर करा.

भारतात सेवा निवृत रिटायर माणूस म्हणजे एक समस्या झाली हे.त्यांच्या आई वडिलांनी शेतात मोलमजुरी करून मुलाला शिक्षण दिले.म्हणूनच तो शहरात नोकरीला लागला.त्याने मात्र नोकरी करत असतांना कर्ज काढून प्रथम स्वतचा वन,टू प्लॉट घेतला.काहीनी चाळीत घर घेतले.मुलामुलीच्या शिक्षणासाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च केला.त्यांना शिक्षणामुळे चांगली नोकरी मिळाली.नोकरीमुळेच चांगली शिकलेली व नोकरी करणारी बायको मिळाली.त्या नंतर काही वर्षानी त्यांना आई वडिलांची अडचण वाटायला लागली म्हणून त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि कर्ज काढून चांगला टू ,थ्री बी एच के प्लॉट घेतला. आणि राजाराणीचा संसार सुखाचा चालणार ही अपेक्षा होती.पण सुख म्हणजे काय असते ही फक्त आई वडिलांच्या घरात एकत्र कुटुंबात नोकरीच्या काळात अनुभवले असते.आता मात्र त्यांचा दोघांचा नोकरी करत असल्यामुळे वेळ सेकंद,मिनिट आणि तासा तासाने दिवस फिरत असतो.कोणीच कोणासाठी थांबत नाही.दिवस काळ बदलत जातो.बाप नांवाचा माणूस रिटायर होतो.आणि त्यांच्या जगण्यातील सेकंद,मिनिट,तास दिवस आणि काळ बदलेला असतो.

रिटायर माणूस जर उशिरा पर्यंत झोपला तर….

बायको :- आता ऊठा तरी ! तुमच्या सारखे कोणी झोपते का ? रिटायर झाले तर दुपारपर्यंत झोपून राहाल का….!.

रिटायर माणूस जर लवकर उठत असेल तर….?.

बायको :- तुम्हाला तर म्हातारपणात झोप येत नाही, दुसऱ्यांना तर झोपू द्या.एक दिवस कोणाला सुखानं झोपू देत नाही,5 वाजताच उठून बडबड करत बसता,आता तरी चुपचाप झोपा आणि इतरांना ही झोपू द्या.रिटायर माणूस जर घरीच राहत असेल तर….?.                 

बायको :- सकाळ झाली की मोबाईल घेऊन बसता,घंट्या घंट्यानं चहा चहा करत गोंगाट करता,काही कामं तुम्ही स्वतःही करत जा.कधी तरी घराच्या बाहेरही निघत जा, आम्हाला जरा दम घेऊ देत जा. साऱ्या लोकांना काही ना काही काम असते. हा माणूस निस्ता घरी बसून राहतो.लवकर उठून हात-पाय धुवून नाष्टा पानी करावं. आता यांच्या साठी आम्ही वाट पाहात बसाव का…!

रिटायर माणूस जर घरापासून खूप वेळ बाहेर राहत असेल तर….?

बायको :- कुठं होते तुम्ही इतका वेळ ? आता तर नौकरीही नाही, तरी घरी रहावं वाटत नाही. कधीतरी घरच्या लोकात बसावं, कधी तोंडानं देवाचं नाव घ्यावं !

रिटायर माणूस जर पूजा करत असेल तर….?

बायको :- हे असं घंटी वाजवत बसल्यानं काही नाही होणार…! जर असं झालं असतं तर या जगात श्रीमंत म्हणून टाटा, बिल गेट्स यांचं नाव नसतं.एखाद्या पुजाऱ्याचं नाव असतं ! जवा पहावं तवा कधी माळ, कधी घंटी तर कधी राम…. राम…।

जर रिटायर माणूस रिकाम्या वेळी पैसा कमवण्यासाठी काही करत असेल तर…?

बायको :- जवा पहावं तवा काम…काम…काम. ह्या पैशाची लालच तुम्हाला म्हातारपणातही सुधरू नाही देत. आम्ही काय इथं रोजानं हाय का संध्याकाळी तुमची वाट पाहत बसायला….?

रिटायर माणूस जर पत्नीला धार्मिक तीर्थस्थळी फिरायला घेऊन गेला तर…..?

बायको :- बघा,ते साहेब आपल्या बायकोला दर महिन्याला फिरायला घेऊन जातात. अन् ते बी ताडोबा,चिखलदरा अशा ठिकाणी ! तुमच्या सारखं नाही नेत देव दर्शनाला ….!

रिटायर माणूस जर आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून नैनीताल,मसूरी,गोवा,माउन्ट आबू ,ऊटी अशा ठिकाणी फिरायला घेऊन गेला तरी….!

बायको :- आपलं घर ते आपलं घर…तेच चांगलं,फुकट पैसे बरबाद करत फिरता. असं वाटते फालतूचे पैसे आले तुमच्याजवळ. जास्तच उडून राहिले. आता एका जागी बसता का भराड्यावानी निस्त फिरत राहता.काय हाय अशा फिरन्यात ? जर घरीच राहिलो असतो तर एवढ्या पैश्यात दोन वर्ष पुरेल एवढे कपडेलत्ते, किराणा झाला असता.         

रिटायर माणूस जुन्या गाण्याचा शौक़ीन असेल तर… ! 

बायको :- म्हातारपणात हे गाणं आवडून राहिलं तुम्हाला,आता लय जवानी येऊन राहिली तुम्हाला. एखांदं भजन ऐकावं….देवाचं नाव घ्यावं …..!

रिटायर माणूस जर करमण्यासाठी फोन करत असेल तर….! 

बायको :- दिवसभर नुसते फोनवर राहता,कोणा कोणाला फोन करत असता ? आम्ही तर नाही करत कोणाला…..फोन !

वाह रे ! रिटायर माणूस !देशातील सर्व रिटायर्ड बधूंना याचा अनुभव येत असेल. त्यांना बायकोचे बोलणे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का?. यात दोन बायका येतात एक स्वताची आणि दुसरी एकत्र कुटुंबात राहिल्यास आपल्या लाडक्या मुलाची. त्यासाठी आपण नोकरी वर असतांना कोण होता ही प्रथम विसरले पाहिजे. तेव्हा नातलगात,सग्या सोयऱ्यात, मित्र मंडळीत, सामाजिक बांधिलकी म्हणून चळवळीत मिसळत  नव्हता. तेव्हा वेळ नव्हता. आता खूप वेळ आहे. पण कोणीच जवळ करून चार प्रेमाचे शब्द बोलत नाही. यांची खंत वाटते. आजच्या रिटायर माणसाला डॉक्टरच्या औषध पेक्षा प्रेमाने बोलण्याची औषध गरजेची आहे.म्हणूनच आजच्या नोकरी करणाऱ्या माणसांनी उद्या रिटायर होण्या आदी जगण्याची कला शिकून घ्यावी.स्वता आनंदाने जगावे आणि इतरांना सुख समाधानाने आनंदाने जगू द्यावे.मग,घ्या आनंद बोलण्याचा! तो आज विकत मिळत नाही. त्यासाठी जिव्हाळा प्रेम आपुलकी आणि मैत्री भावना असावी लागते. रिटायर माणसाची बायको अगोदर निसर्ग नियमाने वर गेलेली असेल तर?.. त्यांची खूप दैनीय परिस्थिति असते. पुढच्या वेळी ती अवश्य वाचा.

सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *