चळवळीतला कार्यकर्ता जिवंत,तर समाज सुरक्षित…..

बातमी शेअर करा.

“कोणत्याही जातीतला,धर्मातला,समाजातला कार्यकर्ता (अराजकीय) हा कार्यकर्ताच असतो.तो एक समाजाचा अविभाज्य घटक असतो.तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील तत्ववेत्ते,महापुरुष आणि आजची सर्वसामान्य जनता यातील तो दुवा असतो.  कार्यकर्ता कधी गुन्हेगार असूच शकत नाही. कारण त्याने त्याग,संघर्ष येथील व्यवस्थेशी झगडून जनतेच्या कल्याणाची बाजू घेतलेली असते. प्रसंगी तो समाजाच्या आणि व्यवस्थेच्या रोषाला,बदनामीला,अपमानाला न जुमानता निःस्वार्थपणे समाजसेवा करत जातो.प्रसंगी तो स्वतःच्या घरातून सुद्धा बेदखल होत असतो. प्रसंगी तो घराची नाळ तोडील,परंतु ,समजाची नाळ कधीच तोडणारा नसतो.कारण त्याने जे संघर्षातून भोगलेले असते.महापुरुषांच्या त्यागातून,संघर्षातून निर्माण झालेल्या क्रांतीला त्याने जाणीवेतून ओळखलेले असते.त्यांच्या क्रांतीचा आदर्शच याची ऊर्जा असते.तो कार्यकर्ता जीवनात खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत करत करत दोन संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो.एक स्वतःचा परिवार आणि दुसरा महामानवांच्या आणि महामातांच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न म्हणजे दुसरा संसार.असा कार्यकर्ता कोणत्याही अमिषाला बळी पडत नसतो.कोणत्याही राजकीय पक्षाच्या गळाला लागत नसतो.कारण त्याचे स्वतःचे आजीवन धोरणात्मक नैतिक मूल्ये ठरवलेली असतात.त्यामुळे त्या चाकोरीबाहेर तो कधी जात नाही.

    त्याला मानसिक किंवा शारीरिक सुख किंवा दुःख यांची चिंता नसते.उलट समाजच त्याला मुर्खात काढत असतो.परंतु,त्याला त्याचे काहीही वाटत नाही.कारण त्याची वैचारिक प्रगल्भता एवढी विशाल झालेली असते की, सामान्यांच्या आकलन क्षमतेच्या आवाक्याबाहेरचे असते.असा कार्यकर्ता त्याला जर उच्चं शिक्षणाची जोड मिळालीच तर तो निश्चितपणे आपल्या विद्वत्तेचा वापर समाजाला न्याय मिळवून देण्यातच धन्य मानतो.त्याच्यासाठी पैसा हा गौण असतो. सम्यक मार्गानेच जीवन जगण्याचा प्रयत्न तो करत असतो.शेवटी तो विचार करतो की.

“तू लाख हिफाजत कर ले…….लाख करे रखवाली उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.”

    जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा काळ म्हणजे आयुष्य. या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अनुभवातून म्हणजे त्याच्या आदर्शांच्या क्रांतीतून मिळालेल्या ऊर्जेतून तो स्वतःसोबत इतरांच्या कल्याणासाठीच जगत असतो.तो स्वतःचे आंतरिक दुःख कधीच जगासमोर मांडत नसतो.तो आतल्या आतच सहन करत जगत असतो.तो थांबतही नाही.इतरांना कधीच दोष तो देत नसतो. स्वतःचे ओझे इतरांनाच काय स्वतःच्या घरात सुद्धा होवू देत नसतो.हसत मुखाने कधीही मरणाला तो सामोरे जाणारा असतो.कारण केवळ त्याला आणि त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. अशा व्याख्येतला कार्यकर्ता हा लेखक,पत्रकार,साहित्यिक, कवी कुणीही असू शकतो. त्याच्यात व्यवस्थेला भिडण्याची धमक असते. त्यालाच योग्य दिशा समजलेली असते. त्याने बलाढ्य शक्तीला पाणि पाजण्याची सुद्धा धमक राखून ठेवलेली असते.त्याचे कारण एकच,त्याने जाणलेले असते की,सर्वसामान्य जनता निरागस रांगत्या बाळासारखी असते.तीचे रक्षण आणि सांभाळ करण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे.परंतु ,ती व्यवस्थाच जर या निरागस बाळाला वाऱ्यावर सोडून देत असेल तर हाच कार्यकर्ता बलाढ्य शक्तीला भिडून सामान्य जनतेची बाजू घेऊन लढत असतो.आजही बोटावर मोजण्याइतकेच पत्रकार,लेखक,साहित्यिक आहेत. जे व्यवस्थेशी भिडत आहेत.ज्यांना ना पेन्शन.ना पगार.ना कुठलीही अपेक्षा.परंतु,आत्मविश्वास दाबून भरलेला.

   RSS, मोदी,शहा,मोहन भागवत,फसणवीस यांची आणि यांच्या पिलावळीची व मित्रांची (संविधान विरोधी शक्तिची) भिडभाड न ठेवता परखडपणे रोखठोकपणे आपली मते मांडणारा.असा कार्यकर्ता आज जिवंत आहे.म्हणूनच समाज सुरक्षित आहे. अशा कार्यकर्त्याला ओळखण्याचे कष्ट समाजाने त्याच्या जिवंतपणीच घेतले पाहिजेत.  नाहीतर त्याच्या मरणानंतर लांबलचक भाषणे ठोकून उपयोग काय…….?.कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही जात,धर्म नसतो.तो केवळ आणि केवळ त्याच्या आदर्श डोळ्या समोर ठेऊन चालणारा एक सामान्य माणूस असतो.कारण या जगात देव आणि दानव बनणे अगदी सोपे आहे,पण “माणूस” बनणे अशक्य नाही पण महाकठीण आहे (अंधश्रद्धेच्या व्याख्यानुसार) पण हा कार्यकर्ता मात्र माणूस असतो.म्हणूनच समाज सुरक्षित असतो.

जागृतीचा कृतिशील लेखक :- अनंत केरबाजी भवरे 7875452689,

(संविधान विश्लेषक,रेणापूरकर,संभाजी नगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *