एक नेता ऐसा भी………

बातमी शेअर करा.

या संपूर्ण देशात येवढ्या बिनधास्तपणे व साधेपणाने कोणता तरी नेता जिवन जगत असेल असं आज पर्यंत दिसलं नाही.

अॅड.बाळासाहेब आंबेडकर 40 वर्ष राजकारणात आहेत. ते खासदार झाले, त्यांनी अनेक मंत्री त्यांच्या पक्षातून बनवले,अनेक आमदार बनवले,अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होत्या आणि आहेत, महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,3000 वरुण अधिक ग्रामपंचायत सदस्य सध्या त्यांचे आहेत.पण ना कधी त्यांच्यावर कुठला साधा गुन्हा आहे ना त्यांच्या मागे कुठल्या घोटाळा केल्याचा साधा छोटासा आरोप,म्हणून ना ईडी ची भीती,ना केंद्राची भीती,ना राज्याची भीती.राजकारणात चरित्र स्वच्छ असेल तर असं बिनधास्त जगता येतं बिनधास्त राहता येत, बिनधास्त कुठल्याही पब्लिक प्लेस वर कुठलीही सेक्युरीटी नसतांना फिरता येतं…नाहीतर आजकालचे नेते स्वतःला इमानदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात,जोरजोरात ओरडतात,एकमेकांवर चिखलफेक करतात पण यातून जनतेला काहीच भेटत नाही.

उलट दुसर्‍या दिवशी ते सोबत मांडीला मांडी लाऊन बसतात.आणि अश्या कृत्याला राजकारण नाव देतात.अॅड.बाळासाहेब आंबेडकर या देशातील एकमेव निष्कलंक नेते आहेत म्हणून त्यांचे समर्थकही बिनधास्तपणे राहतात म्हणून कोणत्याही पक्षाच्या मोठा नेताही वंचित बहुजन आघाडी च्या साध्या कार्यकर्त्यांशीही चर्चा करू शकत नाही.

हीच खरी ताकद बाळासाहेबांची ..!

आपला नेता आपली ताकद .

एक वंचित कार्यकर्ता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *