अकोला येथे १० वी १२ वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न !!!.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी अकोला – पत्रकार भवन निमवाडी अकोला येथे बिल्डींग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजूर संघ व ॲसेस टू जस्टीस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी १२ वि च्या १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ॲड.अनिता गुरव अध्यक्ष बाल कल्याण समिती,राजू लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांची होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कारंडे जिल्हा संघटक होते.प्रमुख उपस्थिती: नितीन वाकोडे राज्य संघटक बुलढाणा,शेख युनुस जिल्हाध्यक्ष वाशिम,अजमत खान जि.सचिव वाशिम,सुनिल शेगोकार जि.संघटक,सत्यदेव तायडे हिवरखेड अध्यक्ष,रौनक अली बार्शिटाकली अध्यक्ष,शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वक.अकोला.पद्ममा मोहोड मंगरुळपिर अध्यक्षा,उषा लबडे पुर्व झोन अध्यक्षा,राजश्री किर्तवार मॅडम,अब्दुल बशीर उपाध्यक्ष,विनोद जपसरे,आत्माराम साठे कोषाध्यक्ष,मनोज बाविस्कर सचिव,गणेश सावळे प्र.प्रमुख,महानगर अध्यक्ष सैय्यद मकसुद,संतोष भालेराव,महा.उपाध्यक्ष झिंगाजी पुंडगे,ता,उपाध्यक्ष राजेंद्र मेसरे,गणेश राठोड हिवरखेड,नागेश नेमाडे शाखा सुकोडा तथा उप संपादक कामगार संघटक,हे प्रामुख्यांने हजर होते.

     याप्रसंगी अनिता गुरव मॅडम यांनी सोशल मिडीयाचा विद्यार्थी दशात आवश्यक तेच हाताळण्याचे व घडामोडी जाणुन घेत बाल कामगार,बाल विवाह मुक्तभारत, घडविण्याचे आव्हान केले. प्रेम द्या प्रेम घ्या बाल कामगार कायद्याचे पालन करण्याचे  मत व्यक्त केले. राजश्री मॅडम यांनी सर्वांना बाल विवाह मुक्त भारत करण्याची शप्पत दिली उपस्थीतांनी हि शप्पत घेतली.बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर यांनी एकल कुंटूब बालका साठी शासनाच्या योजनाची माहीती दिली व दत्तक योजनाचे लाभ घेण्याचे आवाहन केले,शंकर वाघमारे समन्वक जिल्हा प्रकल्प यांनी विशेषता मुलींना सोशल मिडीयाचा वापर शक्योतोर टाळण्याचे आव्हान केले यामुळे मुलीना चुकीची माहीती देऊन त्यांचे शोषण होण्याची भीती असते असे सांगितले.प्रास्ताविक राज्य संघटक नितीन वाकोडे यांनी केले,सुत्र संचालन संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुशिला किशोर मेश्राम यांनी केले आभार प्रदशन रौनक अली बार्शिटाकली अध्यक्ष यांनी केले.शहरी,ग्रामिण भागातुन विद्यार्थी व पालक वर्ग संख्येंने हजर होतेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मदिप नंदागवळी,श्याम सोनोने,संतोष लबडे,कोमल नाईक,प्रभु इंगळे,दुर्गेश दामोदर,रुपेश थुल,सुमित वैद्य,योगेश आठवले,शेख रहिम, विशाल गजभिये,संदिप सावळे,यांनी परीश्रम घेतले व यशस्वी केले असे प्रसिध्दी प्रमुख गणेश सावळे यांनी कळविले. 

।।।। श्रमिक हिताय श्रमिक सुखाय ।।।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *