लोकनेते दि बा पाटील आणि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा अधिकार?

बातमी शेअर करा.

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आंदोलन आता ऐन भरात आले आहे.आगरी कोळी कराडी ओबीसी समाजाने लाखोंचा मोर्चा काढूनही सरकारला पाझर फुटत नाही.देशातील सर्वच महापुरुषांच्या बाबतीत भाजप सरकारची भूमिका संदिग्ध स्वरूपाची राहिली आहे.मालवण समुद्र किनारी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला.यातला भ्रष्टाचार जगासमोर आला.परंतु त्यानंतर भाजपा समर्थक अनेक लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अपमानकारक जाहीर वक्तव्ये पहिली? तर या लोकांच्या मनात एक आणि ओठात दुसरेच दिसते.अलीकडे नव्याने उभारलेल्या छत्रपतींच्या पुतळ्या जवळील जमीन खचली आहे.यामध्ये भ्रष्टाचार आहेच, परंतु छत्रपती शिवराय यांच्याबद्दल,यांना आदर का नाही? असा प्रश्न साऱ्या शिवप्रेमी महाराष्ट्राला पडला आहे.

   लोकनेते दि बा पाटील साहेब आपल्या जीप वर छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा अभिमाने मिरवीत असत.ती आगरी कोळी ओबीसी सामाजिक हक्कांच्या लढ्याची प्रेरणा होती.आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या बाबतीत जी शासकीय भूमिका समोर आली.त्यानंतर लोकनेते दि बा पाटील यांच्या बाबतीत सरकारच्या मनात काय असावे?.असा प्रश्न आगरी कोळी कराडी बांधवांच्या मनात येत आहे.लोकसभा विधानसभा निवडणुका संपल्या.सरकारने विमानतळाचे नामकरण लोकनेते दि बा पाटील असे केले नाही.आमचे बरेचसे आमदार आणि मंत्री भाजपात आहेत.त्याचा प्रभाव कमी पडतोय का?

लोकनेते दि बा.पाटील यांनी तरुणांसाठी खूप मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे.सर्वात प्रथम महाराष्ट्रातील समस्त ओबीसी तरुणांचे ते नेते आहेत.“राखीव जागा”हे आरक्षणावरील छोटेखानी पुस्तक त्यांच्या ओबीसी नेते म्हणून दूरदृष्टीचे प्रतीक आहे.वर्तमान आगरी कोळी नेतृत्वाकडे ही आरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टी दिसतच नाही.हिंदू वैदिक धर्माने आम्हाला मनुस्मृती,चातुवर्ण्यानुसार शिक्षण आणि नोकऱ्या, राजकारण यातील प्रतिनिधित्व नाकारले होते.लोकनेते दि बा.पाटील हे या हिंदू  धार्मिक विषमते विरोधात आमचे राष्ट्रीय नेतृत्व करीत होते.ओबीसी साठी सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय देणाऱ्या मंडल आयोगाचे ते खंदे समर्थक नेते होते.त्यानंतर आम्ही असा नेता घडवू शकलो नाही.तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, राज्य आणि देशपातळीवर यामुळे मिळू लागल्या.ज्यांना लोकनेते दि बा पाटील यांची आरक्षण समर्थनाची भूमिका मान्य झाली नाही.ते वैदिक हिंदुत्वाचे समर्थक झाले.

    ओबीसी तरुणाईच्या उत्कर्षाच्या विरोधात गेले.त्यांचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे.आजही आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते लोकनेते दि बा पाटील यांचे विरोधकच आहेत.जरी जातीने आगरी कोळी कराडी ओबीसी असले तरीही.सिडको जेएनपीटी ओएनजीसी येथे आक्रमक आंदोलने करून “प्रकल्पग्रस्त” शब्दाला छत्रपती शिवरायाच्या तलवारीची धार देणारे खरे शिवप्रेमी दि बा पाटील आहे होते.सिडको कामगार युनियनचे नेते माझे मित्र विनोद पाटील यांनी साऱ्या महाराष्ट्राला सागितले की जी प्रतिष्ठा प्रकल्पग्रस्त शब्दाला नवी मुंबई रायगड मध्ये आहे.ती देशात कुठेही नाही.यामुळेच सरकारी नोकऱ्यांच्यामुळे जीवनात प्रगती साधलेल्या सर्वच सरकारी नोकरी करणाऱ्या आगरी कोळी निवृत्त कर्मचाऱ्यांनी सरकारची भिती न बाळगता आता आंदोलनात उतरले पाहिजे.२०१३ साली लोकनेते दि बा पाटील यांचे निधन झाले.तरूणांसाठी कायद्याने लोकसभेत विधानसभेत आणि रस्त्यावर लढणारा लोकनायक हरवला.याचवेळी साडेबारा टक्के पुनर्वसन कायद्याचे विकसित रूप असलेला नवा भूसंपादन कायदा २०१३ केंद्र सरकारने आणला.सेझ, सिडको,खोत सावकार,चिरनेर जंगल लढ्यात लढणाऱ्या आगरी कोळी कराडी लोकांचा विजय या कायद्यातून दिसतो.असे असताना हा कायदा गुंडाळण्यात सरकार आणि आमच्या आगरी कोळी नेतृत्वाला विकृत यश आले.

   २०१३ या नव्या भूसंपादन कायद्यानुसार एखादा प्रकल्प आला तर त्या प्रकल्पाचा सामाजिक आघात अहवाल जिल्हाधिकारी यांनी तयार करायचा असतो.त्यानुसार प्रकल्पबाधित कुटुंबाला प्रकल्पग्रस्त दाखले आणि सरकारी नोकऱ्या मिळणे हा त्यांचा अधिकार झाला.लोकनेते दि बा पाटील.नसल्याने लोकांसाठी प्रामाणिक असलेले राजकीय नेते ,सिडकोचे दलाल झाले.त्यांनी फायद्याचा असलेले २०१३ भूसंपादन कायद्यातील सरकारी नोकऱ्यांचे अस्तित्व सापविले.हा कायदा नाकारून.आगरी कोळी तरुणाईचा घात झाला.आज साडे बावीस टक्के धोरणात प्रकल्पग्रस्त दाखले सरकारी नोकऱ्या नाहीत.तरीही यासाठी न्यायालयात लढणार नाही.असे लोकांकडून लिहून घेणारे सिडको अधिकारी,आमचे राजकीय नेते डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्याप्रमाणे, सिडको प्रकल्पग्रस्त तरुणांच्या टाळूवरील लोणी खात होते.आहेत.

  आज विमानतळाची मालकी अदानी कडे आहे.खाजगी क्षेत्रात ओबीसी आरक्षण नाही,आणि प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी लोकांच्या नोकऱ्याही नाहीत.आपल्याच जात बांधवांना फसवून श्रीमंत शेठ झालेले राजकीय नेतृत्व हा आगरी कोळी कराडी समाजाला लागलेला महारोग आहे.प्रामाणिक राजकीय नेतृत्वासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे.आमचे नेते लोकनेते दि बा पाटील यांच्या सारखे,शिक्षण आरक्षण आणि प्रकल्पग्रस्त तरुणाच्या सरकारी नोकऱ्या.आणि व्यावसायिक अधिकारांसाठी लढले पाहिजे.आमच्या हक्कांच्या खडी,रेती व्यवसायांना संपविणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य राजकीय नेतृत्व स्थानिक आमदार खासदारांना घेऊनच आमच्यावर उलटले आहेत.त्यांना ओळखा.लोकनेते दि बा पाटील याचा विचार समजून घ्या.मग आंदोलन करा.वास्तव पहा.डोके गर गर फिरू लागेल.

जय दिबा.

राजाराम पाटील ८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *