वेणी येथील बौध्दांच्या स्मशानभूमीवरिल अतिक्रमण हाटवण्याच्या मागणीसाठी २३ बौध्द महिलांचे अन्नत्याग आंदोलन 

बातमी शेअर करा.

जातीयवादी सरपंच,ग्रामसेवकावर कार्यवाही करा ! 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- वेणी तालुका लोणार येथील बौध्द मशानभूमीवरिल सरपंच व ग्रामसेवक यांनी हुकुमशाहीच्या जोरावर गावातील गावगुंडांना हातासी धरून २० वर्षा पासून बौध्दांच्या ताब्यात असलेली मशानभूमी त्या मशानभूमीवर जातीयवादी सरपंच व ग्रामसेवक यांनी या स्मशानभूमीवर अतिक्रमण केले आहे.हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी वेणी येथील २३ बौध्द महिलांनी अन्नत्याग आंदोलन बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बुलडाणा येथील टिळक नाट्य मंदीराजवळ ११ जून २०२५ पासून २३ बौध्द महीला या अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आहे.लोणार तालुक्यातील वेणी गावातील बौध्द स्मशानभूमीतील नियोजीत जागा ही बौध्द समाजाची आहे. सदरील जागा तात्काळ महसूल प्रशासनाने मोजमाप करून स्मशानभूमीसाठी हस्तगत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

  वेणी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, वेणी गावातील गट नं. १९५ मध्ये मागासवर्गीय बौध्द समाजाची स्मशानभूमी आहे.यासंबंधी ग्रामपंचायत वेणी रेकॅार्डला ८ अ नोंदनी आहे. जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार सदर स्मशानभूमीची अभिलेखात नोंद आहे. बौध्द समाजाची जागा २० वर्षांपासून बौध्द समाजाच्या ताब्यात आहे. यामध्ये वॅालकंपाऊंड तयार करून निळा झेंडा लावण्यात आला आहे असे असतांना, सदर गावातील जातीयवादी सरपंच व सचिव यांनी लोकसंख्येच्या बळावर सदर बौध्द समाजाच्या स्मशानभूमीची जागा स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करून संख्येच्या बळावर ठराव मंजूर करून घेतला. सत्तेचा वापर करून पोलीस संरक्षण घेऊन सदर बौध्द समाजाची जागा हे सरपंच ग्रामसेवक हे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे मनसुबे करत आहे. सरपंच हे स्वतःच्या कर्तृत्वात कसूर करीत आहे. त्यामुळे सरपंचावर व ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी तसेच वेणी गावातील जातीयवादी सरपंच यांनी ५० ते १०० गावगुंड मुलांच्या टोळ्या बौध्द वस्तीमध्ये लाठ्या काठ्या घेऊन मारण्यासाठी पाठवीतात. त्यामुळे बौध्द वस्तीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वेणी या गावाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.तरी बौध्द समाजाची ग्रामपंचायतने दिलेली नियोजीत २० वर्षी पासूनची ताब्यात असलेली जागा बौध्द समाजाच्या ताब्यात असून त्यावर निळा झेंडा व तार कंपाऊंड काढण्यात येऊ नये व वेणी गावातील बौध्द समाजाच्या शाळकरी मुलांवर, गावातील प्रतिष्ठितवर व महिलांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर मनिष जाधव,पंकज वाघ, प्रविण राजगुरू,मिना वाघ,वर्षा जाधव,सुनिता सरदार,वर्षा वाघमारे,गौतम वाघमारे, शोभा जाधव, बेबी वाघमारे,शुशिला वाघमारे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.प्रशासनाने वेळीच ताबडतोब दखल घ्यावी जो पर्यंत बौध्दांची स्मशानभूमीची जागा ताब्यात देत नाही तो पर्यंत जीव गेला तरी चालेल पण काळे तोंड आम्ही दाखविणार नाही असा इशारा उपोषण करत्या महिलांनी दिला आहे.

पत्रकार बाबासाहेब जाधव ९४२२५९१३२१,बुलढाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *