
“लोकनेते दि बा पाटील “हा आमच्या अस्मितेचा विषय,आगरी कोळी भंडारी कराडी अर्थात ओबीसी एससी एसटी या समस्त मागासवर्गीयांच्या अस्तित्व सिद्ध करण्याचा विषय झालाय.आगरी कोळी कराडी भंडारी लोकांच्या सामाजिक, आर्थिक,राजकीय आणि धार्मिक अधिकारांचा तो धगधगता ज्वालामुखी आहे.हजारो वर्षांची धार्मिक गुलामगिरी झुगारण्याचे काम ज्या महापुरुषांनी केले त्यातील आगरी कोळी समाजातील लोक कधीच मागे नव्हते.अर्थात धर्म चिकित्सा करणारे दि बा पाटील सूक्ष्मपणे समजून सांगणारी लेखक साहित्यिक मंडळी ओबीसी समाजात दिसत नाहीत.धार्मिक गुलामगिरी ही ओबीसींची वर्तमान कालीन खास ओळख आहे.
ब्राह्मणाचा जन्म हा ब्रम्हदेवाच्या मुखातून झाला.क्षत्रियांचा जन्म ब्रम्हदेवाच्या दंडातून,तर वैश्य व्यापाऱ्यांचा मांड्यातून झाला.आगरी कोळी ओबीसींचा पायातून झाला.भारतातल्या हिंदूंचे अनैसर्गिक उत्पत्तीशास्त्र जगात कोणालाही पटत नाही.तरीही ते ब्राह्मणी तत्वद्न्यान आजही ओबीसी नेतृत्व नाकारत नाही.हीच आमची गुलामी आहे.असे महात्मा जोतिबा फुले म्हणाले होते.ती आम्हा आगरी कोळी कराडी भंडारी यांना कमी लेखणारी जन्माधारित मांडणी महात्मा जोतिबा फुले यांनी नाकारली.अर्थात आम्ही आमची गुलामी नाकारणाऱ्या महात्मा फुले यांना मानत नाही. तर आमचा जन्म ब्रम्हदेवाच्या पायातून झाला हे सांगणाऱ्या उच्च जातीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लेखक साहित्यिक,भोंदू बाबा,धर्म गुरु यांना मानतो.आगरी कोळी कराडी तरुणांनी ही गोष्ट समजून घ्यावी.लोकनेते दि बा.पाटील आमच्यासाठी लढत असताना आणि त्यांच्या मृत्यू नंतरच्या विमानतळ नामकरण आंदोलनाला कोणताही हिंदू धर्मगुरु पाठिंबा का देत नाही? आम्ही आगरी कोळी हिंदूच आहोत ना.?
हिंदू समाजाच्या धार्मिक,राजकीय ,सामाजिक विषयात अग्रभागी असणारा आगरी कोळी आज दि बा पाटील विमानतळ नामकरण आंदोलनात एकटा का पडला आहे. आमचे उच्च जातीय हिंदू बांधव गेले कुठे? ज्या केंद्र सरकारकडे आमची मागणी प्रलंबित आहे.ते भाजपाचे सरकार हिंदूंचेच आहे.तरुणांना हा विषय सहज समजावा म्हणून ही वास्तव मांडणी मी सातत्यानं करीत आहे.आम्हाला आमचे जमीन पाणी जंगल समुद्र शिक्षण नाकारणाऱ्या लोकांकडे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावे हा लोकनेते दि बा पाटील यांचा वैचारिक दृष्टिकोन होता.हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र स्त्रिया अल्पसंख्य मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन पारशी समाज हे सारे भारतीय आम्ही भाऊ भाऊ बहिणी बहिणी आहोत.परंतु एक भाऊ दुसऱ्याला हलका कमी लेखून अधिकार नाकारत असेल तर न्यायासाठी अवश्य लढा.तो संघर्ष कायद्याचा, अहिंसक साविधानिक हवा.
लोकशाहीचे पुरस्कर्ते लोकनेते दि बा पाटील होते.चार वेळा आमदार,दोन वेळा खासदार,पनवेलचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते अशा राजकीय जीवनात प्रत्यक्ष रस्त्यावरचा आमच्यासाठी सिडको जेएनपीटी विरुद्ध केलेला संघर्ष ही त्यांच्या देव स्वर्ग आत्मा चमत्कार नाकारून केवळ आगरी कोळी ओबीसीच नाही तर.साऱ्या जगातल्या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या नेतृत्वासाठी आंतरराष्ट्रीय समतेची न्यायाची विचारसरणी आहे.म्हणूनच नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव अतिशय योग्य ठरते.नवी मुंबई विमानतळ हे नवी मुंबई पनवेल उरण या तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक यांच्या २५०० वर्षे जुन्या जागतिक व्यापारी तसेच बौद्ध धम्म प्रचाराचे केंद्र असलेल्या लेणी परिसरात होत आहे.नवी मुंबई विमानतळातील केरुमाता बौद्ध लेणी वाचविण्याचे आंदोलन आम्ही संविधानप्रेमी संघटनांनी सतत २९ दिवस केले होते.कोरोनामुळे पोलिसांनी ते थांबविले.

लोकनेते दि बा पाटील यांच्या समोर एक बुद्ध मूर्ती कायम असायची.या इतिहासामुळेच आम्ही जागतिक व्यापारी होतो.श्रीलंका इजिप्त रोम या देशासोबत जागतिक व्यापार करायचो.संदर्भ १९९३साली प्रकाशित रायगडचे सरकारी गॅझेट होय.हे सांगायचे कारण या देशातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमचे लोकनेते दि बा पाटील यांना आगरी कोळी ओबीसींचे,शूद्रांचे नेते,ब्रह्मदेवाचा पायापासून जन्मलेले आहेत.असेच समजतात.तसे नसते तर सचिन तेंडुलकर या छोट्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला भारत रत्न आणि भारतातल्या समस्त प्रकल्पग्रस्त लोकांसाठी साडे बारा टक्के पुनर्वसित भूंखडाची योजना कायदा म्हणून स्वातंत्र्या नंतर आणणाऱ्या दिबा ना महाराष्ट्र भूषण, भारत रत्न,पद्मपुरस्कार यांनी कधीच गौरविले असते.सम्राट अशोक ते छत्रपती शिवराय यांचा जागतिक व्यापार,आंतरराष्ट्रीय राजकारण हा आगरी कोळी भंडारी ओबीसी समाजाचा इतिहास आहे.आमच्याच जमिनीत घुसलेला अदानी बाहेर काढायला फार वेळ इथल्या भूमिपुत्रांना लागणार नाही.नाव तर द्यावेच लागेल.परंतु लोकनेते दि बा पाटील यांनी दाखविलेल्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी लोकांच्या कामाचे काय?
ओबीसी विरोधी हे सरकार कसे आहे ते तुम्हास समजले असेलच .स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत महानगर पालिका इथल्या निवडणुका राज्य आणि केंद्र सरकार घेत नाही.सिडको महानगर पालिका नगरविकास खाते यात बसलेले नवे वसंत दादा पाटील (माजी मराठा मुख्यमंत्री) आता एकनाथ शिंदे आमचे कोळीवाडे गावठाणे तोडत सुटले आहेत.आमची घरे,गावठाणे अनधिकृत,अतिक्रमित ठरविनारी ही त उच्च जातीची आययेएस मंडळी,जिल्हाधिकारी कोण आहेत?. दि बांची साडेबारा टक्के,विमानतळातील साडे बावीस टक्के,नैना,सेझ,जेएनपीटी,मच्छीमार पुनर्वसन, महामार्ग पुनर्वसन येथे आमच्या जमिनी कोण खात आहे?. आता लढणारे दि बा पाटील प्रत्येक घरात ,प्रत्येक तरुण तरुणीत दिसले पाहिजेत.अन्यथा आमची गावठाणे तोडून त्यांचा एस आर ये क्लस्टर करून कोट्यवधी रुपये लुटणारे ठाण्यात आम्हीच आमच्या डोक्यावर बसवले आहेत.
सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक यांना इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी लोकावर होणारा अन्याय समजला आहे.लोकनेते दि बा पाटील ही नामकरण आंदोलनाची कमाई आहे.विषमता समजून समता आणणारा वनमंत्री गणेश नाईक यांना कळलेला तो क्रांतिकारी विचार नवमतदार असलेल्या आगरी कोळी कराडी भंडारी शूद्र अतिशूद्र तरुणाईला समजावणे ही सर्वाची जबाबदारी आहे.घर घर दिबा.गावागावात दिबा. मनामनात दिबा.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३,उरण जिल्हा रायगड.
