
विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजात शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत असते. परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण मिळालेल्या प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि त्यांचे अभिनंदन करावे तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणे हा त्या मागचा उद्देश असतो.या गुणगौरव कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातील काही विशिष्ट लोकांकडून आकर्षक वस्तूंचे बक्षीस स्वरूपात विविध वस्तूंचे वाटप केले जाते त्याबद्दल सर्वांचे आयोजकां कडून मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद मानले जातात.पण त्यासाठी शिक्षण संस्था कशी असावी तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिका आणि कमवा हा संदेश ते सुरवात पासून देतात.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात विविध जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वैचारिक दृष्टीने आणि विकासात्मक दृष्टीने प्रगल्भ,परिपक्व आणि गुणवंत होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील सुशिक्षित,उच्चशिक्षित,उच्चविद्याविभूषित,विद्वान आणि हुशार,प्रतिभावंत,प्रभावशाली,प्रतिष्ठित विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या,शैक्षणिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक असणाऱ्या लोकांना तसेच विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदराने सन्मानाने आमंत्रित केले जाते आणि प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देतात सोबतच शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर मार्गदर्शन करतात.
भावी पिढीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याऱ्या अशा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नतीचा मार्ग शोधावे या बाबतीत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.येणाऱ्या भावी तरुण पिढीचे वैचारिक नुकसान होऊ नये यासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आणि कार्यक्रमाच्या जबाबदार जाणकार आयोजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा.संबंधित विभागातील, संबंधित जिल्ह्यातील बुद्धिमान, अभ्यासू,कर्तृत्ववान,दिग्गज अनुभवी समाज नेत्यांनी,बुद्धिप्रामाण्यवादी,बुद्धिवान तसेच स्वाभिमानी आणि धडाकेबाज, कर्तृत्ववान अशा युवक नेत्यांनी तसेच विविध पदावर सन्मानाने विराजमान असणाऱ्या जबाबदार, कर्तबगार,अभ्यासू पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात स्वाभिमानाने आणि अभिमानाने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शालेय विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे मार्गदर्शन करतांना शिक्षणा बरोबरच आईवडीलांचे महत्व,स्वाभिमानाने, अभिमानाने जगण्याचे सुद्धा महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे.विद्यार्थी कसा असावा तर राजा मिलिंद सारखा तर शिक्षक कसा असावा तरभिख्खू नागसेन सारखा त्यासाठी तुम्हा मिलिंद प्रश्न हा महान ग्रंथ वाचवा लागेल.

विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला देणे,शारीरिक,मानसिक,वैचारिक दृष्टया परिपक्व होणे,आपल्या जन्मदाते आईवडीलांची सेवा करणे त्यांची काळजी घेणे आपले जन्मदाते आईवडील हेच आपलं दैवत असून आईवडीलांपेक्षा कोणताही पुढारी मोठा नसून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात असतांना आणि तारुण्य अवस्थेत असतांना सुद्धा स्वाभिमानाने जगावे कोणत्याही पुढाऱ्यांचे,नेत्यांचे लांगुलचालन,हांजी हांजी आणि मागेपुढे,उदोउदो अजिबात करु नये तरुणांनी अगोदर आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी स्वतःचे आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करण्यासाठी छोटा मोठा उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा.
आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुभवानुसार एखादी नोकरी सुद्धा शोधावी कोणाच्याही मागे पुढे करण्यात आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये असे परखडपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून आजच्या वयातील शालेय विद्यार्थी भविष्यात तरुण झाल्यानंतर स्वाभिमानाने नक्कीच जगायला शिकेल पर्यायाने आईवडीलांचे नाव मोठं करेल.आईवडीलांची खरी संपत्ती तर कमावता,आज्ञाधारक, सुसंकृत,उद्यमशील आणि व्यवहारी मुलगा आहे असं मी मानतो त्यासाठी समाजात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अशा वैचारिक दृष्टीने विविध विषयांवर समाज प्रबोधन करावे समाजात असे कार्यक्रम आयोजित करणारे बुद्धिमान विद्वान हुशार मंडळी समाजात भावी पिढी वैचारिक दृष्टीने परिपक्व घडविण्यासाठी विचार मंथन,समाज चिंतन करतील अशी अपेक्षा आहे.
प्रमोद सूर्यवंशी :-8605569521.चिखली,मातृतीर्थ बुलडाणा
