-बौद्ध धम्म प्रचारासाठी विशेष शिबिर व पुढील कृती आराखडा ठरवीला,

हिमाचल प्रदेश प्रशिक सम्राट यांस कडून जागतिक धम्म गुरू आणि शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे परम पावन दलाई लामा जी यांची भेट भारतीय बौद्ध महासभेच्या शिष्टमंडळाने दिनांक २० जून २०२५ रोजी धर्मशाला येथील निवासस्थानी घेतली, या शिष्टमंडळाचे नेतृत्व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. त्यांच्यासमवेत जयभीम मिशनचे डॉ.राजेंद्र पाल गौतम,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कॅप्टन प्रवीण निखाडे (ट्रस्टी/आंतरराष्ट्रीय सचिव),अँड.एस.के.भंडारे (ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख), अँड.एस.एस.वानखडे (राष्ट्रीय सचिव/केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख), पद्माकर गणवीर (राष्ट्रीय संघटक), मल्लिकार्जुन भालके (राष्ट्रीय संघटक) तसेच कर्नाटक राज्याचे एस.सिद्धराजू, एम.सी.शिवराज, केसरी,संदीप आर्या,भीमराव सावतकर,त्रिभुवन गुरुजी,प्रवीण साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते,या भेटीदरम्यान दलाई लामा जी यांनी भारतीय बौद्ध समाजाच्या कार्याचे कौतुक करताना धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी नवे विचार आणि मार्गदर्शन दिले. त्यांनी जागतिक स्तरावर शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश पोहोचवण्यासाठी भारतीय संघटनांना अधिक संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.भेटीसोबतच दिनांक १८ जून २०२५ ते २० जून २०२५ दरम्यान धर्मशाला येथे भारतातील प्रमुख बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधींचे तीन दिवसीय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात भारतामध्ये बौद्ध धम्म कसा गतिमान करावा?’ या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली,पुढील काही वर्षांसाठी कार्ययोजना ठरवण्यात आली असून शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे, डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यावेळी सांगितले की, “बौद्ध धम्म हा मानवतेचा धम्म आहे. बाबासाहेब डॉ.आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आपण भारतीय समाजात शांती, बंधुता आणि समता रुजविण्याचे कार्य पुढे नेणार आहोत.” यावेळी उपस्थित सर्व प्रतिनिधींनी बौद्ध धम्म प्रचारासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यास व विविध राज्यांमध्ये जनजागृती मोहीमा राबविण्यास एकमताने संमती दिली,ही भेट व शिबिर भारतीय बौद्ध चळवळीच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक ठरली असून येत्या काळात या चर्चांचा सकारात्मक परिणाम देशभर पाहायला मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रशिक सम्राट 816941365,मुंबई.