
३० जून रोजी होणाऱ्या जनसुरक्षा विधेयका विरोधात मोर्चा मधे मा.शरद पवार, मा.उद्धव ठाकरे,मा.जयंत पाटील,मा.विजय वडेट्टीवार,मा.अबू आझमी,मा.अंबादास दानवे सहभागी होणार असून सदर हुकूमशाही विधेयक विरोधी लढा मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मधे आझाद मैदानावर सदर मोर्चा काढण्यात येणार असून तिथेच निषेध सभा घेण्यात येईल.सर्व लोकशाही मानणा-या व संविधान प्रेमी नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ने केले आहे.हे विधेयक सरकारला जाब विचारणा-या,सरकारी निर्णय,धोरणास विरोध करणाऱ्या सर्व नागरिकांची मुस्कटदाबी करणारे आहे.ही हुकूमशाहीची दिशा आहे. सरकारच्या मनमानी चा तीव्र निषेध करण्यासाठी सदर आंदोलनात उतरणे आवश्यक आहे.
सागर तायडे यांस कडून