आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांच्या ६ ऑक्टोबर ७० व्या वाढदिवसाच्या निमित्याने विशेष लेख

श्रमिकांचे शोषण व विभाजन करणाऱ्या ब्राम्हणशाही,भांडवलशाही,गांधीवादी अर्थव्यवस्था व साम्राज्यवादा विरुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ ध्येयनिष्टपणे, जिद्धीने पुढे नेणारे आदरणीय जे.एस पाटील. साहेब आज भारतातील बहुजन समाजातील कामगर कर्मचारी अधिकारी यांना दिशा दाखवण्याचे काम मिशनरी पद्धतीने करत आहेत.मी १९८२ पासून असंघटीत नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे काम करत आलो आहे.त्या असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व संघटनांना अनेकदा एकत्र करून कृतिसमिती,सुरक्षा परिषद बनवल्या,इंटक,आयटक,सिटूच्या राष्ट्रीय नेत्या बरोबर अंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे त्यांची आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्याची काम करण्याची पद्धत जवळून पहिल्या गेली.पण समस्या काय आहे.ते सोडविण्यासाठी काय केले पाहिजे.याचे कोणते ही अभ्यासपूर्ण नियोजन न करता मोर्चा,आंदोलन करून आंबेडकरी विचारांचा जय जय कार करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तडजोडी करणारे सामाजिक,धार्मिक आणि राजकीय नेते पायलीचे पंधरा पाहायला आणि अनुभवाला मिळाले. पण क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करणारे कंदील घेऊन शोधावे लागतील. संविधानाच्या चौकटीत राहून पंचशिलेचे पालन करणारे व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाला संघटनेच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते,पदाधिकारी बनविणारे एकमेव क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारे ध्येय निष्ट कामगार नेता.क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा कामगार नेता “मूर्ती छोटी किर्ती मोठी” म्हणजेच आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय.एल.यु) व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार, मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेते म्हणून राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता.क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा कामगार नेता अशी त्यांची लक्षवेधी ओळख निर्माण झाली आहे.
सुरक्षित नोकरी करणारे आरक्षण लाभार्थीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रातील तळागाळातील संघटीत असंघटीत कामगारांचे आशास्थान सन्मानीय जे.एस.पाटील साहेब आहेत. उत्तर भारतात बहुजन समाजात मान्यवर कांशीराम यांनी प्रबोधन करून प्रचंड राजकिय जागृती निर्माण केली होती.त्यामुळेच मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या होत्या.आपल्या राजकीय मूल्यांबाबत उघडपणे भरभरून बोलणारा बहुजन समाज मुख्यतः कर्मचारी-कामगार वर्ग हा फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याबाबत मात्र अगदीच उदासीन असल्याचे उत्तर व दक्षिण भारतात दिसून येतो.तिथे तो बहुसंख्या बहुजन समाजातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात गोळवलकर,गांधीवादी,साम्यवादी कम्युनिस्ट विचारांच्या ट्रेंड युनियन मध्ये किर्याशील सभासद असल्याचे दिसून येते.प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेली ब्राम्हणवाद्यांची मक्तेदारी, त्यांच्या प्रस्थापित संघटना व मागास-बहुजन कामगारांवर पिढ्यानपिढ्या लादलेली सामाजिक विषमतेची व्यवस्था ही बहुजन समाजामध्ये फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीत संघटित होण्याविषयी भीती निर्माण करते.ही भीतीच सर्वप्रथम दूर करण्याचे लक्षवेधी प्रबोधन क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणाऱ्या ध्येय निष्ट कामगार नेता.आदरणीय जे.एस.पाटील यांनी केले आहे.त्यामुळेच उत्तर भारतात व दक्षिण भारतात स्वतंत्र मजदूर युनियनची पाळेमुळे आज घट्ट होतांना दिसत आहेत.

भारतातील ब्राम्हणवाद दरवर्षी शोषण करण्याची माध्यमे बदलत असतो.व्यवस्थेचे परिवर्तन मान्य नसल्याने शोषितां साठी वरवरचे बदल तो स्वतः घडवून आणतो.बहुजन कामगारांनी आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी स्वतंत्र ‘ट्रेड युनियन’ स्थापन न करता ब्राम्हणवाद्यांचेच नेतृत्व स्वीकारावे म्हणूनच वेल्फेअर असोसिएशन,फेडरेशनचा फार्स ब्राम्हणवाद्यांनी निर्माण केले आहेत. हे सर्वप्रथम स्पष्टपणे मांडण्याचे काम माननीय जे.एस.पाटील यांनी केले आहे, त्यामुळेच ते देशातील क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता. आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता म्हणून ओळख निर्माण होऊन एक ध्येयवादी त्यागी नेतृत्व म्हणून पुढे येत आहे.
फुले-शाहू,आंबेडकरवादी विचारांची देशव्यापी ट्रेड युनियन निर्माण होईल व ती राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन महासंघानां आव्हान निर्माण करील असे कोणालाही वाटले नव्हते,मान्यताप्राप्त प्रस्थापित ट्रेंड युनियनच्या विरोधात म्हणजेच ब्राम्हणवादाला थेट आव्हान देणारी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ आता संपली असे स्वप्न पाहणारे अचानक खडबडून जागे होतांना दिसत आहेत.कारण क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता आज क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक कामगार,कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात साथ देत आहे.म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून एक देशव्यापी मजबूत कामगार चळवळ बनली आहे.
क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता.क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा कामगार नेता जे एस पाटील यांच्या कुशल संघटक,वकृत्व आणि नेतृत्वाने,मिशनरी बाण्याने,मोठ्या जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन उभी राहत आहे.देशभरातील मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कामगार कर्मचारी जागरूक होऊन स्वतःच्या ट्रेंड युनियन स्थापन करून आय एल यु शी संलग्न करीत आहेत.एखादया क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर लोक भेटतील पण क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन उभी करण्यासाठी जीवाचे रान करणारा इंजिनियर एखादाच भेटेल.
प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगार,कर्मचाऱ्यांना संघटित करून संघर्ष करण्यास तयार करणारा अधिकारी कुठेही भेटणार नाही.कामगारांना संघटित करून युनियन बनविली म्हणून बदली झाली,तर सुवर्ण संधी म्हणून नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करणारा इंजिनियर अधिकारी अशी ओळख निर्माण करणारा माणूस सेवा निवृत्तीनंतर घरी बसून नातवांना खेळवत बसला असतात.पण सेवा देत असतांना कामगार कर्मचाऱ्यांचे संघटना बांधणी करून प्रशिक्षित कार्यकर्ता,पदाधिकारी निर्माण करणारा माझ्या दृष्टीने एकमेव नेता म्हणजेच जे एस पाटील साहेब असावेत.म्हणूनच मी त्यांना क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता असे म्हणतो.

मी अनेक राजकीय नेते,सामाजिक नेते,प्रशासकीय आय ए एस,आय पी एस,आय आर एस अधिकारी पाहिले,जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटना पक्ष बांधणी करतात,तेव्हा ते तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून फिरतात.तेव्हा कुठे त्यांचे थोडे फार नांव राहते.इथे पाटील साहेबांचे उलटे आहे. पायाला जरूर भिंगरी आहे,पण तोंडात साखर नाही,रोखठोक शब्दांत शिस्तबद्ध पध्दतीने काम करण्याची तंबी आहे,डोक्यावर बर्फ नाही तर सकारात्मक विचारांची प्रचंड ऊर्जा आहे.भावनिकता बिलकुल नाही,आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी भाषे सोबत सनदशीर मार्गाने आचरणाचे हमी हवी आहे. भारतीय संविधानात दिलेल्या प्रशासकीय कामाचा दर्जा वेळोवेळी दिली जाणारी जबाबदारी तिचा तिमाही,सहामाही,वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर केलेला अहवाल सादर करण्यात कोणतीही सबब चालत नाही,प्रशिक्षण शिबिरात वेळेवर न येणाऱ्याला प्रवेश नाही.म्हणजेच नाही,असे कडक शिस्तीचे क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचे नेते सर्वच क्षेत्रात निर्माण झाले असते तर आंबेडकरी समाज हा शासन कर्ती जमात शंभर टक्के झाला असता.आणि क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाली असती.
हजारो लोकांना गोळा करून संघटना स्थापन करून चालविण्या ऐवजी शंभर लोक रीतसर सभासद बनवून केलेलं काम निश्चितच ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असते. त्यासाठी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण नियमितपणे झाली पाहिजे.समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी आदरणीय जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन काम करते. त्यात देशभरातील संघटित असंघटित कामगार संघटना संलग्न होत आहेत,देशात ७ टक्के संघटित कामगार आहेत तर ९३ असंघटित कामगार आहेत. जे बहुसंख्येने एस सी,एस टी,ओबीसी, आदिवासी अल्पसंख्यक आहेत.९३ टक्क्यातील ३० टक्के कामगारांना आम्ही राष्ट्रीय पातळीवर संघटित केल्यास राजकीय क्रांती घडवू शकतो. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार,कर्मचारी अधिकाऱ्यांनी संघटित व्हावे.आणि ध्येयनिष्ट,त्यागी,जिद्धी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या कामगार नेत्याचे हात मजबूत करावे, आदरणीय जे एस पाटील यांच्या (जन्म ६ ऑक्टोबर १९५५) ७० वर्ष पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०१७ पासून मी त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.त्या अनुभवावर हा लेख लिहला आहे.
लाखो कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची साधी राहणी, उच्च विचार आणि शुद्ध आचरण हे कौतुकास्पद आहे.कोणत्याही पोस्टरवर,होडिंग वर फोटो टाकून प्रचार प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करणारे नेते शोधून सापडणार नाहीत,अशा कडक शिस्तीच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेंड युनियनचे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता.क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता.म्हणजेच आदरणीय जे एस पाटील साहेब यांनी जे निर्माण करून ठेवले. ते एकाही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी ६० वर्षात केले नाही.त्यांनी व्यक्तिगत आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती केली असेल.पण संघटनेची संस्थेची साधन संपतीचे काय?. स्वताचे मालकी हक्काचे एक कार्यालय किंवा सभागृह नाही.मात्र क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेते जे.एस पाटील यांच्या कुशल त्यागी जिद्धी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे बांद्रा मुंबईत म्हाडा कार्यालयासमोर सुप्रभात बिल्डींग मध्ये करोडो रुपयाचे कार्यालय आहे.नागपूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी निलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट सीताबर्डी येथे मध्यवर्ती कार्यालय व १०० लोक बसतील एवढे सभागृह आहे.प्रेरणा नगर, हजारी पहाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत आहे.त्यात एक हजार लोकांचे सभागृह, पाचशे,तीनशे लोकांचे वातानुकूलित सभागृह आणि दोन व्ही आय पी,सूट,सहा,आठ लोकांसाठी स्पेशल खाटची व्यवस्था,पाहुण्यांसाठी दोन खाटांचे आठ रूमची व्यवस्था आहे.कामगार कर्मचारी अधिकारी नागपुरात कामा निमित्याने आला तर हॉटेल लॉज वर राहण्याची गरज नाही.असेच प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत शरणापुर औरंगाबाद संभाजी नगर येथे सुसज्ज वातानीकुलित रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्र आहे.एका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बळावर हे निर्माण झाले आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न युनियनचा काही प्रमाणात त्यात सहभाग आहे.सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने अशा पद्धतीने काम केल्यास प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यात स्वताच्या मालकीचे कार्यालय व सभागृह उभे राहू शकते.आणि क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ शासन कर्ती जमात बनून प्रशासनावर कायम दबाव निर्माण करू शकते.हे केवळ आणि केवळ जे.एस.पाटील,रमेश रंगारी सारखी इंजिनियर प्रशासकीय अधिकारी संघटीत झाल्या मुळे शक्य झाले.त्यात अनेकांचे मोलाचे योगदान आहे.
विसाव्या शतकातील दक्षिण भारतातील प्रमुख नेते वेंकट रामासामी पेरियार यांच्या 17 सप्टेंबर जन्मदिना निमित्याने 12 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या जन्मभूमीत इरोड तामिळनाडू येथे स्वतंत्र मजदूर युनियनच्या 24 राज्यातील 53 संघटनांची सेंट्रल वर्किंग कमिटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.ही ऐतिहासिक कामगिरी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता यांच्यामुळे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहली जाणार आहे.
आज वयाची ७० वर्ष पूर्ण झाल्यावर ही जे एस पाटील घरात न बसता मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी आणि विशेष असंघटीत कामगारांना संघटीत करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कोणते ही कारण न सांगता राज्यात आणि देशात स्वतंत्र मजदूर युनियन मजबूत करण्यासाठी फिरतात.म्हणूनच क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ पुढे नेणारा ध्येय निष्ट कामगार नेता.आणि क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता असे मी लिहतो. त्यांच्या त्या कष्ट,त्याग व जिद्धीला ७० व्या वाढ दिवसाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि लाख लाख हार्दिक मंगल कामना करतो.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबईअध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,

