विपश्यना साधना कठीण कामाचा पहिला दिवस.

बातमी शेअर करा.

जीवनात सगळचं चुकीचं नसतं,फक्त होकार,नकार आणि माघार कुठे घ्यावी एवढं कळायला हवं.ज्यांनी तुमची धडपड पाहिलीय फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशिबवान माणूस वाटत असतात.बदल हा तर निसर्गाचा नियम आहे फरक इतकाच आहे की,वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस.समाजामध्ये आपली उंची ही फुटावर नाही तर विचारांवर मोजली जाते.  आपले वजन हे किलोवर नाही तर शब्दांवरून मोजले जाते आणि आपली किंमत कमावलेल्या पैशांवर नाही तर कमावलेल्या माणसांवरून केली जाते.विपश्यना केलेल्या माणसांची अशीच एक आगळी वेगळी ओळख दहा दिवस साधना केल्यानंतर तयार होते. तो त्या तप्त पवन परिसरात गेला की त्याचे सर्व सुख सुविधा,मोहमाया,नाते संबंध दहा दिवसा पर्यन्त तुटतात.आणि तो वेगळ्या जगात वावरण्यास सुरवात करतो.

   पहिल्याच दिवशी आचार्य श्री.सत्य नारायण गोयंका गुरुजी त्या साधकांना तुम्ही कोणत्या मेहनतीने कुशल कर्म करून इथे पोचला याची महत्वाची माहिती देतात. जगात कोणतीच गोष्ट नित्य नाही. सर्वच अनित्य आहे. जे उत्पन्न होते ते नष्ट होते. कायमस्वरूपी टिकणारे असे कोणते ही काम नाही.म्हणून अशा कठीण कामावर विजय मिळविण्यासाठी इथे आला आहेत.त्यासाठी इथल्या नियमाचे पालन करा. प्रथम कठीण आर्यमौन पाळा.कोणाला ही इशाऱ्याने बोलू नका.स्वता शील पाळत नसाल तर इतरांच्या शीलाचे भंग करू नका.शील पालन केले तरच समाधी लागेल चित्त,मन शांत होऊन प्रज्ञा प्राप्त होईल.त्यासाठी आपल्या आसनावर स्थिर समाधी लावून बसले पाहिजे. मन शांत करून श्वासावर नियंत्रण करावे. प्रथम नाकपुडीतून श्वास आता घेऊन बाहेर सोडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपण नेहमीच अनुभवतो. पण इथे ती वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया करून अनुभवायची असते. मन शांत होते त्यातून शरीरावर नियंत्रण केल्या जाते त्यातूनच आपले मन व शरीर विकार मुक्त होत असते. 

    विपश्यना (Vipassana) ही भारताची एकअत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजाती पासून हरवलेली,आजपासून जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी गौतम बुध्दाने पुन्हा शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की,जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया म्हणजे साधना आहे. कुणी ही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जाती स्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि नश्वरता,दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे.हा संपूर्ण मार्ग धम्म (Dhamma) म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी रीतिरिवाज परंपराशी देणे घेणे नाही.ह्याच कारणामुळे,कुणीही,जात,धर्म.वंश,समाज,राज्य,भाषा किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी,ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो.आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल.विपश्यना अंधश्रध्देवर आधारीत कर्मकांड नाही.ही साधना बौध्दिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही.ही सुट्टी घालविण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही.ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही.सांप्रदायिक कर्मकांड तसेच दुसऱ्या साधना-विधि बरोबर रीतिरिवाज परंपरा यांना तोडून जोडण्यासाठी ही साधना नाही.अनेक साधकांना आचार्य व गुरुजीच्या वणीतून बुद्ध आणि बुद्धाची मानव मुक्तीची उदाहरणे दिली जात असल्यामुळे अस्वस्थ निर्माण होत असते. काही साधकांना आपल्या धर्मा पेक्षा इतर धर्माचे गुणगान आणि सत्य येकने हे सहन होत नाही म्हणून ते काही कारणे सांगून साधना सोडून जातात.विपश्यना शिबिरादरम्यान साधक कोणत्याही अन्य प्रकारची साधना-विधि व पूजा-पाठ,धूप-दीप,माला-जप,भजन-किर्तन, व्रत-उपवास आदि कर्मकांडाचा अवलंब न करणे निश्चितपणे अत्यावश्यक असते. ते सर्व घरी सोडून यात साधना शिबिरात सहभागी व्हावे लागते.दुसरी साधनाविधि किंवा आध्यात्मिक विधि दहा दिवस बाजूला ठेवावी लागते. ह्याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्या साधना-विधि किंवा पध्दती निंदनीय आहेत. बुद्ध त्यावर कधी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगत नाही. किंवा त्यांनी कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.परंतू शुध्द विपश्यना विधिला अजमावून पहाण्याला न्याय देण्यासाठी या सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असते.


    विपश्यनेबरोबर जाणून बूजून दुसऱ्या कोणत्याही साधना विधिचे संमिश्रण करने हानिकारक होऊ शकते. आचार्यांनी वारंवार सूचना देऊनही साधकानी ह्या विधिबरोबर कर्मकांड व दुसऱ्या रीतीचे संमिश्रण केल्याने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले जाते. जर कोणता संभ्रम किंवा प्रश्न असल्यास त्याने आचार्यांना भेटून शंका समाधान करून घेता येते. परंतु मनात शंका कुशंका ठेऊन विपश्यना कारणे शरीराला मनाला हानिकारक होऊ शकते.म्हणूनच पहिल्या दिवशी साधकाच्या शरीरावर मनावर झालेले संस्कार,रिती रिवाज आणि परंपरांचे स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण दिले जाते.त्यांनंतर तो साधक दुसऱ्या दिवशी साधनेला बसू शकतो. तिथूनच शील समाधी प्रज्ञा प्राप्त होण्याची सुरवात होते.म्हणूनचविपश्यना साधना कठीण कामाचा पहिला दिवस म्हटल्या जाते.

सागर रामभाऊ तायडे,992003859,भांडुप मुंबई. 

(विपश्यना साधक 8 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2025)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *