सत्ता मिळाली नाही तर सत्ता हिसकावून घेण्याची ताकद ठेवा ना. रामदास आठवले.

बातमी शेअर करा.

निडर होऊन पँथर सारखी अन्याया विरोधात झेप घ्या

विशेष प्रतिनिधी मुलुंड मुंबई – रिपब्लिकन पक्षाने सत्ता मिळवली पाहिजे सत्तेतील हक्काचा वाटा मिळत नसेल तर सत्तेचा वाटा हिसकावून घेण्याची आपल्यात ताकत असली पाहिजे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत जर एखादी महत्त्वाची जागा सुटत नसेल तर त्या जागेवर स्वबळावर बंड करून निवडून येण्याची ताकद रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे.असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहातील ईशान्य मुंबई जिल्हा निर्धार मेळाव्यात केले.   रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य मुंबईच्या जिल्हा कार्यकर्ताचा निर्धार मेळावा ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे,योगेश शिलवंत,विनोद जाधव,यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यात जिल्हा कमिटी,तालुका कमिटी,वार्ड कमिटी,युवा आघाडी,महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून प्रचंड शक्ती प्रदर्शन केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना नामदार रामदास आठवले साहेब बोलत होते.   

शिवसेना भाजप यांच्यातही युती असून तिकीट वाटपात मोठी भांडण होतात.ती टोकाची भांडणे होऊन त्यांच्या बातम्या होतात.अनेक उदाहरणे अशी आहेत की शिवसेना भाजपने सुद्धा बंडखोरी करून आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणले आहे.सर्व ठिकाणी कार्यकर्त्याचे समाधान होत नाही.मात्र जिथे ताकद आहे तिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटलीच पाहिजे. माझ्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महापालिकेत निवडून येऊन नगरसेवक होताना पाहायला मला आवडेल. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडून येण्याची ताकद ठेवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रभागात काम केले पाहिजे.जुन्या कार्यकर्त्यांनी सळसळत्या रक्ताच्या नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे.आपापल्या भागात सर्व सामाजिक प्रश्नावर आवाज उचलला पाहिजे.लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.अन्याय होत असेल तर तुम्हाला राग आला पाहिजे.आणि त्यातून तुम्ही आंदोलन उभारून जेलमध्ये जायाची तयारी ठेवली पाहिजे. निडर होऊन पँथर सारखी अन्याया विरोधात झेप घ्या असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले. 

बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट नुसार त्यात चार ट्रस्टी हिंदू आहेत बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे फक्त बौद्धांचे आहे त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे ट्रस्ट बौद्धांना दिले पाहिजे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुरोगामी विचारांचे आहेत त्यांच्यावरही ऐतिहासिक जबाबदारी आहे.त्यांनी महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. जर महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात दिले जात नसेल तर महाबोधी महाविहार ताबा हिसकावून घेण्याची ताकद बौद्धांमध्ये आहे असे आम्ही दाखवून देऊ असा इशारा नामदास आठवले यांनी दिला.  रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ.सीमाताई आठवले,ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजितभाऊ रणदिवे,स्वागत अध्यक्ष योगेश शीलवंत,तसेच रिपाईचे राज्य सरचिटणीय गौतम सोनवणे,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,बाळासाहेब गरुड,श्रीकांत भालेराव,विनोद जाधव,राजू साळवे,पवनकुमार बोरूडे,शीलाताई गांगुर्डे,अनिल गांगुर्डे,उषाताई रामलू,सचिनभाई मोहिते,मैनाताई वैराट,अभयाताई सोनवणे,  प्रमुख पाहुणे होते,तर साहेबराव सुरवाडे,श्रीधर साळवे,मुस्तक बाबा,विवेक पवार,शांतीलाल बोरूडे यांची विशेष उपस्थिती होती.संतोष रत्नपारखे प्रस्तुत हिन्दी मराठी गीतांच्या कार्यक्रमात खास आकर्षण प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात सह झी युवा फेम पार्श्वगायक गायक चेतन लोखंडे व लावणी सम्राज्ञी आकांक्षा कदम यांनी गीत गायनातून प्रबोधन आणि मनोरजन केले.निर्धार मेळाव्याचे सूत्रसंचालन विनोद जाधव,राजू साळवे यांनी आणि आभार प्रदर्शन सुरेश पाले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ईशान्य मुंबई जिल्हा अतिरिक्त सरचिटणीस पदी भांडुप विभागातील जेष्ठ लढाऊ नेते पवनकुमार बोरूडे,यांची आणि सचिव पदी राजेश तंगडपल्ली यांची निवड करण्यात आली. त्यांचे ईशान्य मुंबई कार्यकर्त्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *