या कर्तुत्व वान महिलांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते का?.

रानटी अवस्थेतून जीवन जगण्यासाठी धडपडत असताना मानवाने विविध संशोधनातून प्रगतीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली.सिंधू संस्कृती मोहन जोधाडो हडप्पा ही संस्कृती पुर्णपणे विकसित झालेल्या अवस्थेत द्रविड संस्कृती होती.द्रविड हे भारतातील मुलनिवाशी द्रविड आहेत.त्या नंतर खैबर खिंडीतून आर्यांच्या टोळ्यांनी द्रविड लोकांच्यावर हल्ले करून द्रविड लोकांच्यावर विजय मिळवला.त्या वेळी आर्यांच्या हातात शिक्षणाची लेखनी होती.द्रविड लोकांच्या हातात शिक्षणाची लेखनी नव्हती.इतराना शिक्षण किंवा ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता.आर्य म्हणतील ती पूर्व दिशा होती.त्या वेळी आर्यांच्यांत पुरुष प्रधान संस्कृती होती.महिलांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते. सर्व अधिकार हिरावून घेऊन मानसिक दृष्ट्या गुलाम बनवून महिलांचे शोषण करण्याच्या दृष्टीने मनू स्मृती लिहिली होती.म्हणूनच मी विचारतो ८ मार्च महिला जागतिक दिन कोणी कोणी साजरा केला?.
स्त्रीयांना मानसिक दृष्ट्या गुलाम बनवून स्त्री म्हणजे फक्त भोगवस्तू म्हणून तिच्या कडे पाहीले जात होते.तिला मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसा सारखी वागणूक दिली जात नव्हती.तिचे सर्व व्यक्तिगत अधिकार हिरावून घेतले गेले होते.तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि अधिकारावर अतिक्रमण केलेले होते.अनेक अनिष्ट रूढी परंपरा, व्रत वैकल्ये,पौराणिक भ्रामक दंत कथा,दैववाद,जातीयवाद,धर्मवादामध्ये गुंडाळून ठेवले होते.विविध प्रकारे बहुजनांचे छळ करण्याच्या उद्देशाने महिलांना पायाच्या नखा पासून ते डोकीच्या केसा पर्यंत बंधनाच्या बेड्या घालून कैद केले होते.मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करुन पिंजऱ्यात बंदिस्त ठेवले होते.मनुसंस्कृती हा ग्रंथ मानवी संस्कृतीला लागलेला कलंकित ग्रंथ होता.हे आज सुशिक्षित किती महिला मान्य करतात?.
या मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या मनुस्मृतीच्या बंधनांतून मानवतेला मुक्त करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी,साधूसंतानी,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे,छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा ज्योतिबा फुलेनी,सावित्रीबाई फुलेनी,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेक महापुरुषांनी या मनुस्मृतीच्या पिंजऱ्यामध्ये गुलाम केलेल्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले गेले.माणसांच्या विकासासाठी सर्व सामान्य माणसाला कंलकीत ठरलेल्या मनु स्मृतीची रायगडच्या पायथ्याला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अग्नी देऊन नष्ट केली.त्या नंतर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान हा ग्रंथ लिहिला.देशातील सर्व सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी समानता,बंधुता,स्वातंत्र्य,न्याय हक्क, आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला.आज महिला दिनाच्या निमित्ताने यशस्वी महिलांना विचारावं असे वाटते.की किती महिलांच्या घरी पोती पुराणा ऐवजीं संविधान वाचलं जातं.आणि किती महिलांच्या घरी संविधान हा ग्रंथ आहे ? हा खरा कळीचा मुद्दा ठरला जाऊ शकतो.म्हणूनच मी विचारतो ८ मार्च महिला जागतिक दिन कोणी कोणी साजरा केला?.
महात्मा ज्योतिबा फुलेनी प्रथम स्वतः च्या पत्नीला सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून घडविले.जो पर्यंत प्रत्येक घरातील महिला शिकणार नाहीत.तो पर्यंत त्या घराची आणि देशाची प्रगती होणार नाही.हा दुरदृष्टी महात्मा फुलेंना होता.म्हणून प्रथम मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरुवात केली.मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली.मुलींना शिक्षण देण्याचे हे महान कार्य करीत असताना मनुवादी व्यवस्थेने सावित्रीबाईंचा विविध प्रकारे छळ केला गेला.पण आपल्या कार्यातून त्या किंचित ही त्या डगमगल्या नाहीत.येणाऱ्या सर्व प्रसंगांना शांत पणे सामोरे गेल्या.ज्योत स्वतः जळते आणि इतरांना प्रकाशित करते. त्याच प्रमाणे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेनी बहुजनांच्या कल्याणासाठी.संपूर्ण आयुष्य ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी जळत राहीले.आणि स्त्रीयांना ज्ञानामृत पाजून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविले.या देशातील महिलांचे भविष्य उज्ज्वल करणारी तिचं खरी सरस्वती माता होती.आज ही शाळा कॉलेज मध्ये शिक्षक,प्राध्यापक तिची पूजा प्रार्थना केल्या शिवाय शिकवत नाही.
डॉ.बाबासाहेबांनी महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी.मंत्रिमंडळात महिलांच्या साठी हिंदू कोड बिल आणलें.त्या वेळी महिलांनी हातात लाटणं घेऊन बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढला होता.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा हक्क अधिकार न्याय मिळवून देण्यासाठी हे हिंदू कोड बिल आहे.याचं महत्त्व महिलांना पटवून दिले.महिलांच्यासाठी बाळंतपणाची पगारी रजा,कामाचे आठ तास,प्रा.फंड,ग्रॅज्युटी, पेन्शन,वडिलांच्या मिळकती मध्ये सर्व अधिकार,वारसा हक्क,स्वातंत्र्य मिळवून दिले.हे सर्व डॉ.बाबासाहेबांचे उपकार किंवा देणं आहे.याची किती महिलांना जाणीव आहे. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे.मग ते शैक्षणिक क्षेत्रात,राजकीय क्षेत्रात,औद्योगिक क्षेत्रात,संशोधन क्षेत्रात,न्याय व्यवस्थेच्या क्षेत्रात,कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात,आरोग्य विभागात,अर्थ व्यवस्था
वैमानिक पायलट,सैनिक क्षेत्रात,ज्युडो,कुस्ती,मल्ल विद्येत,सर्वच क्षेत्रात पुरुषा प्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात आली.म्हणूनच महिलांनी प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठलेली आहेत.तरी देखील एकविसाव्या शतकात जीवन जगत असतांना.ज्या विचार श्रेणीने अंधश्रद्धेच्या कर्मकांडामध्ये बुडवून जीवन उद्ध्वस्त केले होते.त्याला नाकारुन.वैज्ञानिक दृष्टीकोन किंवा विवेकवादी विचारांनी प्रभावित होऊन जगण्याची मानसिकता म्हणावी तशी दिसून येत नाही.याचं दुःख होते.
आजची मुलगी उद्याची माता आहे.प्रत्येक माणसाचा जन्म हा मातेच्या गर्भाशयातुनचं झालेला आहे.हे जरी सत्य असले तरी आज देखील स्त्रियांच्या कडे बघण्याचा मानसिक दृष्टिकोन बदलेला दिसून येत नाही.मुलगी झाली की लगेच आईवडीलांचा चेहरा काळा पडतो.मुलगी ही दुसऱ्या घरचं देणं आहे.मुलगा हा वंशाचा दिवा असतो.आणि आयुष्यभर दिवे लावतचं असतो.म्हणे मृत्यूनंतर तोंडात पाणी घालतो.मृत्यू नंतर कोण बघायला येतो आहे का ॽ.मुलगी जन्माला आली की जिलेबी वाटतात.आणि मुलगा झाला की पेढे वाटतात.मुलींच्या कडे बघण्याचा मानसिक दृष्टीकोन आजही पुर्ण बदलेला दिसून येत नाहीं.हीच खरी शोकांतिका आहे.स्त्री कडे पहाण्याची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.
प्राण्यांच्या बाबतीत मात्र पहाण्याचा वेगळा दृष्टिकोन दिसून येतो.म्हैसीला रेडी (मादी)झाली की मालक खुष होतो.आणि म्हैसीला रेडा (नर) झाला की लगेच दोन दिवसांत कत्तल खाण्यात पार्सल केला जातो.ही कशाची लक्षणं आहेत! पहिल्या पत्नीला मुली झाल्या म्हणून दुसऱ्या पत्नी बरोबर लग्न करणे .हा पुर्णपणे मुर्खपणा आहे.कारण मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी याला सर्वस्वी जबाबदार पुरुषचं आहे.पुरुषाकडे एक्स आणि वाय हे शुक्राणू असतात.स्त्री कडे मात्र एक्स हा एकच शुक्राणू असतो.हे अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केलेले आहे.पुरुष प्रधान संस्कृती मध्ये प्रत्येक गोष्ट स्त्री च्या माथ्यावर मारुन आपण मात्र सहिसलामत मोकळे होतात.हा पुरुष प्रधान संस्कृतीचा गुणधर्म दिसून येतोय.
लग्न झाल्यानंतर घराची चौकट ओलांडून घरात प्रवेश करताना तांदळाने भरलेली आडिसरीचे माफ डाव्या पायाने सांडून घरात प्रवेश केला जातो.आणि त्याचं कालावधीत घरातील एकादी वयवृध व्यक्ती आजारी पडली.किंवा ती संपली,की हिचा पायगुण चांगला नाही म्हणून तिच्या डोक्यात अंधश्रद्धेचे खापर फोडलं जाते.माणसं मेल्यानंतर स्वर्गात का नरकात गेला आहे.या भ्रामक कल्पनांचा बाजार आजही मांडला जातो. स्त्री ही अंधश्रद्धेची शोषक आणि वाहक पण आहे.समाजातील शुभ मानल्या जाणाऱ्या कार्यक्रमात विधवा महिलांना प्रामुख्याने डावरे जाते आणि विधूर पुरुषांना मात्र समाविष्ट करून घेतले जाते.आजी,पणजी,आई, मुलगी,बहिण,भावजय,नणंद,ही सर्व महिलांचीचं नाती आहेत ना? ह्या सर्व महिलाचं असून देखील एक मेकीला सांभाळून घेत नाहीत.महिला ही महिलांची शत्रू होवू पहाते! हे सर्व विज्ञान युगात पाहून मनाला तीव्र वेदना होतात. म्हणूनच मी विचारतो ८ मार्च महिला जागतिक दिन कोणी कोणी साजरा केला?.
विज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा दुरुपयोग प्रत्येक कांही आईवडील करीत होते.पत्नीला दिवस गेल्यानंतर सोनोग्राफी करून मुलगा आहे का? मुलगी आहे याची चाचणी केली जात होती.आणि मुलगी असेल तर लगेच ती जन्माला येण्यापूर्वीच तिचे तुकडे तुकडे करून हत्या केली जात होती.पोटच्या लेकरांची हत्या करून इतरांना बिनधास्त आईवडील सांगत फिरायचे.दवाखान्यात जाऊन तपासणी केली.मुलगी होती.म्हणून आम्ही लगेच काढून टाकली.हे ऐकल्यावर यांना आईवडील म्हणायचे का? हा प्रश्न नेहमी पडत होता.आज ही काही प्रमाणात लपून करीत असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात.याला वेळीच शासनाच्या मार्फत कायदा करून बंदी घातली गेली.म्हणून बरं झाले.नाही तर मुलांना लग्नासाठी मुली कोठून आणल्या असत्या.आणि माणसाची निर्मिती कसी होणार? सुशिक्षित महिला ही अशा प्रसंगांना त्या कालावधीत कोणताही विचार न करता बळी पडत होत्या.ज्या महिलेला महिन्याच्या महिन्याला मासीक पाळी येते.त्या बद्दल ही समाजात विविध प्रकारच्या गैरसमजुती दिसून येतात. मासीक पाळी येणं म्हणजे मुलं होण्यासाठी त्या महिलेची प्रकृती नैसर्गिक रित्या योग्य आहे.
एखाद्या व्यक्तीला मुलं न होणे हा शारिरीक दृष्ट्या दोष असू शकतो.वैद्यकीय दृष्टया चिकित्सा केल्यास शारीरिक दृष्ट्या असलेले दोष औषधं उपचार करून बरे करता येतात.तसेच आज नवं नवीन वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले जात आहेत.पुर्वी कपडे शिवण्याचा मोठे कारखाने होते.त्या कारखान्यात काम महिलांनी एकत्रीत येऊन न्याय हक्कासाठी लढा उभारला होता.त्या लढ्यात त्या महिला यशस्वी झाल्या त्या वेळेपासून सर्व महिला एकत्रित येऊन आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.महिला दिनाची जागतिक स्तरावर सुरुवात आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा झाला.त्या वेळी रशिया मध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होते.तर जगातील इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर पाळले जाते.या दोन्ही कॅलेंडरच्या तारखामध्ये खूप फरक होता.ज्युलियन कॅलेंडर नुसार फेब्रुवारी १९१७ चा शेवटचा रविवार २३ फेब्रुवारी होता. आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही तारीख ८ मार्च होती.अशा प्रकारे ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
संयुक्त राष्ट्रांनी पहील्यांदाच १९७५ आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.दोन वर्षांनंतर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सर्व सदस्य देशांना बोलावले आणि ८ मार्च हा दिवस महिला हक्क दिन म्हणून घोषित केला.परंतू त्याचा इतिहास बराच जुना आहे.२८ फेब्रुवारी १९०९ रोजी अमेरिकन सोशलिस्ट पार्टीन पहिल्यांदा महिला दिन साजरा केला होता.परंतू अधिकृत मान्यतेनंतर ८ मार्च हा दिवस निवडला गेला होता.
२०२५ महिला दिनाची थीम काय? या वर्षी बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंचचा ३० वा वर्धापन दिन आहे.१९९५ मध्ये १८९ सरकारांनी जगभरातील महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला ऐतिहासिक अंजठा आहे.तीस वर्षांनंतर उल्लेखनीय यश मिळाले असून ही लिंग आधारित हिंसाचार आर्थिक असमानता आणि राजकीय प्रतिनिधित्वाचाअभाव या सारखे मुद्दे कायम आहेत.२०२५ ची थीम तरुण महिला आणि मुलींना बदलाचे प्रतिनिधी म्हणून सक्षम करण्यावर आणि हवामान न्याय आणि डिजिटल समावेश या सारख्या नवीन आव्हानांना प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आलेला आहे.महिला दिनाचे घोष्य वाक्य काय आहे.प्रेरणा द्या,सक्षम करा,साध्य करा,महिला मार्ग दाखवत आहे, महिलांचे हक्क हे मानवी हक्क आहेत.उभे राहा.बोला! महिलांचा उत्सव साजरा करा.धाडशी,धाडसी सुंदर! तिचा आवाज सक्षम करा.तिचे भविष्य उंचवा.
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे.हा दिवस लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो.महिला दिनाच्या माध्यमातून लोकांना महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिली.जाते.हा दिवस महिलांच्या वरील गैरवर्तन समाजातील त्याची भुमिका आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करतो.कारण आजही अनेक महिलांना स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.आपल्या भारत देशात ३३ कोटी देवीदेवतांचे सुरक्षा कवच आसतानां ही असे प्रकार घडतातच कसे हा प्रश्न पडतो.कारण निसर्गातील दगडावर कोरीव काम करुन दगडांची मृर्ती घडविली जाते.ती मृर्ती मंदिरांत एकदा पुजली की तो कायमचाच देव होवून बसतो. आणि त्याची पुजा अर्चा करणारे भक्त आयुष्यभर देवळात जाऊन ही माणसाशी माणसासारखे माणूस म्हणून जगण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न का? करीत नाही.आजही शैक्षणिक क्षेत्रात,तपस्वी साधूच्या दरबारात,मठात,बसमध्ये,रस्त्यावर,अमानुषपणे होणारे दिवसा ढवळ्या पाशवी बलात्कार,खुण, हत्या पाहून मनाला तीव्र वेदना होतात.या पृथ्वीवर सुंदर स्त्री ने जन्माला येणं हे महापाप आहे का ॽ हे जर थांबवायचे असेल तर आपणास संघटीत व्हा आणि होणें अंत्यंत गरजेचे आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने यशस्वी महिलांचे हार्दिक अभिनंदन.तसेच सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी विचारतो ८ मार्च महिला जागतिक दिन कोणी कोणी साजरा केला?.
देशमुख पी.आर.
९९२११११९५५
