
हिंगोली विशेष:प्रतिनिधी ग्रामीण भागात मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी किती पायपिट करावी लागते हे शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही.असंघटीत बांधकाम कामगार आणि शेतमजुरी करणाऱ्या पांडुरंग नरवाडे यांच्या मुलीने अंजलीने 10 वीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ९५.२०% गुण मिळवून गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही हे सिद्ध करून दाखवुन दिले.पांडुरंग नरवाडे हे सत्यशोधक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष असून ते असंघटीत कामगार व शेतमजुरांच्या मुलामुलींना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत जनजागृती करीत असतात.
एकात्मिक ग्रामीण आणि कृषी विकास संस्था परभणी द्वारा संचलित अनसूया विद्या मंदिर खडकाळी परिसर हिंगोली या विद्यालयाची विध्यार्थीनी अंजलीने १० वी मध्ये ९५ .२० टक्के गुण मिळवून शाळेतून गुणवंत यादीत नांव नोंदविले आहे.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून गरीबीतून घवघवीत यश मिळवल्याने अंजलीचे ग्रामीण भागातील असंघटित कष्टकरी मजदूरामधून विशेष कौतुक होत आहे.अंजलीने एन.डी.ए,डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी शहापूर भंडार जिल्हा येथे प्रवेश मिळविला आहे. वडील कामगार चळवळीत काम करीत असल्यामुळे अंजली अभ्यासा व्यतिरिक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत बुद्ध, विज्ञानवादी आणि प्रेरणादायी पुस्तके वाचण्याची तिला आवड आहे.कुटुंबस्तरीय बुद्ध उत्सव ग्रुपवर पांडुरंग नरवाडे यांच्या कुटुंबाचे दररोज सकाळी “धम्माचरण श्रेष्ठ आचरण” म्हणून बुद्ध वंदना घेतांना फोटो असतात.घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कधी शाळेची फी तर कधी वह्या पुस्तके सुद्धा वेळेवर मिळत नसताना सुद्धा अंजलीने अभ्यासावरुन कधीच लक्ष विचलीत होऊ दिले नाही.एकात्मिक ग्रामीण आणि कृषी विकास संस्था परभणी द्वारा संचलित अनसूया विद्या मंदिर खडकाळी परिसर हिंगोली अध्यक्ष श्री.आर.व्ही.कवडे (मामा) मुख्याध्यापिका श्रीमती. ए.एस.नायक,प्राचार्य श्री.पी.आर.गूरसुडे.यांनी माध्यमिक शालांत परीक्षा २०२५ गुणवंत विद्याथी सर्व उतीर्ण विद्याथ्यांचे हार्दिक अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत.अंजलीने एन.डी.ए, डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी शहापूर भंडार जिल्हा येथे प्रवेश घेतला आहे. वाटेल त्या समस्यावर संकटावर मात करून संघर्ष करून मी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.असे अंजलीने आमच्या विशेष प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
सागर तायडे यांस कडून
