
विशेष प्रतिनिधी :- मौजे गाव मांडकी हे जिल्ह्यातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक कला,सामाजिक बांधिलकी जपणारे गाव,बौद्धजन विकास मंडळ मौजे मांडकी स्थानिक व मुंबई,माता रमाई महिला मंडळ तसेच नवसंबोधी सामाजिक विकास संस्था रजिस्टर,व संबोधी मित्र मंडळ मांडकी यांच्या अधिपत्याखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध जयंती निमित,वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवल्या जातात,व शालेय उत्तीर्ण मुलांचा गुण गौरवव आकर्षक भेट देऊन सन्मान केला जातो, आज या संघटनेत डॉक्टर,वकील,इंजिनिअर,प्राध्यापक,सी ए,उच्च शिक्षित मुले घडत आहेत,सन २०२२मध्ये वर्षावास कार्यक्रम संबोधी बुद्ध विहारात आदरणीय भंते विशुद्ध बोधी यांच्या मार्गदर्शनात झाला तीन महिन्यात वेगवेगळ्या विषयाचे धम्म ज्ञान ग्रहण करता आले त्यातून समता सैनिक दलाचे शिबिर दहा दिवसाचे घेण्यात आले त्यामध्ये महिला पुरुष आणि शालेय विद्यार्थी असा एकूण तेवीस जणांनी भाग घेतला होता,त्याआधी २०१४ मध्ये मौजे गाव कापसाळ या ठिकाणी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित शिबिर भरविण्यात आले त्यामध्ये अजय पवार,धर्मपाल पवार यांनी भाग घेऊन आज महाराष्ट्रभर सैनिक म्हणून कार्यरत आहेत,आजच्या घडीला कार्यरत असलेल्या समता सैनिक दलामध्ये सहभाग असलेले सैनिक खालील प्रमाणे,
अजय पवार,धर्मपाल पवार,अविनाश पवार,शरद पवार,विजय पवार,किशोर पवार,महानंद मोहिते,प्रशांत पवार,शुभम पवार,विराज पवार, सिद्धेश जाधव,विराज पवार,रितेश पवार सह महिला सैनिक विजया विजय पवार,ज्योती अविनाश पवार,सुषमा रणजीत पवार,दीपाली दीपक जाधव,निकिता दीपक जाधव,रंजना महेंद्र पवार,मानशी मंगेश पवार,प्रगती प्रदीप पवार,रिया किशोर पवार,प्रेरणा प्रशांत पवार,मेघा शरद पवार,जोशना शरद पवार या व्यतिरिक्त सन २०२० मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी संबोधी मित्र मंडळ मांडकी यांच्या नेतृत्वाखाली महा पुरुषांच्या जीवनातील कार्य प्रणाली वर आधारित प्रश्न मंजुषा तयार करून त्यामध्ये वर्गीकरण करून ५ वी ते १० वी आणि ११ वी ते पंधरावी पर्यंत शालेय विद्यार्थी पुरुष व महिला गटात स्पर्धा आयोजित केली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला,या वर्षी सुद्धा बुद्ध जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित दिनांक १८ मे २०२५ रोजी अशा प्रकारे स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रश्नमंजुषा या परीक्षेला छोट्या गटामध्ये रितेश किशोर पवार याचा एक नंबर आला आणि सानवी सचिन कदम हिचा दोन नंबर आला आणि मोठ्या गटामध्ये प्रियांका विनय पवार हिचा पहिला नंबर आला आणि अक्षता आशिष मोहिते हीचा दूसरा नंबर आला व दिनांक १९ मे २०२५ रोजी मांडकी गावचे सुपुत्र कवी/गायक, साहित्यिक आदरणीय विजय तुकाराम पवार व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका शालिनी गवई मुंबई यांचा प्रबोधनात्मक महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम होणार होता.परंतु वाडी मध्ये त्याच दिवशी दुःखद घटना घडल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला.
माझ्या माहिती प्रमाणे मांडकी गाव धार्मिक बाबतीत मग त्या प्रश्नमंजुषा सारख्या परीक्षा असोत किंवा कलाक्षेत्रातील देखील अग्रगण्य गाव आहे.कला क्षेत्रातील अग्रगण्य असे नाव घेता येईल,जलसा असो किंवा नाटक असो असे सर्वांगाने कलाकार पहायला मिळत असतात,मला वाटते संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाचे एकाच गावचे 25 जण सैनिक आहेत.ती काही सामान्य गोष्ट नाही.आणि जेथे दर वर्षाला प्रश्नमंजुषा सारख्या परीक्षा घेतल्या जातात.असे सर्व गुण संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव गाव असावे.
संजय सखाराम पवार- ९१३७४४०३४०,खांडोत्री,तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी.