
गुजरात मधील विमान अपघाताची चर्चा आज सर्वत्र सुरू आहे.लोक सरकारला सातत्याने प्रश्न विचारताहेत.या अपघाताला जबाबदार कोण? मा.केंद्रीय गृहमंत्री उत्तर देतात.” असे अपघात टाळता येत नाहीत.”एकप्रकारे निष्पाप जीवांच्या अपघाती मृत्यूचे हे समर्थन आहे का?. ज्यांचे नातेवाईक यात मृत्युमुखी पडले त्यांचे,त्यांच्या कधीही न संपणाऱ्या वेदनांचे,समाधान यातून होत नाही.आता आत्मा अमर आहे.या भगवतगीतेच्या ओळी समोर ठेऊन काही संत महंतांच्या रील्स सोशल मीडियावर येऊ लागल्यात.पहलगाम हल्ल्यानंतर अशीच “सिन्दुर” प्रचार प्रसार स्थिती होती.
निवडणुकांत जिंकलेल्या मोदी सरकारला लोक प्रश्न विचारत होते.ईव्हीएम ने दिलेल्या चमत्कारिक निकाला बद्दल?.प्रामाणिक मानवी मनाच्या प्रश्नांना,सत्यवादी लोकशाही उत्तरे मिळत नव्हती.दस्तुर खुद्द गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडल्याने,लोक अधिकाधिक प्रश्न विचारत आहेत.ते चुकीचे नाहीत.लोकांनी प्रश्नच विचारू नयेत ही मनुस्मृती धर्माची मागणी असते.अंध श्रद्धा हाच या अत्याचारी विषमतावादी धर्मांधांचा मूळ विचार आहे. जगात मात्र लोक सरकारला प्रश्न विचारतात.मागील दोन दशके तर्कहीन सरकारी उत्तरे ऐकून देश थकला आहे.परंतु देशाचा विरोधी पक्ष असो की सामान्य जनता,निवडणुकीतल्या चमत्कारिक मोदी विजया पुढे निरुत्तर होत आहे.वेद,उपनिषदे,गीता,पुराणे,मनुस्मृती घेऊन निघालेल्या वैदिक हिंदुत्वाने निर्माण केले प्रश्नअगाध आहेत.अनंत आहेत.कोरोना,नोटबंदी,रेल्वे, विमान,पहेलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना,धर्माच्या तत्वद्न्यातून अशी उत्तरे देता येतील का? दिली तर ती लोकांना पटतील का?.व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात,असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना आहेत.मोदी सरकार आल्यापासून देशातील महत्वाची बंदरे,विमानतळे,मोक्याच्या जमिनी अदानी,अंबानी,लोढा,या मोजक्या उद्योगपतीं च्या कशा होत आहेत?. खरोखरच गुजरातचे लोक महान बुद्धिमत्तेचे आणि कर्तृत्ववान आहेत का?.आम्ही महाराष्ट्राचे लोक त्यातही नवी मुंबई पनवेल,उरण रायगडचे आगरी कोळी कराडी ओबीसी मूर्ख आहोत का? नवी मुंबई विमानतळातील झालेला अन्याय,प्रकल्पग्रस्त मच्छीमार शेतकरी आदिवासी यांचे नेतृत्व करताना आलेले,माझ्या जीवनातील अपयश हे मला चिंतनात टाकते आहे.
लोकांकडे या प्रश्नाची उत्तरे मी जाहीरपणे आज मागत आहे.शिक्षकाची नोकरी करीत असताना,ज्या अडचणींना सामोरे जात मी अंतिमतः नोकरी सोडायला तयार झालो.त्या पाठीमागच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर मला समजले की उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मानसिकते च्या शासन प्रशासनात ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांना त्रास का होतो?.माझ्या व्यक्तिगत चुकांचे हे समर्थन नाही.तर आजच्या देशाच्या मनुवादी परिस्थितीशी आम्ही जुळवून घेतो ? की होणारा अन्याय,चुकीचे लादलेले निर्णय याविरुद्ध आम्ही संघर्ष करतो? यात आहे.मी नोकरी सोडल्यानंतरही आपली नोकरी पूर्ण करून सुखाने निवृत्ती स्वीकारलेले माझे अनेक सहकारी मी पाहतो आहे.त्यांना असे जाणवले नसावे का? २०१३ साली नवी मुंबई विमानतळ भूसंपादनाची घोषणा शासनाकडून करण्यात आली.मी २००५साली शिक्षकी पेशा सोडून शेतकरी आंदोलनात आलो होतो. २००६ साली सेझ विरोधी आंदोलनात ॲड.दत्ता पाटील यांच्या सोबत उतरलो होतो.त्यानंतर सिडको विरोधी आंदोलनात लोकनेते दि बा पाटील यांच्या नेतृत्वात माझ्यासह अनेक लोक या उत्स्फूर्तपणे उतरले होते.२०१३ सालात लोकनेते दि बा पाटील आम्हाला सोडून गेले.याच वर्षी नवीन भूसंपादन कायदा २०१३ आला.या कायद्यानुसार भूसंपादन व्हावे यासाठी आजपर्यंत माझ्यासह अनेकांनी संघर्ष केला.या नव्या कायद्यात भूमिहीन शेतकरी ताबा,कब्जा कुळवही वाट करणाऱ्या ओबीसी एससी एसटी आणि समुद्रावर, जंगलात उपजिविका करणाऱ्या मच्छीमार आदिवासींना चार पट मोबदला,प्रकल्पग्रस्त दाखले सरकारी नोकऱ्या,पुनर्वसन घरे विकसित जमिनी,व्यावसायिक पुनर्वनं होते. सिडको संपादित जमिनीचा विक्री भाव नेरूळ सानपाडा येथे प्रति गुंठा चार ते पाच कोटी रुपये असताना.याच्या चार पट भाव शेतकऱ्यांना देताना अदानीने डोळे पांढरे केले असते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांचा कुळ कायदा,सोशल इंम्पक्त रिपोर्ट करून मा.जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नवा भू संपादन कायद्याने पुनर्वसन म्हणून मिळणार होता.लोकनेते दि बा पाटील यांचे साडे बारा टक्के सिडको पुनर्वसन धोरण सोबत होतेच. हे सारे नाकारून,साडे बावीस टक्के सिडको भुखंड योजना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी आणली गेली.जगातील सर्वोत्कृष्ट सिडको योजना असा प्रचार आमदार खासदार करीत होते.सिडकोतील आयएस अधिकारी,आमचे ठेकेदार राजकीय नेते,महाराष्ट्र सरकार,केंद्र सरकार यांनी अदाणीसाठी भूमिपुत्रांना हातोहात फसविले.नवी मुंबई विमानतळाचे कायदेशीर भूसंपादन हे भूसंपादन कायदा २०१३ने व्हायला हवे होते.ते परस्पर शेतकरी संमतीपत्र,दलाली याच्या माध्यमातून लिहून घेऊन लोकांची फसवणूक सिडको महाराष्ट्र सरकारने केली.असे मां उच्च न्यायालयाने अलीकडेच म्हटले आहे.यामुळे हजारो आगरी कोळी कराडी ओबीसी मागासवर्गीय लोक आपल्या राहत्या घरांच्या पुनर्वसनास मुकले आहेत.मच्छीमार आदिवासी,अल्पसंख्याक हे उध्वस्त झाले आहेत.आगरी कोळी कराडी यांचे अतोनात नुकसान झाले,रेती मासेमारी,शेती,खडी हे व्यवसाय गेले.

लोकनेते दि बा पाटील यांच्या संघर्षातून साडेबारा टक्के विकसित भुखंड,सरकारी नोकऱ्या,वाढीव भाव मिळत होता.आता (नवा भूसंपादन कायदा २०१३) धाब्यावर बसवून हा विमानतळ अदानीच्या मालकीचा केला गेलाय.हजारो कोटींचा हा भ्रष्टाचार आहे.एका खाजगी उद्योगपतीच्या अदानीच्या विमानतळासाठी सरकार,राजकीय नेते,राजकीय पक्ष,जिल्हा प्रशासन,पोलिस यांनी दलाली केली,लोक फसले आहेत. फसवले गेले आहेत.त्यातून अदानी श्रीमंत आणि आम्ही गरीब झालोय.हा आमच्या नशिबाचा दोष नाही.हे संघटित षडयंत्र आहे.मनुवादी फसवणूक आहे.स्त्रीशुद्राती शूद्र यांची फसवणूक करूनच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मनुस्मृतीचे राज्य बिनबोभाट चालते.
छत्रपती शिवराय,महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,नारायण नागू पाटील,ॲड दत्ता पाटील,लोकनेते दी बा पाटील यांच्या विचारांचा पराभव करून रायगड या छातीवर अदानी ने विमानतळ बांधलाय.तो अदानी सहज लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देईल का?.आज लोकनेते दि बा पाटील साहेब असते,तर रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नैना प्रकल्पासह,अलिबाग कॉरिडॉर,रेवस करंजा पूल,एम एम आरडीए.एमआयडीसी येथे भूसंपादन कायदा २०१३ने भूसंपादन आणि पुनर्वसन मागितले असते.संघर्षाने करून घेतले असते.आज ती जबाबदारी तुमची आमची नाही का?
भारतीय संविधानाच्या आग्रहा साठी लढण्याचा संकल्प करून या लढाईत आम्ही सर्व आगरी कोळी कराडी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन ओबीसी एससी एसटी मुंबई ठाणे रायगड पालघर सह महाराष्ट्रात,घरे गावठाणे,व्यवसाय यांच्या अधिकारांचा संघर्ष करतोय.फसवून घेतलेली आमची जमीन समुद्र, जंगले येथे होत असलेल्या क्षणिक पराभवाने आम्ही सोडणार नाहीत.खचणार नाही.या लेखाने मी आपणास मदतीसाठी हाक देतोय.भारतीय संविधानाच्या हक्काचा जमिनीवरचा संघर्ष पेटता ठेवण्यासाठी.सर्वप्रकारच्या मदतीचा हात द्या.सहकार्यासाठी उभे रहा.निसर्ग आपल्या सोबत आहे.तथागत बुद्ध,चार्वाक,महावीर यांनी भारताला दिलेला तर्क,वैज्ञानिक विचार लोकां मध्ये आजही टिकून आहे.त्यासमोर अस्तित्वहीन स्वर्ग,नरक,आत्मा,चमत्कार आणि देवही टिकणार नाहीत.टिकतील भारताचे आम्ही सर्व लोक.अर्थात.”we the people of india” अखंड भारताचा विजय असो.
राजाराम पाटील – ८२८६०३१४६३.उरण,जिल्हा रायगड.
