फुले आंबेडकर विचार मंच भांडुपच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न.

बातमी शेअर करा.

जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान असलेल्या बुद्धगया येथील, “महाबोधी महाविहाराचा” ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन सुरु आहे.त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी भांडुप विभागातील धम्म उपासक उपासिका यांनी रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी मधूबन गार्डन गेट जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिल्पा समोर शाहिद भगतसिंग मार्ग भांडुप (प) येथे लक्षवेधी धरणे आंदोलन केले.

   महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, “बुद्धगया मंदिर कायदा १९४९” या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला मंदिर म्हणून उल्लेखित करण्यात आले आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे कि,महाबोधी महाविहाराला संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी, प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती असेल. या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य हिंदू असतील व चार सदस्य बौद्ध असतील. या नऊ सदस्यीय समितीमध्ये एक सदस्य गया जिल्ह्याचा जिल्हा दंडाधिकारी असेल व तोच या समितीचा अध्यक्ष सुद्धा असेल. त्यापुढे जाऊन हा कायदा म्हणतो की, जर गया जिल्ह्याचा दंडाधिकारी हा गैरहिंदू असेल तर तो या समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही. सरकार एकूण सदस्यापैकी,अध्यक्ष म्हणून हिंदूचीच निवड करेल. त्यानंतर या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी, विहाराबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी कमीतकमी ४ सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे.समितीवर ५ सदस्य हिंदूच असतात.म्हणजे,उरलेले ४ बौद्ध सदस्य नसले तरी विहाराबाबतचा प्रत्येक निर्णय घेतला जातो.हे आहे सर्वात मोठे कारण !.

म्हणून, जर आम्हाला महाबोधी महाविहाराचा ताबा मिळवायचा असेल तर, सर्वात पहिल्यांदा हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी, बोधगया येथे पूज्य भिक्खू संघाचे शांतपणे उपोषण सुरू आहे. त्याला देशभरातील धम्म उपासक उपासिका स्थानिक पातळीवर उपोषण धरणे आंदोलन करून पाठींबा देत आहेत.त्याचं प्रमाणे भांडुप विभागातील सर्व संस्था संघटना,सामाजिक कार्यकर्ते, धम्म उपासक उपासिका यांनी जाहीर पाठिबा देण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले. या लक्षवेधी धरणे आंदोलनात धम्म प्रचारक चंद्रकांत गमरे,गौतम पारवे,बौद्धाचार्य राहुल पवार,बौद्धाचार्य भगवान रायपुरे,नागसेन वाकोडे,भिमराव तायडे आणि सागर तायडे यांनी महाबोधी महाविहारा बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. 

बुद्धगया मंदिर कायदा १९४९ लवकरात लवकर रद्द झाला पाहिजे,बुद्ध विहार हे बुद्ध भिख्खू यांच्या ताब्यात देण्यात यावे. ही राज्य व केंद्र.सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. त्यांचे वरिष्ट पोलिस निरीक्षक भांडुप मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.निमंत्रक:- फुले आंबेडकर विचार मंच भांडुप (प) कमिटी अध्यक्ष – भिमराव ना. तायडे,सेक्रेटरी- अशोक वाकोडे,सह सेक्रेटरी – राहुल गोविंद इंगळे,खजिनदार – सुनील गावडे,कार्याध्यक्ष – सागर महाले,संघटक – गौतम धुरंधर,प्रविण रोकडे, सल्लागार – नागसेन वाकोडे,सुनील सुरडकर,जोगेंद्र तिवारी,सुभाष वाकोडे,कमिटी पदाधिकारी सभासद यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते,धम्म प्रचारक अभ्यासक सागर रामभाऊ तायडे,अशोक खरात.बौद्धाचार्य राहुल पवार,नारायण वानखडे,जे.टी.मोरे,कवी गायक गौतम मोरे,निवृती धुरंधर,सिद्धार्थ सावंत,संतोष खोडके,वासुदेव अवचार,प्रवीण सागर तायडे,श्रीकांत गायकवाड,संदीप राजापूरकर सह धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सर्व धम्म उपासिका सुनिता उदेभान तायडे,तुळसाबाई गोविंद इंगळे,ज्योती दिलीप थाटे,चंद्रकला सागर तायडे,कोकिळा बांगर,वंदना प्रताप हिवराळे,राधाबाई सोनवणे,सखूबाई सुरडकर,शांता नारायण वानखडे, सुमन अशोक वाकोडे, अभया सावंत,सुनीता कासार,आम्रपाली सुरडकर,मेघा वानखडे,बनाबाई खराटे,ललिता बोदडे,पार्बताबाई वाघ,हर्षदा नितीन तायडे,क्षता भिमराव तायडे, सीमा इंगळे,सुनीता गौतम तायडे, स्वाती राजू वाकोडे, संगीता सचिन प्रधान,पिंकी नंदू धांडोरे सह सर्व धम्म उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.भिमराव तायडे यांनी प्रास्ताविक करून बौद्धाचार्य भगवान रायपुरे यांनी उत्तम प्रकारे प्रबोधन करून सूत्र संचालन केले,आणि कार्याध्यक्ष – सागर महाले यांनी आभार मानले. राहुल गोविंद इंगळे,भिमराव तायडे,सागर महाले आणि सागर तायडे यांनी पोलिस व महानगर पालिका परवानगीसाठी आणि लक्षवेधी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *