विशेष प्रतिनिधी भांडुप- भांडुप विभागात माता रमाबाई आंबेडकर नगर ही डोंगराळ भागात डंक लाईन बाजूला खूप जुनी वस्ती आहे. त्या संपूर्ण माता रमाबाई आंबेडकर नगरात सहा सात बुद्ध विहार आहेत.त्यात भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 6 आम्रपाली बुद्ध विहार एक आहे. त्या विहारांच्या समोरील व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बुद्ध विहाराची सुरक्षा करण्यासाठी व बुद्ध विहाराची विटंबना होऊ नये याकरिता.आम्रपाली बुद्ध विहारांच्या धम्म उपासिका महीला कमिटीने स्वखर्चाने लोखंडी जाळीचे संरक्षण कंपाऊंड बनवले होते.तेव्हा त्याला कोणी समोरा समोर कुणीच विरोध केला नाही.परंतु दहा दिवसा नंतर त्या लोखंडी जाळीच्या संरक्षण कंपाऊंडची तोडफोड स्थानिक तीनचार समाज कंठक महिलांना पुढे करून केली.त्याला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा नेत्याचा आशीर्वाद मिळाला म्हणून त्यांनी ही हिंमत केली असे बोलले जात आहे.विहारच्या जागेत त्यांना गणपती नवरात्र इतर हिंदूंचे सण उत्सव साजरे करायचे आहेत.याविरोधात पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविण्यात आली असता.पोलिसांकडून त्यावर योग्य ती कारवाई झाली नाही. त्यामुळेच स्थानीक समाज कंठक महिला व तरुणांची हिंमत वाढल्या गेली आहे.आता ते खुलेआम सर्व धम्म उपासक उपासिकांना मुलामुलींना धमकी देऊन शिवीगाळ करून मारहाण केली जात आहे. म्हणूनच म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावला असे म्हणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता मंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांनी पोलिस सहाय्यक आयुक्त यांना पत्र देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती.गुन्हेगारांवर कडक कारवाई होत नाही म्हणून आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय शिष्टमंडळ वेळोवेळी वरिष्ट पोलिस निरीक्षक खंडागळे साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त मान.जितेंद्र आगरकर साहेब यांना भेटून.संबधित समाज कंटक गुन्हेगारांची जात धर्म न पाहता कडक कारवाई करण्याची मागणी करत आली आहे.समाज कटंक एकाच जाती मधील असल्यामुळे पोलिसांना ठोस निर्णय घेता येत नाही.अशी खंत पोलिस अधिकारी वर्गाने व्यक्त केली. समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन रिपाई शिष्टमंडळ आणि महिला मंडळ पोलिसांकडून योग्य कारवाईची अपेक्षा करीत आहे. ती कारवाई होत नसल्यामुळे समाज कटंक महिला व तरुणांची हिमत वाढत चालली आहे. सर्व समाज एकत्र आला आणि समाज कटंक महिला व तरुणांवर जाग्यावर कारवाई केली तर कायदा हातात घेऊन गुन्हा केला. तर बाबासाहेबांची राज्य घटना आम्हाला मान्य नाही असे होईल.ते होऊ नये म्हणूनच महिला मंडळी मोठ्या प्रमाणात रिपाई पदाधिकाऱ्या सोबत पोलिस स्टेशन वर न्याय मागण्यासाठी येतात.हे लक्षवेधी असतांना ही पोलिस कारवाई होत नाही.ही महिला वर्गाची मोठी खंत आहे,म्हणूनच म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावला असे म्हणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
समाज कंटक महिलांची एवढी हिंमत वाढली की त्या बुद्ध विहारात चालणारी बुद्ध वंदना बंद करण्यास सांगतात.विहाराच्या दरवाजा समोर कचरा टाकतात,दगड लावून रास्ता अडविण्याचा प्रकार करतात.याला विरोध केला म्हणून महिलांना मुलीला मारहाण करून पोलिस तक्रार करतात.पोलिसानी बॉन्ड लिहून मागितला हे प्रकरण हाता बाहेर जाऊ नये म्हणून माता रमाबाई आंबेडकर नगरचे जून रहिवाशी रिपाई जेष्ठ नेते पवनकुमार बोराडे,यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय शिष्टमंडळ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) गटाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मा सिद्धार्थ भाई कासारे,ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अजित भाऊ रणदिवे,ईशान्य मुंबई युवा जिल्हाध्यक्ष विनोद भाई जाधव,रोजगार आघाडीचे अमित तांबे,मुलुंड अध्यक्ष योगेश शीलवंत,मुलुंड कार्याध्यक्ष राजू साळवे,युवा नेते जितू जाधव,भांडुप आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा.जगन्नाथ बावा,रिपाई जेष्ठ नेते पवनकुमार बोराडे,ज्येष्ठ नेते भगवान साळवे,ईशान्य मुंबई रिपब्लिकन सेना अध्यक्ष विजय माने,ज्येष्ठ नेते शामराव रिकीबे,ज्येष्ठ नेते अरुण रुके,ज्येष्ठ साहित्यिक निर्भीड पत्रकार सागर भाऊ तायडे, भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य सुनील सोनताटे,महिला आघाडी नम्रताताई सुरवसे, अंजलीताई सोनताटे,सारिकाताई काकडे,शोभाताई थोरात,सरोजाताई डोंबे, सुरेखाताई प्रधान,पंचशीला ताई भांगे,ताराबाई रोकडे,बेबीताई कांबळे,बागेश्री वाघमारे,राधाताई मोटे,देवकाताई आटकर,लताताई नलवडे प्रभावती ताई कांबळे आणि महिला पदाधिकारी उपासिका मोठ्या संख्येने वेळ काढून वरिष्ट पोलिस निरीक्षक भांडुप यांना भेटण्यास उपस्थित राहिले.