
विशेष प्रतिनिधी- दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून देशातील बिहार राज्यातीन गया जिल्ह्यात बुद्ध गया येथे हजारो बौद्ध भिक्कू व उपासक आमरण उपोषण करत आहेत.परंतु बिहार सरकार तसेच केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून बौद्धाना दुर्लक्षित करत आहे.सन १९४९ मध्ये सरकारने बुद्धिस्ट टेम्पल कायदा तयार करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समिती गठीत केली तिला बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट कमिटी असे नाव देऊन त्या मध्ये ०९ सदस्य संख्या ठरविण्यात आली त्यामध्ये ०५ हिंदू व ०४ बौद्ध असे संख्याबळ ठरविण्यात आले.या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल,परंतु तो हिंदू असावा तो हिंदू नसेल तर उर्वरित ०८ सदस्यातून सरकार अध्यक्षाची निवड करील,
या निर्णया विरुद्ध दोन वेळा आंदोलन करण्यात आले त्यास फार-थोडे यश आले सुद्धा परंतु या ठिकाणी वाढणारे पाखंडवादाचे स्तोम थांबविण्या ऐवजी ते अधिक बळकट करण्याचे काम या कायद्याच्या अडून होताना दिसत आहे.जग भरातील बौद्ध अनुयायांना हे समजल्यानंतर महाबोधी महाविहार संपूर्ण विश्वाला वैज्ञानिक दृष्टीकोन देणारे विश्वधरोहर आहे.परंतु येथून जगभरात पाखंडवाद सांगितला जातो हा बुद्धांच्या विचारावर खूप मोठा आघात आहे. हा दुरोगामी परिणाम लक्षात घेऊन ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम अर्थात अखिल भारतीय बौद्ध मंच याच्या माध्यमातून देश विदेशातील बौद्धांच्या संघटनानी एकत्रितपणे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा उभा केला आहे.त्यास जगभरातून समर्थन मिळत असून या विहारासाठी बनविण्यात आलेला कायदा बी. टी. ऍक्ट १९४९ हा पूर्णतः रद्द करून हे महाबोधी महाविहार जे बौद्धांचे प्रेरणास्थान आहे. त्याचे व्यवस्थापन बौद्धानेच केले पाहिजे ही मागणी संपूर्ण जगभरातून होत आहे.
ज्या प्रमाणे हिंदुच्या मंदिराचे,मुसलमानांच्या मस्जिदीचे,ख्रिश्चनांच्या,चर्चचे,शिखाच्या गुरुद्वाराचे,जै्नांच्या देरासराचे व्यवस्थापन त्या-त्या धर्मीयकडे आहे मग बौद्धावर हा अन्याय का? या साठी हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचालढा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे.म्हणून येत्या मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी सकाळ १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसीलदार कार्यालय मुरबाड इथ पर्यंत शांतता रॅलीचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळतून अर्थात भीमाई भूमितुन आंबेटेबे,मुरबाड येथून देशाचे राष्ट्रपती,प्रधानमंत्री,बिहारचे मुख्यमंत्री यांना तहसीलदारा मार्फत निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या आंदोलनाची नियोजन समिती,भारतीय बौद्ध महासभा,सर्व आंबेडकरवादी राजकीय पक्ष,बौद्ध समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक,क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था,यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे की, सर्व बौद्ध उपासक,उपासिकांनी पांढरे वस्र परिधान करून आंदोलनात सहभागी व्हावे असे राजेश पवार यांनी जाहीर आवाहन केले आहे.
राजेश पवार 7021508585,आंबेटेंबे,मुरबाड
