समाजाची दिशाभूल होऊ नये,यासाठी समाजाने जागरूक असणे गरजेचे!
समाजातील बुद्धिवान लोकं जागरुक असतात असं गृहीत धरल्या जाते समाजातील बुद्धिवान लोकं जागरूक असतील तर कोणताही स्वयंघोषित पुढारी आपल्या समाजाची दिशाभूल करण्याचे धाडस करणार नाही.विश्वकर्मीय सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना,संस्था आणि युवक संघटना सुद्धा समाजात हिरीरीने कार्यरत असतील या सर्वच संघटनेवर कारभारी म्हणून सुशिक्षित उच्चशिक्षित आणि विद्वान हुशार बुद्धिवान समाज बांधवांची पदाधिकारी म्हणून निवड केली जाते याच माध्यमातून एका कर्तबगार पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते नंतर हळूहळू समाजात कर्तबगार कर्तृत्ववान कार्यसम्राट दिग्गज आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणून समाजात नेतेगिरी करतात आणि मोठ्या दिमाखात सामाजिक क्षेत्रात विविध कार्यक्रमात मानसन्मान मिळवतात.घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे कि,शासनकर्ती जमात बना!.आपले संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी राजकीय हिस्सेदारी मध्ये सहभाग महत्वाचा ठरतो त्यासाठी वैचारिक चळवळ अत्यंत महत्वाची ठरते.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाची लोकसंख्या राज्यात लक्षणीय असल्याचे सोशल मीडियावर माझ्या वाचण्यात आले आहे आणि सामाजिक संघटनांचा विस्तार हा राज्यस्तरीय असल्याचे समजले जाते राज्यात असंख्य सामाजिक संघटना कार्यरत असतील या संघटनांवर शेकडोंच्या संख्येने कर्तबगार,बुद्धिवान,सुशिक्षित आणि उच्चशिक्षित पदाधिकारी वर्गाची वर्णी लागलेली असेल याच माध्यमातून समाजात अनके दिग्गज नेते आणि युवक नेते उदयास येतात आणि सामाजिक क्षेत्रात नेतेगिरीच्या आवेशात मोठया दिमाखात वावरतात.सामाजिक क्षेत्रात एखादी संघटना स्थापन करून सर्व समाजमान्य नेतृत्व उदयास येणार नाही त्यासाठी ठोस अजेंडा असावा लागतो आणि विधायक कार्याचा कृती आराखडा असणे गरजेचे असते त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते कोणत्या राज्यस्तरीय संघटनेकडे सर्वांगीण विकासासाठी,ओबीसी चळवळ तसेच राजकीय चळवळ बळकट करण्यासाठी ठोस अजेंडा आहे.राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करून सोशल मीडियावर समाज नेतेगिरीचे फलक झळकवून ओबीसी सुतार समाजात कार्यसम्राट समाज नेतृत्व कोणत्या नैतिक आधारावर उदयास येईल यावर स्वयंघोषित नेत्यांनी आत्मचिंतन करावे आणि समाजाची मात्र दिशाभूल करु नये.
विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील ओबीसी घटक असतांना समाजात ओबीसी संदर्भात आरक्षण जनगणना संविधान तसेच राजकीय हिस्सेदारी राजकीय प्रतिनिधित्व इत्यादी महत्वपूर्ण विषयावर तथाकथित समाज नेत्यांनी राज्यभरात आपापल्या कर्तबगार नेतृत्वाखाली राज्यभरात ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येने समाज बांधवांना एकत्रित करून अभ्यासपूर्ण भाषणबाजी करून उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध करून समाज जागरूकता अभियान राबविण्यात आले काय?. याचा सुद्धा विचार करण्याची नितांत गरज आहे विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान चिकित्सक लोकांनी यावर विचार आणि चिकित्सा करण्याची गरज आहे.
विश्वकर्मीय सुतार समाजात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी तळागाळातील उपेक्षित सुशिक्षित बेरोजगार युवकांना कष्टकरी समाज बांधवांना गोरगरीब महिलांना राज्यभरात उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले काय?.स्वतःला कर्तबगार कर्तृत्ववान कार्यसम्राट दिग्गज मुरब्बी अनुभवी धुरंधर समाज नेतृत्व समजणाऱ्या तसेच धडाकेबाज जिगरबाज तडफदार युवक नेतृत्व समजणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी याचा विचार करण्याची नितांत गरज आहे विशेषतःजे स्वतःला जेष्ठ मार्गदर्शक समजतात त्यांनी समाजाला कोणत्या प्रकारचे वैचारिक आणि विधायक कार्याबद्दल आणि विकासात्मक कार्याबद्दल मार्गदर्शन करतात त्यांनी याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.कागदोपत्री एखादी संघटना स्थापन करून सुतार समाजातील बोटावर मोजता येतील अशा लोकांना एकत्रित करून राज्यस्तरीय विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात पुढारी होण्याचे स्वप्न पाहणारे सुध्दा अनेक जण असतील.ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात राज्यभरात गावभर फोटोबाजीचे फलक झळकवून कर्तबगार,कर्तृत्ववान आणि कार्यसम्राट आधारस्तंभ इत्यादी उपाध्या जोडून नेतेगिरीचा नारा देऊन कोणीही सामाजिक जीवनात संपूर्ण आयुष्यात संपूर्ण समाजमान्य नेतृत्व कधीही उदयास येणार नाही त्यासाठी कर्तृत्व आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तसेच समाजहित ठरणारे विकासात्मक आणि समाज प्रबोधनात्मक नियोजनात्मक कृतीआराखडा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते.एखादी संघटना स्थापन करून आणि शेकडोंच्या संख्येने पदांची खैरात करून समाजात कर्तबगार,कर्तृत्ववान,कार्य सम्राट,दिग्गज नेतृत्व आणि युवक नेतृत्व उदयास कधीही येणार नाही.
समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान तसेच चिकित्सक समाज बांधवांनी यावर सखोल निरीक्षण करणे गरजेचे आहे विशेषतःस्वयंघोषित नेत्यांनी समाजात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नाहीत कारण समाज जागृत झाला तर मात्र स्वयंघोषित पुढाऱ्यांना उजळमाथ्याने नेतेगिरीचा मनमुरादपणे आनंद लुटला येणार नाही.समाजात सुशिक्षित उच्चशिक्षित आणि बुद्धिवान समाज वर्ग जागृत आणि चिकित्सक असतो अशा लोकांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत असते हा समजदार वर्ग कोणत्याही भूलथापांना कधीही बळी पडणार नाही जे अंधभक्त असतात त्यांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत नसते म्हणूनच असा अचिकित्सक वर्ग फसतो डोळे बंद करून भूलथापांना बळी पडतो यासाठीच समाजाने जागरूक असावे.
राज्यस्तरीय नामकरणाचा मुकूट परिधान करणाऱ्या संघटना आणि संबंधित पुढाऱ्यांकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात ज्यामध्ये सामाजिक सर्वांगीण विकास,ओबीसी संदर्भात विविध विषयांवर राज्यभर समाज जागृती निर्माण करणे, विश्वकर्मीय सुतार समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय हिस्सेदारी साठी प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी विधायक कार्याच्या अपेक्षा समाजात नेतेगिरी करणारे दिग्गज समाज नेते आणि धडाकेबाज युवक नेते समाजाच्या मूलभूत अपेक्षा जर पूर्ण करण्यात अपयशी ठरत असतील तर मग समाज कोणाकडून अपेक्षा बाळगणार जर समाजात नेतेगिरीची नैतिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर मग फक्त नावासाठी आणि मोठेपणा मिळविण्यासाठी समाज पुढारपण करण्याचा अट्टाहास,खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?
ओबीसी सुतार समाजाचे दिग्गज,कर्तबगार समाज भूषण,समाजरत्न,समाज नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणवून घेणारे सुतार समाजातील खऱ्या गरजवंतांसाठी आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी आर्थिक विकासाचा मुख्य आधार ठरणारे उद्दोग व्यवसाय उभारणी करण्याच्या संदर्भात पर्यायाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आणि ओबीसी बद्दल,आरक्षण,जनगणना संदर्भात समाज जागृती निर्माण करण्याच्या बाबतीत तसेच समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्याच्या संदर्भात मात्र कुठं हरवतात याचा जाहीर खुलासा स्वयंघोषित तथाकथित दिग्गज आणि युवक पुढारी सविस्तर आपापल्या संघटनांच्या लेटरपॅडवर करतील काय?
समाजात पुढारपण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात ओबीसी संविधान आरक्षण जनगणना राजकीय हिस्सेदारी संदर्भात कधीही हजारोंच्या संख्येने समाज बांधवांना एकत्रित करून अभ्यासपूर्ण भाषणबाजीने समाज जागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचे धाडस केले नाही कारण त्या तोडीची यांची पात्रता नाही.समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना,आर्थिक दृष्टीने कमकुवत गोरगरीब समाज बांधवांना आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन म्हणून हजारोंच्या संख्येने उद्योग व्यवसाय उभारणी केलेली नाही आणि निघाले महाशय विश्वकर्मीय सुतार समाजाचे नेतृत्व करायला विशेषतःआपण समाजात नेतेगिरी कोणत्या नैतिक आधारावर करतो कशासाठी पुढारपण करतो याचा खुलासा कोणत्याही स्वयंघोषित दिग्गज आणि युवक पुढाऱ्यांना अजिबात करता येणार नाही.
विश्वकर्मीय सुतार समाजात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या किती लाख आहे याची आकडेवारी समाजातील कोणत्याही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडे नाही या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न कसा सुटेल याचे कोणाकडेही कोणतेही नियोजन नाही.समाजात लग्नाचे वय झालेल्या तरुणांचे विवाह जुळवणी ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे मग असे विवाह इच्छुक तरुण आर्थिक श्रीमंत असो कि,मध्यम गरीब कुटुंबातील असो समाजातील तरुणांची विवाहाची समस्या कोणत्या पध्दतीने सोडविणार याचे कोणतेही उत्तर कोणीही देऊ शकणार नाही आणि बहाद्दर निघाले राज्यस्तरीय विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाचे नेतृत्व करायला.समाजात स्वयंघोषित पुढाऱ्यांचा नेतेगिरीचा उतावीळपणा म्हणजे निव्वळ हास्यास्पद आणि फक्त निव्वळ स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठीच चाललेला खटाटोप असतो.
स्वयंघोषित पुढाऱ्यांना विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात पुढारपण करण्याचा, नेतेगिरी करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय आणि कोणत्या आधारावर पुढारपण करतात महत्वाचे म्हणजे समाजात पुढारपण करण्यासाठी लागणारा कोणताही निश्चित मापदंड नाही तसा मापदंड ठरविण्याचा अधिकार समाजात कोणालाही नाही याचा तर्कशुद्ध मुद्देसूद संवैधानिक पध्दतीने खुलासा कोणालाही करता येणार नाही तरीही समाजात बेधडकपणे स्वयंघोषित नेतेगिरी चालत असेल तर याला समाजातील नव्हे देशातील नव्हे तर विश्वातील विश्वविख्यात अफलातून विश्वकर्मीय चमत्कार म्हणावा कि,जगातील एक आश्चर्य म्हणावे कि,स्वतःच्या नावासाठी आणि मोठेपणासाठी चाललेला निर्लज्जपणे आटापिटा,धडपड,खटाटोप,हपापलेपणा आणि निव्वळ हास्यास्पद उतावीळपणा म्हणावा?
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात ज्यांना नेतृत्वाची,नेतेगिरीची,पुढारपण या जबाबदार आणि कर्तबगार तसेच वजनदार शब्दांची परिपूर्ण व्याख्या,परिभाषा,परिपूर्ण अर्थ सविस्तर मतितार्थ आणि नैतिक जबाबदारी नैतिक कर्तव्य याचा तर्कशुद्ध मुद्देसूद सविस्तरपणे खुलासा करता येणार नाही आपण विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात नेतेगिरी करण्यासाठी लायक तसेच आपली क्षमता आणि पात्रता आहे काय याचा जाहीर खुलासा कोणालाही करता येणार नाही असे स्वयंघोषित महाभाग नेतेगिरी करण्यासाठी उतावीळ झालेले स्वतःच समाजात नेतेगिरीच्या थाटात आणि आवेशात वावरत असतील तर हा सुद्धा जगातील एक चमत्कार म्हणावा लागेल आणि उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे म्हणावं लागेल.
समाजाचे मार्गदर्शक,प्रेरणास्थान समजणारे तसा देखावा निर्माण करणारे महाशय महत्वाच्या आणि विधायक कार्याच्या बाबतीत चक्कार शब्द सुद्धा काढायला धजावत नाहीत कारण यांच्या सामाजिक क्षेत्रातील शाळेतील अभ्यासक्रमात हे विषय अजिबात येत नसावेत असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.जर असं नसेल तर मग वरील महत्वाच्या विधायक कार्याच्या बाबतीत नेतेगिरीचा मुखवटा घेऊन फिरणारे महाशय कुठं हरवतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.समाजाचा विकास करण्यासाठी विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या उच्चशिक्षित आणि बुद्धिवान असणाऱ्या कणखर नेतृत्वाची गरज आहे त्यासाठी चिकित्सक पध्दतीने अवलोकन करणे गरजेचे असते म्हणूनच पुढाऱ्यांनी समाजाची दिशाभूल करू नये यासाठी समाजातील सुशिक्षित, उच्चशिक्षित,बुद्धिवान आणि चिकित्सक लोकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे असते!
प्रमोद सूर्यवंशी ८६०५५६९५२१. चिखली मातृतीर्थ बुलडाणा.
