जगाच्या पोशिंद्याला वाली कोणी आहे का ॽ

बातमी शेअर करा.

भारत हा पावसाळा,हिवाळा, उन्हाळा असे तीन ऋतू लाभलेला कृषी प्रधान देश असल्यामुळे देशातील सर्व  शेतकरी,कष्टकरी,कामगार,मजूर उन्हात,थंडीत,वादळ वाऱ्यात,पावसात भिजत काळ्या आईची सेवा करतोय.प्रामाणिकपणे कुटूंबातील सर्व लहान थोर मंडळी काबाडकष्ट करून शरीरातील घाम गाळत असतो.म्हणून पृथ्वीवर वरील सर्व पशु पक्षी प्राणी मानव यांच्या पोटाची खळगी आपण भरतोय.शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळत नसल्याने रात्रीच्या वेळी अवेळी रानातील पिकांना पाणी पाजण्यासाठी जात असताना परत घरी येण्याची शास्वती नसते.सर्व बाजूने त्यांच्या  जिविताला धोका पत्करून काळ्या आईची सेवा करावी लागते. 

   रात्रीच्यावेळी सर्प आपले (अन्न) भक्ष्य शोधण्यासाठी बिळातून बाहेर पडलेले असतात.त्या वेळी अनेक शेतकरी बांधवांना सर्पदंश झाल्याने प्राण गमवावे लागतात.तसेच जंगलातील वन्यप्राणी दिवसभर जंगलात विसावा घेऊन संध्याकाळी अन्न, पाण्याच्या शोधात शेतकरी बांधवांच्या पिकांत येऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांने काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान करतात.ते पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर होऊन हंबरडा फोडत असलेले शेतकरी दिसून येतात.शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई वन विभागाकडून किंवा शासनाकडून अगदी तुटपुंजी मदत केली जाते.ही मदत पाहिले तर जणू शेतकऱ्यांची कुचेष्टा केली जाते.

   जंगलांच्या पायथ्याशी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन भयभीत होऊन जगावे लागते.अनेक प्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊन शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर आणि माणसावर जीवघेणा हल्ला करत आहेत.अनेक शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांच्या पासून होणारे पिकांचे संरक्षण करण्यासाठी  रात्रंदिवस  शेतात माचा घालून रात्रभर जागरण करून पीकांचे राखन करीत असतात.अश्या वेळी रान डुक्करांचे कळप,गवे रेड्यांचे कळप,हत्तींचे कळप,माकडांचे कळप,मोरांचे कळप इत्यादी जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या वर अनेकदा जीव घेणे हल्ले होतात. अनेक शेतकरी बांधवांना या जंगली प्राण्यांपासून प्राण गमवावे लागलेले आहेत.अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.याला जबाबदार कोण?

   दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची संख्या ही झपाट्याने वाढत चालल्यामुळे वन्य विभागाने वन्य प्राण्यांच्याअत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी जंगलात मुबलक प्रमाणात पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली पाहिजे.फक्त कष्टकरी गरीब शेतकऱ्यांच्या वर विविध प्रकारच्या केसेस दाखल करून नाहक गरीब शेतकऱ्यांना त्रास देवू नये.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.तो जगला तरच आपण जगणार आहोत.याचा गांभीर्याने जे कोणी जबाबदार असतील त्यांनी याची खबरदारी घ्यावी.जंगलातील वन्य प्राणी जंगलातून शेतकऱ्यांचा पिकांच्या मध्ये येणार नाहीत.यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्यात याव्यात.जंगलांच्या सभोवती तटबंदी करावी.किंवा त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या कर्मचारी यंत्रणेच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त करण्यासाठी कटाक्षाने दक्षता घ्यावी.जंगलातील वन्य प्राण्यांच्या पासून होणारा त्रास एकीकडे मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे नदीच्या पात्रात मगरींच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत.त्यामुळे नदीची पात्र ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षित राहिलेली नाहीत.पाळीव प्राण्यांच्या वर आणि माणसावर मगरीचे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्यांनी ती स्वीकारुन त्वरित कार्यवाही करण्यात यावी.अनेक वेळा बळीराजाला किंवा शेतकरी बांधवांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते.वेळेवर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना थोडं फार उत्पादन मिळते.नाहीतर.अतिशय पाऊस पडल्यामुळे,चक्रीवादळा मुळे,महापुरामुळे,ओला दुष्काळामुळे काही वेळा वेळेवर पाऊस न पडल्याने कोरडा दुष्काळ पडून हाता तोंडाशी आलेली सर्व प्रकारची पीक पुर्णपणे करपून सुखून जातात.

शेतकरी बांधवांनी केलेला मशागतीच्या कामांचा खर्च,बी बियाणांचा खर्च,वापरलेल्या खतांचा खर्च, औषध फवारणीसाठी झालेला खर्च, इत्यादी केलेल्या संपूर्ण खर्चाला शेतकरी बांधवांना भुर्दंड सोसावा लागतो.त्यामुळे शेतकरी नेहमी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या अवस्थेत कसंबसं जीवन जगण्यासाठी धडपडत करीत असतो.अश्या सर्व बिकट परिस्थितीला तोंड देत.संसाराचा गाडा ओढताना त्याचे पुर्णपणे आर्थिक घडी विस्कटून गेलेली दिसून येते.मुलांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च,दवाखान्यात औषध उपचारासाठी होणारा खर्च, मुलांच्या विवाहासाठी होणारा खर्च, शेतीच्या कामासाठी  सेवा सोसायटी मधून घेतलेली कर्ज.वेगवेगळ्या अडीअडचणीच्या बॅंकेतून घेतलेली थकीत कर्ज.त्या सर्व कर्जाच्या वसूली साठी अधिकाऱ्यांनी लावलेला तगादा.दैनंदिन उध्वभवणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने शेवटी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत.याला जबाबदार कोण?

  दिवसेंदिवस वाढणाऱ्या खतांच्या,औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकरी बांधवांनी वर्षभर रक्ताचे पाणी करून,घाम गाळून पिकवलेल्या पिकांना त्यांच्या उत्पन्नाशी निगडित बाजार भाव किंवा योग्य तो मोबदला  मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.”बाप भीक मागू देईना.आई पोटाला जेवू देईना” अशी अवस्था शेतकरी बांधवांची झाली आहे.देशातील शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे.तेच जर शेतकरी बांधवांचे शोषण करून शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करीत असतील! तर ते शेतकरऱ्यांचे कैवारी नसून मारेकरी म्हणायचे का?. अनेक शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने अभ्यास करून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी विविध सवलतीच्या योजना राबविण्यात आल्या पाहिजेत.आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत.पुर्वीच्या काळी असे वर्गीकरण केले जात होते.उत्तम शेतकरी मध्यम् व्यापार,कनिष्ठ नोकरी.समजली जात होती.शेतकऱ्याची एकूण जमीन आणि जनावरांची एकूण संख्या पाहून त्यांची श्रीमंती ठरवली जात होती.आज सर्व परिस्थिती उलट झालेली दिसून येते. उत्तम् नोकरी,मध्यम व्यापार,कनिष्ठ शेतकरी.समजली जाऊ लागली आहे.

   आज काल विवाह जमविने ही शेतकऱ्यांच्या बाबतीत तारेवरची कसरत झाली आहे.आज प्रत्येकांच्या घरी मुलांच्या बरोबरीने मुली ही उच्च दर्जाच्या पदव्या संपादन केलेल्या आहेत.त्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांना कोणी मुलगी देण्यासाठी तयार नाहीत.आणि मुली ही शेतकऱ्यांच्या मुलांना पसंत करायला तयार नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलां मुलींचे विवाह जमविने महाकठीण समस्या निर्माण झालेल्या आहेत.सध्या नोकरी बाबतीत विचार केला तर.शासन कर्त्यांनी आपल्या देशातील खाजगी करणामुळे सर्व क्षेत्रातील शासकीय नोकऱ्या संपलेल्या आहेत.तेंव्हा प्रत्येक मुलीला सरकारी नोकरदार मुलगा मिळणार कोठून? आई वडिलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा सध्या जमीन वर पाय ठेवून राहिलेल्या नाहीत.भरपूर मोठा पाच अंकी पगार असलेला,सुंदर अवाढव्य बंगला असलेला, चारचाकी गाडीवाला,भरपूर शेती असलेला,कुटूंबामध्ये जास्त माणसं नसलेला.एकुलता एकटाच असल्यास अतिउत्तम या सर्व बाबी विचारात घेतल्या तर ज्या वयात मुला मुलींचे विवाह व्हायला पाहिजे होते.ते न झाल्याने लग्नाची वयोमर्यादा ओलांडून जाताना दिसत आहेत.त्यामुळे लग्न जमविने ही एक गंभीर समस्या शेतकरी बांधवांच्या समोर निर्माण झाली आहे.खाणार तर तुपाशी ! नाही तर उपाशी! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जीवनात यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न करुन उपलब्ध असलेल्या परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता असायला पाहिजे.ती दिवसेंदिवस कमी होत चालेली दिसून येते.सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान,यांत्रिकीकरण, टेक्नॉलॉजीचा,तंत्रज्ञानाचा,औषधांचा,मुबलक साठा भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा,विद्यूत उपकरणे कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात यावी.सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील किमान एखाद्या मुलाला शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.खाजगी करणामुळे शासकीय नोकऱ्या संपलेल्या आहेत.याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.

सुशिक्षित तरुणांच्या बेकारीमुळे तरुणांचं आर्थिक परिस्थिती खडखडाट झाल्याने. त्यांची मानसिक संतुलन बिघडत असल्याने व्यसनाधीनता वाढत जावून.कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहेत.निवडणूकीचा वेळी राजकीय लोक प्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्व सामान्य जनतेला खोट्या आश्वासनांची खैरात केली जाते.सत्तेची खुर्चीवर मिळाली की निवडणूकी नंतर लोक प्रतिनिधी दुतोंडी होऊन तो मी नव्हेच असल्याची भुमिका घेत आहेत.सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या घामातून शासकीय तिजोरीत कराच्या रूपातून जमा झालेल्या पैशाची लूट करुन यांच्या कित्येक पिढ्या बसून खातील इतकी शासकीय तिजोरी लुटली जात असल्याचे दिसून येत आहे.एखादा घर गडी (नोकर) दोनशेहून अधिक हजारो कोटी रुपयांचा खजिनदार होतो.इतकी संपत्ती आली कोठून? याला जबाबदार कोण?.सुशिक्षित बेरोजगारांची माती (डोकी) भडकावून जातीच्या,धर्माच्या,दैववादाच्या नावाखाली देशात दंगली पेटविण्याची कटकारस्थान रचली जात आहेत.त्यामुळे देशांत अस्थिरता माजून देशाचा विकास घडवून आणला जावू शकतो का? उलट देशाच्या विकासासाठी अशी कृत्ये हानीकारक पोहोचवू शकतात.गर्भ श्रीमंतांची किंवा मनुवाद्यांची मुलं परदेशात जाऊन उच्च दर्जाच्या पदव्या संपादन करून उच्च दर्जाचे पदाधिकारी होतात.न्याय व्यवस्था,अर्थ व्यवस्था, राजकीय व्यवस्था,देशाची सर्व सुत्र  त्यांच्या हातात.चुकून त्यातील काहीजण थोडेफार शिक्षणात मागे राहतात.ते सर्व देवळातील पुजारी बणतात.देवळातील दानपेटीचे ए.टी.एम्.कार्ड त्यांच्या हातात.ते कोणत्याही दंगलीच्या वेळी किंवा देशाच्या हितासाठी हातात दगड धोंडे घेऊन. रस्त्यावरील दंगलीत असल्याचे कोणी पाहिले आहेत का ॽ. सर्व सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून दंगलीच्या वेळी वापर करून घेतला जातो.आणि शेतकरी बांधवांच्या मुलांना पोलिसांच्या लाठ्या काठ्यांचे मार सहन करुन सामोरे जावे लागते.आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस मध्ये अडकवले जाऊन त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे.

  दंगली घडवून आणण्यासाठी जे कोणी प्रयत्न करणारे असतात ते मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित बसून दंगलीचा आंनद लुटत असलेलेपहावयास मिळतात. दंगली नंतर  त्यांना सोडविण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी कोणी येत नाहीत.देशाच्या   दृष्टीने दंगली अत्यंत मारक ठरतात.या सर्व गोष्टींचा बहुजनांच्या मुलांनी स्वतः चे आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.विज्ञान युगात शासकीय व्यवस्थेने देशातील सर्व सामान्य शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेत असलेल्या शाळा ओसाड पाडून मुलांचे शैक्षणिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याचा घाट घातलेला असल्याचे दिसून येतो.

  दुसरीकडे शासकीय तिजोरीतील पैसा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी खर्च करण्याची व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते.यामुळे देशाची भावी पिढी विज्ञानवादी, विवेकवादी,टेक्नॉलॉजी,तंत्रज्ञान,यांत्रिकी दृष्ट्या प्रगतिशील होण्या ऐवजी दैववादी बनून अंधश्रद्धेच्या मानसिक दृष्ट्या कमकुवत होवून कर्मकांडाच्या आहारी जाऊन शोषण कर्त्यांच्या जाळ्यात अडकवली जाण्याची दाट शक्यता आहे.आणि बहुजन लोकांना कायमचे मानसिक दृष्ट्या गुलाम बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.शेतकरी बांधवांच्या किंवा बहुजनांच्या तरुणांनी देवळात रांगा लावण्या ऐवजी वाचणालयाच्या इमारती समोर रांगा लावण्याची खरी आवश्यकता आहे.तरच आपल्या जीवनात परिवर्तनाच्या बियाणांची निर्मिती होवून विज्ञानवादी विवेकवादी वृक्षांची वाढ होऊन देशाची प्रगती झपाट्याने होण्यास मदत होईल.अनेक मार्गांनी धनसंपत्ती मिळवलेल्या बलाढ्य माणसाच्या रक्षणासाठी नेहमी देवळात देव कार्यरत असतांना.देवळा समोर दानपेटीतची आवश्यकता काय?. दानपेटीतची खरी गरज ती सर्व सामान्य शेतकऱ्यांचे नातेवाईक आजारी पडल्यावर औषध उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जातात.त्यावेळी दवाखान्याचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी बांधवांच्या कडे थोडीफार असलेली जमीन संपत्तीने बलाढ्य असलेल्या व्यक्तीला विकून किंवा कर्ज काढून पैसे भरत असतात.तसेच सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी किंवा शालेय फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते.अशा ठिकाणी दानपेटीतील आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

  अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे अवकाशातील चंद्र,सुर्य,ग्रहांच्यावर संशोधन शास्त्रज्ञ करीत आहेत.वैज्ञानिक संशोधनामुळे नवनवीन तंत्रज्ञान शोधून देशांची अभिमानाने मान उंचावली जात आहे.आणि भारतीयांच्यात दिवसेंदिवस जातीयवाद,धर्मवाद, दैववाद पेटवून दररोज कुत्र्या मांजरा प्रमाणे माणसामाणसात अमानुषपणे कत्तली घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.दररोज महिलांच्या वर होणारे अमानूष लैंगिक अत्याचाराची मालिका चालू आहे.३३ कोटी देवीदेवतांचे वास्तव असलेल्या देशांत अशी कृत्ये घडवून आणली जातात हे अंत्यंत निंदनीय बाब म्हणावी लागेल! माणसा बरोबर माणूस म्हणून कधी वागायला शिकणार हा माणूस?.जन्माला येताना सोबत कोणीही जात,धर्म,देव घेऊन आलेला नाही.आणि जातानाही सोबत कोणी घेऊन गेलेला नाही.या पृथ्वीवर थोड्याच.दिवसां करीता भाडोत्री पाहुणा म्हणून जन्माला आलेला आहेस याची नेहमी जाणीव ठेवून माणसाशी माणसासारखे माणूस म्हणून वागायला शिक!

   अस्तित्वात नसलेल्या गोष्टीच्या मागे लागण्या पेक्षा अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा जीवनात योग्य फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न  करणं गरजेचं आहे.अनेक संतांनी आणि राष्ट्रीय थोर महा पुरष्यानी प्रबोधनातून समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केलेले आहे.खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे! जे का रंजले गांजले तेचि म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा! ही आपल्या संतांची शिकवण आहे.दररोज कालबाह्य झालेली नवनवीन वादग्रस्त वक्तव्य करून देशांत अस्थिरता माजून दंगली घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कोण ?आहेत.याचा सुशिक्षित शेतकरी बांधवांच्या तरुणांनो विचार करावा.आणि विचार करण्याची  काळाची गरज आहे.जीवन जगत असतांना विवेकवादी विचारांनी प्रभावित होऊन सत्य स्वीकारावे.आणि असत्य फेकून देण्याची मानसिकता तयार करण्याची खरी गरज आहे.शेतकरी बांधवांनो प्रयत्नांच्या वेलीवर नेहमी यशाची फूले उमलत असतात.याची नेहमी जाणीव ठेवावी.आपल्या जीवनातील येणाऱ्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान हेच यशस्वी होण्याचा महामंत्र असतो.

   निसर्गातील पर्यावरणाची आणि वन्य पशू पक्षी, प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही देशातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.परंतु शेतकरी बांधव जंगलात गेला किंवा शेतकऱ्यांने आपल्या मालकीच्या हक्काच्या बांधावर असलेले झाडे घर बांधकामासाठी तोडले तर त्यांच्या विरोधात वनकर्मचारी लगेच नियमा प्रमाणे कायदेशीर कारवाई करताना तत्परता दाखवतात.तेच वन्य क्षेत्रातील प्राणी शेतकरी बांधवांच्या मालकीच्या हक्काच्या क्षेत्रात वेळी अवेळी येऊन पिकाची नाशधूस करतात. शेतकरी बांधवांच्या वर हल्ला करतात.त्यावेळी वनकर्मचारी कुठे असतात.अहोरात्र काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकांचे नुकसान करून वन्यजीवांचे पालन पोषण करणार आहात का ॽ शेतकऱ्यांनी आपलं कुटुंबांचे पालनपोषण करायचं कसं ? याला जबाबदार कोण?

  प्रगतिशील शेतकरी जमिनीची मशागत करून मातीत बियाणे गाढत असतो.एक दाणा स्वतःला गाडून घेतो.आणि त्या बियाणाला ओलावा,उबारा मिळाल्या नंतर अंकूर  फुटून रोपटे तयार होते. एका रोपट्या पासून हजारो बियाणांची निर्मिती होत असते.म्हणूनच आपल्या पोटाची भूक आपण भागवीत असतो.बियाणे मातीत ढाकत असताना त्याच्या सोबत शेतकरी स्वतःच्या भविष्याची स्वप्ने मातीत ढाकत असतो.काबाड कष्टातून शेती ज्या वेळी बहरलेली असते.त्या वेळी त्या शेतातील पिके पाहून शेतकऱ्यांची स्वप्न आनंदाने प्रफुल्लित होतात.आणि तेच पीक ज्या वेळी होरपळून सुकून जातात ते पाहून शेतकरी बांधवांची स्वप्न धुळीस मिळतात.तरी देखील शेतकरी पुन्हा एकदा स्वतःला नवीन वर्षाच्या नवीन स्वप्नाची प्रतिक्षा करत काळ्या आईची सेवा करीत असतो.धन्य तो  शेतकरी.अश्या या जगाच्या पोशिंद्याला माझा कोटी कोटी प्रणाम,धन्यवाद! 

देशमुख पी.आर.

9921111955

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *