
बोधगया केसची आनंदाची बातमी,सुप्रीम कोर्टाचा बी टी एक्ट रद्द करण्याच्या संबंधी अंतिम फ़ैसला 29 जुलाई 2025 रोजी.
महाबोधी महाविहार बी टी एक्ट रद्द करण्याच्या याचिका गेल्या बारा वर्षापासून रद्दीत पडली होती.त्याबाबत ची कारवाई 16 मे 2025 ला सुप्रीम कोर्टात विचारात घेण्यात आली होती.गेल्या वर्षी ही ती एकदा पुढे आली होती.इतका ज्वलंत विषय असतांना त्यावर इतके दिवस का सूनवाई झाली नाही असे याचिका कर्ते वकील ऍड.आनंद जी यांनी न्यायमूर्ती दिपांकर व न्यायमूर्ती मनोहर दीप यांना सांगितल्यावर त्यांनी न्यायमूर्ती नी सरकारी वकिलांना एवढे दिवस कारवाई का केली नाही यांची विचारना केली. आणि विनाविलंब दोन आठवड्यात माहिती सादर करा. अन्यता 29 जुलै 2025 अंतिम निकाल जाहीर केल्या जाईल. असे न्यायमूर्ती दिपांकर आणि मनोहर दीप यांनी जाहीर केले.
बुद्ध शांतीचा संदेश देतात. त्यामुळे देशात कायदा सुव्यवस्था आणि शांती राहिली पाहिजे या विचारांची महाबोधी महाविहार मुक्ती समिती आहे.देशभरात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भिख्खू संघ आणि उपासक,उपासिका यांच्या द्वारे बोधगया येथे जे लक्षवेधी जनआंदोलन सुरू आहे त्यामुळे जगभरात विचारांची उलथा पालथ होत आहे.अती संवेदनशील ज्वलंत विषय हाताळतांना प्रशासन व पोलिस कर्तव्यदक्ष,प्रामाणिक दिसत नाही.मी डॉ.एम.एल. परिहार, पाली,जयपुर एक सप्ताहा या जन आंदोलनात सहभागी झालो होतो. मी सत्य परिस्थिति डोळ्याने पाहत आहे.जन आंदोलनात दररोज लाखों शील संपन्न भिख्खू संघ,उपासक,उपासिका,हितचिंतक,सामाजिक संस्था संघटना मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
अशा जन आंदोलनात कोणी ही भिख्खू संघ, उपासक,उपासिकांची नेतृत्वाची इच्छा या अतिमहत्त्वकांक्षा नाही.याविरोधात मनुवादी अफवा पसरवत आहेत.यूनेस्को,केंद्र सरकार, राज्य सरकार,सर्वोच्च न्यायालयात या जन आंदोलनाच्या प्रमुखांनी संपर्क ठेवला आहे. त्यासाठी शील संपन्न भिख्खू संघ, उपासक,उपासिका,हितचिंतक, सामाजिक संस्था संघटना यांनी खूप शांतेतेने आणि खूप समजूतपणे वागले पाहिजे.सर्वांना नम्र विनंती आहे बोधगया परिसरातील लोक कमी शिकलेले आणि अज्ञानी आहेत त्यांच्या विरोधात वाद विवाद,भांडण करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यामुळे या जन आंदोलनाला वेगळे वळण लागून कायदा सुव्यवस्था बिगडू शकते.त्यामुळे आपलेच नुकसान होईल. यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह,नाशिकच्या काळ्या राम मंदिरचा सत्याग्रह आठवा त्यावेळी सत्याग्रहावर मोठ्या छुप्या पद्धतीने हल्ले करण्यात आले होते. पण बाबासाहेबांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले होते ही लढाई तेव्हा आपल्या आडदांड माणसांनी हातात काठी घेऊन लढली असती तर सत्याग्रहातील महत्वाचा मुद्दा बाजूला राहिला असता आणि मारमारीत आपली शक्ति खर्च झाली असती.पण बाबासाहेबांनी बुद्धीच्या बळावर आणि कायदे कानून च्या अभ्यासवर सत्याग्रह यशस्वी करून दाखविला.बुद्ध शांतीचा संदेश देतात. त्यामुळे देशात कायदा सुव्यवस्था आणि शांती राहिली पाहिजे या विचारांची महाबोधी महाविहार मुक्ती जन आंदोलन आता सर्व पातळीवर अंतिम टप्यात आले आहे.म्हणूनच शांतेते ही जन आंदोलन चालले पाहिजे. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यापासून सर्वानी सावध राहिले पाहिजे.
महाबोधि मुक्ति आंदोलन बोधगया मध्ये आकाश लामा,वयोवृद्ध पूज्य भिख्खू डॉ.चंद्रकीर्ति, भंते प्रज्ञाशील,भंते धम्मताप,भंते ज्ञानज्योति आदि अनेक पूज्य भिख्खू ,आणि उपासक उपासिका शांती दूत म्हणून लढत आहेत.बारा वर्षा नंतर 16 मे ला सूनवाई आणि 29 जुलाई 20225 ला अंतिम निकाल फैसला. यांचे सर्व कागद पुरावे माझ्या कडे आहेत. त्यासाठी सर्व सामाजिक,अधिकारीक,पक्षविरहित स्ट्रैटेजिक विजय होणार आहे.यासाठी सर्व शील संपन्न भिख्खू संघ,उपासक,उपासिका,हितचिंतक,सामाजिक संस्था संघटना यांनी खूप शांतेतेने आणि खूप समजूतपणे वागले पाहिजे.बोधगया मुक्ती जन आंदोलनाचे साक्षीदार बना. हा इतिहास लिहला जाणार,त्यात हा संघर्ष लिहला जाणार आहे. पुढील वेळ आणि काळ हा तथागत बुद्धा च्या दुख मुक्ती मार्गाने जाणार आहे.हम होयेंगे कामयाब,एक दिन. होगी शांती चारोंओर एक दिन.सबका मंगल हो…सभी जीव सुखी हो
डॉ.एम.एल.परिहार,पाली,जयपुर। 9414242059