वृत्तपत्राची महत्ता व वर्तमान स्थिती
“कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या
चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते अन्यथा
चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे
होते”… डॉ बाबासाहेब आंबेडकर
वर्तमान पत्राचे महत्व विशद करण्यासाठी बाबासाहेबांचे हे कथन अतिशय मोलाचे व पर्याप्त आहे.अस्पृश्य,दलित, शोषित जनतेची व्यथा व आवाज सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी व अन्यायावर प्रकाश टाकण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 31.01.1920 रोजी मुकनायक नावाचे वृत्तपत्र पाक्षिक मराठी भाषेत प्रारंभ केले आज या ऐतिहासिक घटनेला 105 वर्ष पूर्ण होत आहेत.वृत्तपत्र काढण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी 2500/-रुपये ची आर्थिक मदत केली.दलित,शोषित समाजाचे प्रबोधन करण्यासाठी,जागृती निर्माण करण्यासाठी मुकनायक नंतर अनेक वृत्त पत्र जसे, बहिष्कृत भारत,समता,जनता,प्रबुद्ध भारत इत्यादी प्रकाशित केलेत. या वृत्तपत्राच्या संपादकाचा भार बाबासाहेबां सोबतच श्री पांडुरंग भटकर,श्री गणेश सहस्त्रबुद्धे,श्री.बी. सी.कांबळे,श्री.भैयासाहेब आंबेडकर,श्री.दादासाहेब रुपवते,श्री शंकरराव खरात श्री भारत कद्रेकर,श्री देवराव नाइक यांनी सांभाळला. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणा नंतर प्रबुद्ध भारत हे पाक्षिक बंद पडले. 2017 मधे बाबासाहेबांचे नातू श्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत नवीन स्वरूपात आरंभ केले.बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र असल्यामुळे सर्व वृत्तपत्र हे मराठी या सामान्य भाषेत होते.महात्मा गाँधी यांनी प्रकाशित केलेले वृत्तपत्र यंग इंडिया,हरिजन हे इंग्रजी भाषेत होते त्यामुळे यांना जनतेचे वृत्तपत्र म्हणने चुकीचे होईल.
वृत्तपत्र हे आंबेडकरी चळवळीचे मोलाचे शस्त्र होते आणि आहे.बदलत्या काळात मास मीडिया चे अनेक साधन उपलब्ध आहेत तरीही पण वृत्तपत्राचे महत्व कायम आहे. बाबासाहेबांच्या चळवळीला धार देण्यासाठी व समाज क्रांती,जाग्रूती निर्माण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या वृत्तपत्रानी विशेष करून बाबासाहेबांनी शुरू केलेल्या वृत्तपत्रानी खूप महत्वाची अग्रणी भूमिका बजावली आहे.आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक बांधिलकीचे वृत्तपत्र हे एकमेकास पूरक आहेत.आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्देश :1) समता,स्वातंत्र,बंधुत्व,धर्म निर्पेक्षता,लोकशाही मार्गावर राष्ट्र निर्मिती.2) सामाजिक उत्पीड़न,शोषण,अस्पृश्यता पासून मुक्ति. 3) शिक्षणाचा प्रचार,प्रसार.विशेष करून दलित,शोषित,वंचित समाजाच्या आर्थिक, सामाजिक,विकासासाठी शैक्षणिक विकासाला प्राथमिकता 4) दलित,शोषित समाजाला शासनकर्ती जमात बनविने.दलित,शोषित वर्गास राजकीय सत्तेमधे पर्याप्त प्रतिनिधित्व मिळवून देने.स्वतंत्र राजकीय शक्ति निर्माण करणे. वर्तमान काळात सामाजिक बांधिलकीचे अनेक वृत्तपत्र आले आहेत.महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात असे वृत्तपत्र मुद्रित व प्रसारित होत आहेत.आधीच्या पाक्षिक, साप्ताहिक वृत्तपत्राची जागा दैनिक वर्तमान पत्रानी घेतली आहे.सामाजिक बांधिलकीच्या वृत्तपत्राचे मूल्यांकन वरील 4 कसोटी वर करावे लागेल.सामाजिक प्रबोधन,शैक्षणिक विकास,सामाजिक अन्याय,अत्याचार विरुद्ध आवाज बुलंद करने किंवा आंदोलन उभे करणे यात सामाजिक बांधिलकीच्या वृत्तपत्राचे महत्वपूर्ण योगदान राहले आहे.परंतु स्वतंत्र राजकीय शक्ति निर्माण करण्यात यश आले नाही.
सामाजिक बांधिलकीच्या वृत्तपत्राकडून स्वतंत्र राजकीय शक्ति निर्माण करण्यात सक्रिय सहयोग कराण्याची अपेक्षा आहे.राजकीय सत्ता ही दलित,वंचित समाजाच्या विकास,उत्थानाची गुरुकिल्ली आहे.भाजपा आणी काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भाजपाला शत्रू लेखायाचे आणी काँग्रेस विषयी मवाळ भूमिका घेणे किंवा “दगड आणी विट” खेळ मांडने मूर्खपनाचे व विश्वासघातक आहे.भाजपाची भीति,दहशत निर्माण करून व आपल्याच नेत्यावर खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करून काँग्रेस-आघाडीला वोटिंग करण्याचे आव्हान करणारे लेख निवडणुक काळात प्रकाशित करने सामाजिक बांधिलकी गृहीत धरावे काय याचा विचार वृत्तपत्रानी,भाग धारकांनी व हितचिंतकांनी करावा कारण वृत्तपत्राचे मूल्यांकन हे “निवडणूकीच्या तापलेल्या निर्णायक दिवसातच” होत असते, “खायचे आणी दाखवायाचे” तेव्हाच दिसून येतात. राजकीय हित गहाण ठेऊन सरसकट बिनशर्त काँग्रेसचे समर्थन केले तर स्वतंत्र राजकीय शक्ति निर्माण होईल काय? काँग्रेस आघाडी कधीच युती करून आंबेडकरी पक्षाना पर्याप्त जागा किंवा प्रतिनिधित्व देत नाही,फक्त “हरिजन गैंग” ला हाताशी घेऊन किंवा “त्यांच्या समोर तुकडे फेकून” पर्याप्त जागा ऑफर केल्याचा भास निर्माण करते व भाजपाची भीती दाखवून “आंबेडकरी वोटिंग हाईजैक” करण्याचा प्रयत्न करते.राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी निवडणूकीत सहभाग अत्यंत आवश्यक आहे.काँग्रेस आघाडी ने “टाकाऊ” म्हणून सोडलेल्या लोकसभेच्या 1-2 व विधान सभेच्या 5-7 जागेवरच निवडणुक लढविली तर राजकीय शक्ति निर्माण होईल काय?
महाराष्ट्रात आंबेडकरी विचाराच्या नावावर निदान 50 तरी पक्ष आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी व बसपा सोडले तर बाकीच्यांचे अस्तित्व हे कागदावर आणी “लेटर पेड़” वर आहे.गुण-दोष सर्वातच आहेत म्हणून जे उपलब्ध आहे त्यामधुनच निवडायाचे असते.श्री प्रकाश आंबेडकर,आठवले,कवाडे इत्यादी नेत्यांचे सामाजिक आंदोलन व चळवळीत योगदान राहले आहे,आज त्यांचे निर्णय चुकले असतील तरी त्यांच्या विरुद्ध पातळी सोडून लिखाण प्रकाशित करने ते ही काँग्रेस आघाडीच्या निकृष्ट नेत्यांच्या प्रचारासाठी उचित मानता येणार नाही. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडीला “वंचित” ची भीति होती त्यामुळे त्यांनी “हरिजन गैंग” ला पुढे करून श्री.प्रकाश आंबेडकर यांना “लक्ष” केले. नामांतर आंदोलन,रिडल्स प्रकरण,मंडल कमीशन आंदोलनात श्री.प्रकाश आंबेडकर यांचे बहुमूल्य योगदान राहले आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे बौद्धांना केन्द्रीय स्तरावर अनुसूचित जाती च्या सवलती मिळवून देण्यात श्री.प्रकाश आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बौद्धांना केन्द्रीय स्तरावर अनुसूचित जातीच्या सवलती व आरक्षण काँग्रेस ने 40 वर्षापर्यंत नाकारले परंतु हे आरक्षण श्री व्ही.पी.सिंग प्रधानमंत्री कार्यकाळात लागू झाले. हे सर्वांना माहीत आहे की श्री.प्रकाश आंबेडकर,श्री.रामविलास पासवान त्या काळात श्री.व्ही.पी.सिंग यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी होते.बौद्धांना आरक्षण सवलती लागू झाल्यामुळे संपूर्ण देशभर अनुसूचित जातीचे लोक बौद्ध धर्मीय म्हणून नोंदणी करण्यास स्वतंत्र झालेत याची परिणीति बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्यास होत आहे व जगाचे ध्यान केंद्रित होत आहे,आंतरराष्ट्रीय ख्याती, मान्यता मिळत आहे. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणा नंतर जवळपास 40 वर्ष पर्यंत सर्वच “रिपब्लिकन नेत्यांनी” बौद्धांना केन्द्रीय स्तरावर अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्या साठी भरसक प्रयत्न केलेत परंतु काँग्रेसच्या जातीयवादी नकारात्मक भूमिकेमुळे हे शक्य झाले नाही. 50 वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याचे कट कारस्थान ही काँग्रेसचे आहे. EVM विरुद्ध न्यायिक लडाई मधे श्री.प्रकाश आंबेडकर यांचे योगदान आहे.श्री.प्रकाश आंबेडकर यांना सत्तेची व्यक्तिगत महत्वाकांशा असती तर श्री आठवले पेक्षा निश्चितच चांगल्या स्थितीत असते व राहू शकतात त्यांना स्वःताच्या प्रकृतीकड़े दुर्लक्ष करून स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची गरज नाही आहे. श्री.प्रकाश आंबेडकर यांचा आदर करण्यासाठी व त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी एवढे पूरे आहे.स्वताची 1000 वोट घेण्याची लायकी नसतांना ही लाखात वोट घेणाऱ्या व उम्मेदवारांना मिळवून देणाऱ्या नेत्या विरुद्ध दोषारोपण करणारे तथाकथित आंबेडकरी विचारवंत (?) बुद्धीवंत (?) यांची आलोचना करण्यास शब्द अपुरे आहेत. सामाजिक बांधिलकीच्या वृत्तपत्र चालक,मालक,वाचक,भागीदार, संपादक मंडळ यांनी चिंतन करण्याची गरज आहे की आंबेडकरी चळवळीतील नेत्याविरुद्ध निवडणूकीच्या धामधुमित दोषारोपण,दुष्प्रचार करणारे लेख प्रकाशित करणे योग्य आहे काय? स्वतंत्र राजकीय शक्ति निर्माण होईल काय? आपण आपल्याच नेत्यांची लक्तरे टांगायाची काय?चळवळीत किंवा राजकीय क्षेत्रात ऐकता निर्माण होईल काय? वर्तमानपत्र सर्वसमावेशक होईल काय? लोक जुडतील की तूटतील? उद्देश सफल होईल काय? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.
सामाजिक बांधिलकीचे वर्तमानपत्र सामाजिक सहकार्य व आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत.हे वर्तमानपत्र आपल्या पायावर व सामार्थ्यावर उभे राहिले पाहिजेत व त्यांना स्थर्य मिळाले पाहिजे हे आवश्यक आहे.या दैनिकांनी प्रथमता सामाजिक बांधिलकी जपायची आहे यात तड़जोड़ होता कामा नये परंतु सोबतच व्यवसायिक दृष्टिकोण पण आणने जरूरी आहे.टाइम्स, लोकमत समूह सारखे दैनिक खंबीर पायावर उभे आहेत त्यांच्या समकक्ष सामाजिक बांधिलकीचे दैनिक उभे राहले पाहिजेत.नुसता सामाजिक बांधिलकी म्हणून दैनिकांचा खप वाढवून किंवा वाचक वर्ग वाढवून भागणारा नाही तर लोकांना दैनिक आवश्यकता म्हणून या दैनिकाकडे वळवावे लागेल त्याशिवाय व्यावसायिक जाहिराती मिळणार नाहीत. व्यावसायिक जाहिराती दैनिक वर्तमान पत्राच्या मजबूती व स्थर्यासाठी आवश्यक आहेत. या करिता सामाजिक बांधिलकीच्या दैनिकांचा स्तर सुधारावा लागेल.प्रिंटिंगचा,बातम्यांचा स्तर,गुणवत्ता,सुधारावा लागेल. परंपरागत व्यवसायिक दैनिका सारख्या स्थानीय, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय निःपक्ष बातम्या द्याव्या लागतील,पर्याप्त संख्येत प्रतिनिधी, बातमीदार नियुक्त करावे लागतील.मला जाणिव आहे की लिखाण करने, सूचना करने सोपे आहे.परंतु भागधारक,हितचिंतक यांनी “वन टाइम मेंझर” समजून निवेश केला तर भविष्य उज्वल राहिल रू.25000, 50000 निवेश करणारे भागधारक ठरविन्याच्या जागी रू.5000, 10000 निवेश करणाऱ्या भागधारकांना संधी दिली तर जास्त लोक जुळतील,निवेश पण पर्याप्त होईल तसेच दैनिकांचा खप वाढण्यात मदत मिळेल.या शुभ प्रसंगी सर्व सामाजिक बांधिलकीच्या वर्तमान पत्रांना,भागधारक,वाचक वर्ग,चाहते यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणी अभिनंदन. लक्ष्मण बोरकर 77093 18607,नागपूर.