भारतीय कामगार चळवळीचे जनकरावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे.

बातमी शेअर करा.

भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या ९ फेब्रुवारी १२८ व्या स्मृतीदिना निमित्य विशेष लेख.

भारतात आज कामगार संघटना ट्रेड युनियन राजकीय पक्षाच्या बटीक झाल्या आहेत. त्यामुळे भांडवलदार मालक वर्ग राजकीय पक्षाला भरपूर निवडणूक निधी देऊन नेत्यांनाच विकत घेत आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रातील संघटीत कामगारांचे जिंवन उध्वस्त झाले आणि होत आहे.भांडवलदार आणि उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून असंघटीत कष्टकरी कामगार,मजुर,शेतमजुरनां मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी सर्व प्रथम स्वबळावर संघटीत झाले पाहिजे.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली संघटीत झाल्यामुळे आज कामगार,कर्मचारी देशोधडीला लागले आहेत.हे कोणी नाकारू शकत नाही.सेवा निवृत्त झालेल्या कामगारांच्या रिकाम्या जागा न भरता ठेकेदारी पद्धत सुरु होण्यास संघटीत कामगारांच्या ट्रेड युनियन जबाबदार आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रात ठेकेदारी पद्धतीने असंघटीत कामगारांचे शोषण मोठया प्रमाणात होत आहे.जे काम कायम स्वरूपी चालते,असते त्या कामासाठी ठेकेदारी देण्याचा प्रश्नच येत नाही.ते काम ठेकेदारी वर देणे म्हणजे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचे उघड समर्थन करणे होय!. 

   यालाच महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी विरोध करून देशव्यापी संप घडवुन आणला होता.हे आजच्या सर्व ट्रेड युनियन चालविणारे नेते विसरले आहेत.कारण आजच्या ट्रेड युनियन मनुवादी,हिंदुत्ववादी विचाराच्या खंबीर समर्थक आहेत.त्यांना कामगार कर्मचाऱ्यात समानता नको आहे.तर मनुवादी जातीची विषमता म्हणजेच जातीव्यवस्थाच हवी आहे.यालाच बहुसंख्य पुरोगामी समाजवादी,आंबेडकरवादी कामगार कर्मचारी साथ देतात.यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वात मोठे कामगार कर्मचारी असलेलं सार्वजनिक क्षेत्र रेल्वे उधोग धंद्यामधील नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU )आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS). यात बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकृत सभासद आहेत.त्यांना १२ व १३ फेब्रुवारी १९३८ मनमाड येथे रेल्वे गॅंगमन कामगारांच्या दोनदिवशीय कामगार परिषद मध्ये डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेले आजही त्यांना मान्य नाही.मग कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होणारच !.
   सुशिक्षीत व सुरक्षित नोकरी करणारे संघटीत असतात. म्हणून त्याच्या वर कोणी कधीच अन्याय,अत्याचार करीत नाही.तशी हिंम्मत कोणी ही करीत नाही.कुटूंबातील एक व्यक्ती सुशिक्षीत झाला तर त्याला सुरक्षीत नोकरी मिळते.नोकरी मिळाली की आर्थिक प्रश्न सुटतो.त्यामुळे सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक समस्यावर मात करता येते. असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते,आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता.कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही.या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरणी कामगाराचे नेते नारायण मेंघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष करीत होते. मालक दाद देत नव्हते.तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले होते.त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षा नंतर १० जून १८९० ला मिळाले. त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मान्य केल्या.तेव्हा पासून म्हणजे १० जून १८९० पासून सर्व सार्वजनिक सरकारी कार्यालयांना कंपन्यांना उपक्रमांना रविवार ही साप्ताहिक हक्काची सुट्टी मिळत आहे.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद करून ठेवली.पण त्याची अंमलबजावणी आजही कुठेच होताना दिसत नाही.मग इंटक,आयटक,सिटू,बीएमएस, एच एम पी,सारख्या राष्ट्रीय ट्रेड युनियन काय करतात?.आजच्या अनेक सुशिक्षित व सुरक्षित नोकरी करणार्‍यांना नोकरदारांना याची माहिती नसेल?.असे म्हणता येईल काय?. त्यांनाच काय त्यांच्या कामगार संघटना, युनियन चालविणाऱ्या नेत्यांना सुध्दा रविवारची सुटटीचे जनक हे असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना संघटीत करणारे सत्यशोधक चळवळीचे माळी समाजाचे कुशल संघटक व कुशल वक्ते रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे होते हे माहित नसावे?. असले तरी त्यांची कधीच वाच्यता
करायची नाही.म्हणजे नोंद न घेता कमी लेखने नाही काय?.
   आज देशातील अंसघटीत कष्टकरी कामगार,मजूरांनी त्यांच्या संस्था संघटना, चालविणार्‍यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यापासून प्रेरणा घेवून संघटीत शक्ती निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे.कामगाराच्या एकजुटीमुळे देशातील मोठयातमोठा भांडवलदार व उच्चवर्गीय प्रशासकीय अधिकारी संघटित शक्तीपुढेही झुकतो.हा इतिहास विशेष करून असंघटित कष्टकरी कामगार,शेतमजूर,नाका कामगार,घरकामगार व सर्व क्षेत्रातील कामगारांनी वाचला पाहिजे.कारण देशात सर्वांत जास्त देशात ९३ टक्के असंघटीत कष्टकरी कामगार आहेत. त्यांनी १० जून १८९० हा असंघटित कष्टकरी कामगाराचा पहिला विजय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. 

    महात्मा ज्योतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ ही देशातील तमाम ब्राम्हणेत्तर म्हणजे आजचे बहुजन,आदिवासी,मागासवर्गीय जाती जमातीतील कष्टकरी समाजाकरीता होती सर्व समाजाचे नेते विसरले आहेत.विशेष आंबेडकरी चळवळीतील बुध्दीजीवी साहित्यिक,कामगार नेते बहुजन,आदिवासी,भटक्यांना मागासवर्गीयांना कामगार मानत नाही.फक्त त्याची जात पाहतात.कामगार संघटना बांधताना त्यांना विशिष्ट विचारधारा पाहिजे.त्या शिवाय कामगारांना संघटीत करता येत नाही.कामगार म्हणून त्यांचे प्रश्न,समस्या,जाणून न घेता त्याची जात पाहून संघटना बांधू पाहणारे नेते न्याय मिळवून देतील काय? म्हणून आंबेडकरी चळवळीची केंद्रस्थानी एकही संघटना नाही. ज्या असोसिएशन आहेत त्याचेही वैचारीक पातळीवर एकमत नाही.सर्व क्षेत्रातील संघटीत कामगारांची ही स्थिती असेल तर असंघटीत कामगारांची काय परिस्थिती असेल?.आज पर्यंत संघटीत कामगरांनी असंघटीत कामगारांना कामगार म्हणून पाहिले नाही.जो असंघटित कामगार नेहमीत काम नसल्यामुळे वार्षिक वर्गणी भरू शकत नाही तो आपली संघटना कसा चालवत असतील?. त्याचे नेते बनण्याचे कोण धाडस करले? हे आज आपण पाहतो.ते धाडस नारायण मेंघाजी लोखंडे यांनी त्याकाळी केले होते.

     आज कष्टकरी कामगारांना अन्न,वस्त्र,निवारा,रोजगार,शिक्षण आणि आरोग्य हया माणसाच्या सहा मुलभूत गरजा भागविताना बहुजन समाजाचे खुप मोठया प्रमाणात शोषण होत आहे.या सर्व शोषित पिडीत समाज घटकाला संघटीत करून न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांचे सर्वोत्तम…शिष्य नारायण मेंघाजी लोखंडे अहोरात्र झगडत होते.ती सत्यशोधकाची चळवळ अनेक अंगाने देशातील कानाकोपर्‍यात पोहचली आहे.गिरणी कामगारांना रविवार सुट्टी मिळू नये यासाठी गिरणी मालकांनी या देशातील भटा ब्राम्हणंना उच्चवर्णीयातील बुध्दीजींवीना कामगारात बुध्दीभेद करण्याच्या कामावर लावले होते.त्यानुसार गिरणी कामगारांना रविवार हा ख्रिश्चन धर्मियांचा दिवस आहे. त्यामुळे हिंदू असलेल्या गिरणी कामगारात चुकीचा प्रचार व प्रसार चालला होता. तेव्हा सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला होता.तेव्हा सरकारने बॉम्बे मिल हँडस मिल असोशिएनचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांना रविवार हा सुट्‌टीचा दिवस ठेवण्यामागची भक्कम कारणे व आवश्यकता याबाबत मत विचारले होते.

     सत्यशोधक चळवळीत काम करणारे लढाऊ नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवार हा केवळ ख्रिश्चन धर्मियाचा दिवस नाही तर तो हिंदूचा ही धार्मिक दिवस आहे याचे ठोस पुरावे म्हणजे बहुजन समाजातील प्रसिध्द कुळ दैवत खंडोबा व कुलस्वामिनी या देवताचा रविवार हाच दिवस मानला जातो.बहुसंख्य गिरणी कामगार हे खंडोबाचे भक्त आहेत. परंतु केवळ या कारणाकरीता म्हणून रविवार संबध नाही. कारण भारतात ही चाल फार पुर्वी पासून आहे.ब्रिटीश प्रशासनाने सुरवातीपासून सर्व समाजाला सर्व वर्गाना,सर्व धर्मिंयाना सोयीचा सुट्टीचा दिवस म्हणून रविवार मानला असल्याने तोच दिवस कामगाराना सुट्टीचा दिवस असावा असे ठासून सांगितले.कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना रविवार सुट्टी तर कष्टकरी कामगारांना वेगवेगळया दिवशी सुट्टी.आजही आपल्या देशातील कंपन्या कारखाने व इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाला खात्याचे मालक आपल्या सोईने कामगार मजुरांना सुट्टी देतात.असंघटीत कष्टकरी कामगारांना तर हक्कांची सुट्टी नाही. ज्या दिवशी काम नसेल तोच त्याचा सुट्टीचा दिवस.आता पुन्हा १८८० सारखी परिस्थिती संघटीत असंघटीत कामगारांची होत आहे.याला केवळ राष्ट्रीय ट्रेड युनियन जबाबदार नाहीत. तर तो सर्व जाती धर्माचा कामगार कर्मचारी जो स्वतःला बहुजन,मागासवर्गीय समाज म्हणुन फक्त राजकीय आरक्षण घेण्यासाठी राजकीय पक्षाची गुलामी पत्करतो.पण पक्षाची ट्रेड युनियनची वैचारिक मांडणी,विचारधारा पाहत नाही.म्हणुन महात्मा फुले,राजर्षी शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्य शोधणारी, सांगणारी व अंमलबजावणी करण्या करीता संघर्ष करणारी चळवळ उभी केली होती तीच स्विकारली पाहिजे होती.पण ती विस्कळीत का झाली.त्यांचे आत्मचिंतन करून काम केले.तर भारतातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांचे भविष्य उज्वल राहील.ज्यानी भारतात पहिली असंघटीत संघटीत कामगारांची संघटना काढून संघर्ष केला. त्या भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर “नारायण मेघाजी लोखंडे” या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास,आजच्या (९फेब्रुवारी) १२८ व्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम !!!.
आपला
सागर रामभाऊ तायडे..९९२०४०३८५९.
अध्यक्ष- सत्यशोधक कामगार संघटना,
स्वतंत्र मजदूर युनियन,भांडुप मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *